शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

भारतात शिक्षण आणि रोजगारनिर्मितीऐवजी फक्त तिरस्कार पसरवला जातो आहे, राहुल गांधी यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2018 08:51 IST

भारतात शिक्षणाचा प्रसार होणं व नोकरीच्या संधी निर्माण होणं अत्यंत आवश्यक आहे. पण सध्या प्रत्यक्षात मात्र फक्त तिरस्कार पसरविण्याचं काम सुरू आहे, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.

ठळक मुद्दे भारतात शिक्षणाचा प्रसार होणं व नोकरीच्या संधी निर्माण होणं अत्यंत आवश्यक आहे. पण सध्या प्रत्यक्षात मात्र फक्त तिरस्कार पसरविण्याचं काम सुरू आहे, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. बहरीनमध्ये सोमवारी झालेल्या भारतीय वंशाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

बहरीन- भारतात शिक्षणाचा प्रसार होणं व नोकरीच्या संधी निर्माण होणं अत्यंत आवश्यक आहे. पण सध्या प्रत्यक्षात मात्र फक्त तिरस्कार पसरविण्याचं काम सुरू आहे, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी हे सध्या बहरीन दौऱ्यावर आहेत. बहरीनमध्ये सोमवारी झालेल्या भारतीय वंशाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. वर्षभरात नोकरीच्या संधी निर्माण न होण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर घटलं आहेत. गेल्या आठ वर्षातला निचांकी आकडा या सरकारने रोजगारनिर्मितीत गाठला आहे. त्यामुळे खरं आव्हान या संधी निर्माण करणं आणि शिक्षणाचा प्रसार करणं आहे. पण, भारत सरकारकडून लोकांमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलं जातं आहे, अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी केली आहे. 

 

जनतेत फूट पाडणं हाच या मोदी सरकारपुढचा अजेंडा दिसतो आहे असाही आरोप राहुल गांधी यांनी केला. आपल्या सगळ्यांच्या मायदेशावर काय संकट आलं आहे त्याची कल्पना देण्यासाठी मी इथे उभा आहे असंही राहुल गांधी यांनी म्हंटलं. 

 

बहरीन येथिल कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी गुजरात विधानसभा निवडणूक निकालाचा मुद्दाही उपस्थित केला. निकालाला उद्देशून बोलताना राहुल गांधी यांनी भाजपावर सडकून टीका केली. गुजरात हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो आणि तिथून ते कसेबसे वाचले आहेत, गुजरातमध्ये त्यांना निसटता विजय मिळाला आहे, असं राहुल गांधी यांनी म्हंटलं. 

 

बहरीनमध्ये आल्यावर राहुल गांधी यांचं पीपल ऑफ इंडियन ऑरिजनच्या सदस्यांनी भव्य स्वागत केलं. भारतीय वंशाच्या नागरिकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावण्याआधी राहुल गांधी यांनी प्रिन्स शेख सलमान बिन हमद अल खलीफा यांचीही भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी पंडित नेहरूंची काही पुस्तकंही खलीफांना भेट दिली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी