शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"नोटबंदीचा श्रीमंत उद्योगपतींना झाला फायदा, गरीब-मजुरांवर सर्वात मोठा हल्ला"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 12:26 IST

'अर्थव्यवस्था की बात' या व्हिडीओ मालिकेतून राहुल यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधी विविध मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर हल्लाबोल करत आहेत. 'अर्थव्यवस्था की बात' या व्हिडीओ मालिकेतून राहुल यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. "मोदीजींचा कॅशमुक्त भारत म्हणजे मजूर, शेतकरी, छोटे व्यापारी मुक्त भारत आहे" तसेच "नोटबंदीचा श्रीमंत उद्योगपतींना फायदा, गरीब-मजुरांवर सर्वात मोठा हल्ला" असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. 

"मोदीजींचा कॅशमुक्त भारत म्हणजे मजूर, शेतकरी, छोटे व्यापारी मुक्त भारत आहे. 8 नोव्हेंबर 2016 रोजी हा फासा टाकण्यात आला होता, त्याचा भयंकर परिणाम 31 ऑगस्ट 2020 रोजी समोर आला आहे. जीडीपी घसरण्याबरोबरच नोटबंदीनं देशाची असंघटीत अर्थव्यवस्था तोडली" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तसेच "500-1000 रुपयांच्या नोटा रद्द करण्यात आल्या. संपूर्ण भारत बँकांसमोर जाऊन रांगेत उभा राहिला. काळा पैसा नष्ट झाला का?, भारतातील गरीब जनतेला नोटबंदीमुळे कोणता फायदा झाला? या दोन्ही प्रश्नांचं उत्तर नाही."

"नोटबंदीचा श्रीमंत उद्योगपतींना फायदा झाला आहे. सामान्य जनतेचा पैसा त्यांच्याकडून काढून त्याचा उपयोग सरकारने या लोकांची कर्ज माफ करण्यासाठी केला. यामध्ये दुसरा छुपा उद्देशही होता. देशातील जी असंघटीत अर्थव्यवस्था आहे, ती कॅशवर चालते. छोटे दुकानदार, मजूर, शेतकरी हे रोखीचे व्यवहार करतात. या क्षेत्रातून रोख पैसा काढून घेणं हाच दुसरा उद्देश होता. पंतप्रधानांनी स्वतः सांगितलं की त्यांना कॅशलेस भारत हवा आहे. छोटे व्यावसायिक, मजूर, शेतकरी यांचं नुकसान झालं. नोटबंदी भारतातील गरीब, शेतकरी, छोटे व्यावसायिक यांच्यावरील आक्रमण होतं. संपूर्ण देशाला यांच्याविरोधात लढावं लागेल" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

"मोदींच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेली संकटं", 'या' सहा मुद्दांवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल

राहुल गांधी यांनी याआधीही मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. 'मोदी मेड डिझास्टर' म्हणजेच मोदींच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेली संकटं असं म्हणत जोरदार टीकास्त्र सोडलं. राहुल गांधी यांनी मोदींच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेल्या संकटांमुळे देश अडचणीत असल्याचं म्हटलं आहे. या सोबत सहा मुद्दे सांगितले आहेत. 23.9 टक्क्यांनी घटलेला जीडीपीचा दर, 45 वर्षांमधील सर्वाधिक बेरोजगारीचा दर, 12 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या, केंद्र सरकारने राज्यांना जीएसटीची रक्कम न देणे, कोरोनाग्रस्तांच्या संख्येत आणि मृत्यूमध्ये दररोज होणारी वाढ आणि भारताच्या सीमावर शेजारच्या देश करत असलेली घुसखोरी या गोष्टींचा त्यामध्ये समावेश आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

बापरे! तरुणीच्या पोटात होता तब्बल 7 किलो केसांचा गोळा, डॉक्टरही झाले हैराण

CoronaVirus News : नवा उच्चांक! गेल्या 24 तासांत तब्बल 83,883 नवे रुग्ण, 38 लाखांचा टप्पा केला पार

"सुशांतच्या मृत्यूचे राजकारण करण्याचे पाप भाजपाला महागात पडेल"

"केंद्र सरकार 'हा' निर्णय एकट्याने घेऊ शकत नाही", ममता बॅनर्जींचा हल्लाबोल

'मलाही पंतप्रधानांना हेच सांगायचंय' म्हणत चिदंबरम यांनी मोदींचं 7 वर्षांपूर्वीचं 'ते' ट्विट केलं रिट्वीट

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाIndiaभारतDemonetisationनिश्चलनीकरण