52 मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्याची प्रक्रिया पूर्ण, मोदींना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मिळणार वॉर टीम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 09:19 AM2021-07-05T09:19:35+5:302021-07-05T09:20:27+5:30

पंतप्रधान कार्यालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले की, पंतप्रधानांनी प्रत्येक मंत्रालयाच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी ५२ मंत्र्यांचे दहा उपगटात विभाजन करुन प्रत्येक गटाच्या दिवसभर बैठका घेऊन चर्चा करण्यात आली. 

The process of reviewing the performance of 52 ministers has been completed, Modi will get a war team for the upcoming Lok Sabha elections | 52 मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्याची प्रक्रिया पूर्ण, मोदींना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मिळणार वॉर टीम

52 मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्याची प्रक्रिया पूर्ण, मोदींना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मिळणार वॉर टीम

googlenewsNext

नवी दिल्ली : विरोधी पक्ष २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपशी कशी मुकाबला करण्यासाठी समान रणनीती आखण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातील ५२ मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्याचे काम पूर्ण केले आहे. 
जवळपास महिनाभर ही प्रक्रिया चालली. तथापि, ५३ वे मंत्री रमेश पोखरिया निशंक हे कोरोनाबाधित असल्याने त्यांना या प्रक्रियेत सहभागी होता आले नाही. केंद्रीय मंत्रिमंडळाचा संभाव्य फेरबदल होईल तेव्हा यातून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठीची पंतप्रधानांची वॉर टीम दिसेल. (The process of reviewing the performance of 52 ministers has been completed, Modi will get a war team for the upcoming Lok Sabha elections)

पंतप्रधान कार्यालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले की, पंतप्रधानांनी प्रत्येक मंत्रालयाच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी ५२ मंत्र्यांचे दहा उपगटात विभाजन करुन प्रत्येक गटाच्या दिवसभर बैठका घेऊन चर्चा करण्यात आली. महत्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्प २०२३ पर्यंत मार्गी लावण्यास पंतप्रधान उत्सूक आहेत. त्याचप्रमाणे विदेश मंत्री एस. जयशंकर यांनी भारत २०२३ मध्ये प्रथमताच आयोजित करीत असलेल्या जी-२० शिखर परिषदेच्या तयारीबाबत ठळकपणे उल्लेख केला. त्यासाठी ते महिन्यातील २० दिवस दौरे करीत आहेत.

किमान दोन प्रकल्प पूर्ण करावे लागणार
लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या जनतेपुढे प्रदर्शित करता येतील, असे किमान दोन प्रकल्प प्रत्येक मंत्रालयाला पूर्ण करावे लागतील, असे पंतप्रधानांनी सर्व मंत्रालयानान स्पष्ट केले होते. २०२४ हे सार्वत्रिक निवडणुकीचे वर्ष असल्याने हे सर्व प्रकल्प ऑगस्ट २०२३ पर्यंत पूर्ण झाले पाहिजेत, असे पंतप्रधानांनी या मुक्त चर्चेत सर्व मंत्रालयांना आवर्जून सांगितले होते.
 

Web Title: The process of reviewing the performance of 52 ministers has been completed, Modi will get a war team for the upcoming Lok Sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.