शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
5
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
6
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
7
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
8
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
9
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
10
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
11
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
12
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
13
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
14
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
15
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
16
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
17
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
18
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
19
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

भारतात शिक्षण आणि रोजगारनिर्मितीऐवजी फक्त तिरस्कार पसरवला जातो आहे, राहुल गांधी यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2018 08:51 IST

भारतात शिक्षणाचा प्रसार होणं व नोकरीच्या संधी निर्माण होणं अत्यंत आवश्यक आहे. पण सध्या प्रत्यक्षात मात्र फक्त तिरस्कार पसरविण्याचं काम सुरू आहे, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.

ठळक मुद्दे भारतात शिक्षणाचा प्रसार होणं व नोकरीच्या संधी निर्माण होणं अत्यंत आवश्यक आहे. पण सध्या प्रत्यक्षात मात्र फक्त तिरस्कार पसरविण्याचं काम सुरू आहे, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. बहरीनमध्ये सोमवारी झालेल्या भारतीय वंशाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

बहरीन- भारतात शिक्षणाचा प्रसार होणं व नोकरीच्या संधी निर्माण होणं अत्यंत आवश्यक आहे. पण सध्या प्रत्यक्षात मात्र फक्त तिरस्कार पसरविण्याचं काम सुरू आहे, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी हे सध्या बहरीन दौऱ्यावर आहेत. बहरीनमध्ये सोमवारी झालेल्या भारतीय वंशाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. वर्षभरात नोकरीच्या संधी निर्माण न होण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर घटलं आहेत. गेल्या आठ वर्षातला निचांकी आकडा या सरकारने रोजगारनिर्मितीत गाठला आहे. त्यामुळे खरं आव्हान या संधी निर्माण करणं आणि शिक्षणाचा प्रसार करणं आहे. पण, भारत सरकारकडून लोकांमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलं जातं आहे, अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी केली आहे. 

 

जनतेत फूट पाडणं हाच या मोदी सरकारपुढचा अजेंडा दिसतो आहे असाही आरोप राहुल गांधी यांनी केला. आपल्या सगळ्यांच्या मायदेशावर काय संकट आलं आहे त्याची कल्पना देण्यासाठी मी इथे उभा आहे असंही राहुल गांधी यांनी म्हंटलं. 

 

बहरीन येथिल कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी गुजरात विधानसभा निवडणूक निकालाचा मुद्दाही उपस्थित केला. निकालाला उद्देशून बोलताना राहुल गांधी यांनी भाजपावर सडकून टीका केली. गुजरात हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो आणि तिथून ते कसेबसे वाचले आहेत, गुजरातमध्ये त्यांना निसटता विजय मिळाला आहे, असं राहुल गांधी यांनी म्हंटलं. 

 

बहरीनमध्ये आल्यावर राहुल गांधी यांचं पीपल ऑफ इंडियन ऑरिजनच्या सदस्यांनी भव्य स्वागत केलं. भारतीय वंशाच्या नागरिकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावण्याआधी राहुल गांधी यांनी प्रिन्स शेख सलमान बिन हमद अल खलीफा यांचीही भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी पंडित नेहरूंची काही पुस्तकंही खलीफांना भेट दिली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी