शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
4
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
5
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
6
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
7
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
8
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
9
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
12
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
13
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
14
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
15
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
16
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
17
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
18
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
19
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
20
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

Pulwama Attack : दहशदवाद्याचा बिमोड करायचाय तर 'फुटीरतावाद्यांना लगाम घाला'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 5:17 AM

दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४९ जवान शहीद झाले आणि अवघा देश सुन्न झाला.

दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४९ जवान शहीद झाले आणि अवघा देश सुन्न झाला. याच अनुषंगाने ‘कसा करावा दहशतवादाचा बीमोड’ या विषयावर ‘लोकमत’ने वाचकांकडून प्रतिक्रिया मागविल्या होत्या. अवघ्या दोन दिवसांत पत्रांचा अक्षरक्ष: पाऊस पडला. यावरूनच देशवासीयांच्या तीव्र भावनांची कल्पना येते. या अमानवी हल्ल्याबाबत दु:ख व्यक्त करतानाच लोकांनी आपल्या मनातील संतापाला वाट मोकळी करून दिली आहे. अनेक जणांनी पाकिस्तानचा बदला घ्या, दहशतवाद्यांना ठेचून काढा, असे म्हटले आहे. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक कोंडी करून पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघडा पाडावा, असे काहींना वाटते. महत्त्वाचे म्हणजे, शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठाम उभे असल्याची ग्वाही देताना, तेथे कर माझे जुळती... ही भावना सर्वांचीच आहे!

फुटीरतावाद्यांना लगाम घालास्थानिक फुटीरतावादी चिथावणीखोरांचे अतिरेक्यांना असलेले समर्थन व आश्रय, हेच काश्मीरमधील दहशतवादी कारवायांचे मूळ आहे. फुटीरतवाद्यांचे अड्डे नष्ट करण्यासाठी लष्कराला स्वातंत्र्य द्यावे. अतिरेक्यांना समर्थन देणाऱ्या नागरिकांवर देशद्रोहाचे खटले दाखल करावेत.- दि. ना. फड,घाटनांदूर, ता. अंबाजोगाई, जि. बीड

‘रि-आॅलआउट’ आॅपरेशनची गरजकाश्मीरमध्ये पुन्हा ‘आॅपरेशन रि-आॅलआउट’ सुरू करून लपलेले दहशतवादी आणि त्यांना रसद पुरवणारे देशद्रोही यांना एकाच वेळी यमसदनी पाठवणे हा एकमेव पर्याय भारतापुढे आहे. हे करत असताना भारताने अमेरिकासहित सर्व मोठ्या राष्ट्रांचे सहकार्य घ्यावे, परंतु प्रसंगी आंतरराष्ट्रीय दबाव झुगारावा.- युवराज रघुनाथ पवार,चापानेर, कन्नड, जि. औरंगाबादजागतिक स्तरावर यंत्रणा उभारावीलष्कर ए तोयबा, इसिस, जैश ए मोहम्मद यांसारख्या दहशतवादी संघटनेच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी एक अत्याधुनिक गोपनीय यंत्रणा जागतिक स्तरावर कार्यान्वित केली पाहिजे. प्रत्येक राज्यात दहशतवादविरोधी ‘अँटी टेरेरिस्ट सेल’स्थापन करावा. लष्कराच्या सूचनांमध्ये प्रचंड गोपनीयता हवी.- राजेंद्र आरगे,हेरवाड, शिरोळ, जि. कोल्हापूर.काश्मीरचा आर्थिक विकास साधाकश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. भारताच्या प्रगतीमध्ये भारतातील सर्व नागरिकांचा समान सहभाग असायला हवा. दहशतवादाचा भयंकर चेहेरा व फुटीरतावाद्यांची संकुचित वृत्ती दिसली आणि आर्थिक विकास झाला तर काश्मिरी युवक दहशतवादाकडे वळणार नाहीत. जे मुठभर लोक चिथावणी देतील, त्यांना हेच युवक उद्या सडेतोड उत्तर नक्कीच देतील.- प्रथमेश व्हनकडे, कुपवाड, जि. सांगली.धडा शिकवाचसध्याच्या परिस्थितीत युद्ध हे कोणालाच परवडणारे नाही. चीन पाकिस्तानची पाठराखण करीत आला आहेच. त्यापेक्षा आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्यासाठी प्रयत्न करावेत. भारताने सर्व प्रकारचे संबंध तोडून पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्र म्हणून जाहीर होण्यासाठी कंबर कसावी. तसे झाल्यास पाकिस्ताना राष्ट्र म्हणून आपोआपच कोसळून पडेल.- ओंकार गोवारकर,देव नगर, नागपूरएक घाव, दोन तुकडेभारताने पाकिस्तानला कायम स्वरुपी अद्दल शिकवावी. ४४ जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नये. स्व. इंदिरा गांधी यांनी १९७१ रोजी एक घाव घालून पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते. तशीच कारवाई भारताने आता करायला हवी. जैश ए मोहम्मद हल्ल्याची जबाबदारी घेउ शकते तर भारत सरकार जैश ए मोहम्मदला संपावण्याची जबाबदारी का नाही घेऊ शकत?- ऋषिकेश साळुंके, मु.पो.घारगाव ता. कळंब जि. उस्मानाबादजबरी हल्ला कराभारतीय सैनिकांच्या शौर्यगाथा वाचत आणि ऐकत आलेलो आपण, आता आपल्या सैनिकांच्या केविलवाण्या बातम्या ऐकाव्या लागत आहेत. याला जवाबदार केवळ आणि केवळ राजकीय लोक आहेत. इस्रायलकडून प्रेरणा घेऊन पाकिस्तानवर जबरदस्त हल्ला करायला पाहिजे.- दयानाथ कुर्मी, कोथरुड, पुणेआक्रमक पाऊल उचलण्याची गरजदहशतवाद ही समस्या केवळ एका राष्ट्रापुरतीच मर्यादित राहिली नसून जगातील बहुतांश देशांना दहशतवादाचा सामना करावा लागत आहे. त्याचा बिमोड करण्यासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्र येणे आवश्यक आहे.भारत जागतिक स्तरावरुन तसे प्रयत्न करत आहे. पाकिस्तानची आर्थिक व राजनैतिक कोंडी करण्यात भारताला यश आले आहे. तरी देखील भारताला आता पाकिस्तान विरोधात आक्रमक पाऊल उचलण्याची गरज आहे. मोदींनी पाकिस्तान विरोधात सर्जिकल स्ट्राईक केले. मात्र पुढे हा प्रयोग तिथेच थांबला. त्याचा गाजावाजा करण्यातच सरकार व्यस्त होते. पाकिस्तान एका सर्जिकल ने सरळ होणारा देश नाही.- प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल, वर्धा 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाterroristदहशतवादी