शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भारतात शिक्षण आणि रोजगारनिर्मितीऐवजी फक्त तिरस्कार पसरवला जातो आहे, राहुल गांधी यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2018 08:51 IST

भारतात शिक्षणाचा प्रसार होणं व नोकरीच्या संधी निर्माण होणं अत्यंत आवश्यक आहे. पण सध्या प्रत्यक्षात मात्र फक्त तिरस्कार पसरविण्याचं काम सुरू आहे, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.

ठळक मुद्दे भारतात शिक्षणाचा प्रसार होणं व नोकरीच्या संधी निर्माण होणं अत्यंत आवश्यक आहे. पण सध्या प्रत्यक्षात मात्र फक्त तिरस्कार पसरविण्याचं काम सुरू आहे, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. बहरीनमध्ये सोमवारी झालेल्या भारतीय वंशाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

बहरीन- भारतात शिक्षणाचा प्रसार होणं व नोकरीच्या संधी निर्माण होणं अत्यंत आवश्यक आहे. पण सध्या प्रत्यक्षात मात्र फक्त तिरस्कार पसरविण्याचं काम सुरू आहे, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी हे सध्या बहरीन दौऱ्यावर आहेत. बहरीनमध्ये सोमवारी झालेल्या भारतीय वंशाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. वर्षभरात नोकरीच्या संधी निर्माण न होण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर घटलं आहेत. गेल्या आठ वर्षातला निचांकी आकडा या सरकारने रोजगारनिर्मितीत गाठला आहे. त्यामुळे खरं आव्हान या संधी निर्माण करणं आणि शिक्षणाचा प्रसार करणं आहे. पण, भारत सरकारकडून लोकांमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलं जातं आहे, अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी केली आहे. 

 

जनतेत फूट पाडणं हाच या मोदी सरकारपुढचा अजेंडा दिसतो आहे असाही आरोप राहुल गांधी यांनी केला. आपल्या सगळ्यांच्या मायदेशावर काय संकट आलं आहे त्याची कल्पना देण्यासाठी मी इथे उभा आहे असंही राहुल गांधी यांनी म्हंटलं. 

 

बहरीन येथिल कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी गुजरात विधानसभा निवडणूक निकालाचा मुद्दाही उपस्थित केला. निकालाला उद्देशून बोलताना राहुल गांधी यांनी भाजपावर सडकून टीका केली. गुजरात हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो आणि तिथून ते कसेबसे वाचले आहेत, गुजरातमध्ये त्यांना निसटता विजय मिळाला आहे, असं राहुल गांधी यांनी म्हंटलं. 

 

बहरीनमध्ये आल्यावर राहुल गांधी यांचं पीपल ऑफ इंडियन ऑरिजनच्या सदस्यांनी भव्य स्वागत केलं. भारतीय वंशाच्या नागरिकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावण्याआधी राहुल गांधी यांनी प्रिन्स शेख सलमान बिन हमद अल खलीफा यांचीही भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी पंडित नेहरूंची काही पुस्तकंही खलीफांना भेट दिली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी