लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : देशातील राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करताना अनेकदा मोबाइल नेटवर्क गायब होण्याच्या समस्येमुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. ही समस्या दूर करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) आता कंबर कसली आहे.
महामार्गावरील एकूण १,७५० किलोमीटर अंतराच्या अशा ४२४ जागा चिन्हांकित करण्यात आल्या आहेत, जिथे मोबाइल नेटवर्क अजिबात उपलब्ध नाही. या ‘ब्लॅक स्पॉट्स’मध्ये तातडीने सुधारणा करण्यासाठी ‘एनएचएआय’ने दूरसंचार विभाग (डॉट) आणि ‘ट्राय’कडे (ट्राय) तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
प्रवाशांना मिळणार अलर्ट
केवळ नेटवर्क सुधारणेच नव्हे, तर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एनएचएआयने एक पाऊल पुढे टाकले आहे. ज्या ठिकाणी अपघात होण्याचे प्रमाण जास्त आहे किंवा जिथे मोकाट जनावरांचा वावर अधिक आहे, अशा क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वीच प्रवाशांच्या मोबाइलवर ‘फ्लॅश एसएमएस’ किंवा अलर्ट पाठवण्याच्या सूचना ‘ट्राय’ला देण्यात आल्या आहेत. हे अलर्ट मिळाल्यामुळे वाहनचालक आधीच सावध होतील आणि वेग मर्यादित ठेवून संभाव्य अपघात टाळता येतील.
Web Summary : NHAI addresses mobile network gaps on highways, identifying 424 'black spots' across 1,750 km. They seek DOT and TRAI intervention for improvements. Alert SMS will warn drivers of accident-prone zones and stray animal areas, enhancing safety and preventing accidents.
Web Summary : एनएचएआई ने राजमार्गों पर मोबाइल नेटवर्क की कमियों को दूर करने के लिए 1,750 किलोमीटर में फैले 424 'ब्लैक स्पॉट्स' की पहचान की। सुधार के लिए डीओटी और ट्राई से हस्तक्षेप की मांग। अलर्ट एसएमएस दुर्घटना संभावित क्षेत्रों और आवारा पशु क्षेत्रों के बारे में ड्राइवरों को चेतावनी देगा, जिससे सुरक्षा बढ़ेगी।