शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

प्रियंका गांधींच्या एन्ट्रीचा उत्तर प्रदेशात काँग्रेसला फायदा; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 07:25 IST

प्रियंका गांधींच्या सक्रीय राजकारणातील प्रवेशामुळे काँग्रेसच्या मतांमध्ये वाढ होण्याचा अंदाज

लखनऊ: प्रियंका गांधींच्या राजकारणातील एन्ट्रीचा फायदा उत्तर प्रदेशातकाँग्रेसला होणार असल्याचा अंदाज एका सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे. प्रियंका गांधींकडेउत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रियंका राजकारणात सक्रीय झाल्यानं काँग्रेसला फायदा होऊ शकतो, असा अंदाज इंडिया टीव्ही-सीएनएक्सनं यांच्या सर्वेक्षणातून समोर आला आहे. मात्र यामुळे समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांच्या महाआघाडीला बसणार आहे. विशेष म्हणजे प्रियंका गांधींची सक्रीय राजकारणातील एन्ट्री भाजपाच्या पथ्यावर पडणार आहे. प्रियंका गांधींच्या सक्रीय राजकारणातील प्रवेशामुळे काँग्रेसच्या मतांमध्ये वाढ होण्याचा अंदाज आहे. मात्र यामुळे काँग्रेसच्या जागा फारशा वाढणार नाहीत. उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात लोकसभेच्या 43 जागा आहेत. यातील जवळपास सर्वच जागांवर काँग्रेसच्या मतांमध्ये वाढ होईल, असा अंदाज सर्वेक्षणातून वर्तवण्यात आला आहे. याचा फटका महाआघाडीला बसू शकेल. उत्तर प्रदेशच्या पूर्व भागातील 43 पैकी 19 जागांवर महाआघाडीला, 20 जागांवर भाजपाला यश मिळेल, असा अंदाज आहे. तर काँग्रेसला अवघ्या 4 जागांवर समाधान मानावं लागू शकतं. आधीचा अंदाज काय?प्रियंका गांधी सक्रीय राजकारणात येण्यापूर्वी एक सर्वेक्षण करण्यात आलं होतं. त्यात पूर्वांचलमध्ये (उत्तर प्रदेशचा पूर्व भाग) काँग्रेसला रायबरेली आणि अमेठी या दोनच जागांवर यश मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. तर सपा-बसपाच्या महाआघाडीला 26 आणि भाजपाला 15 जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. प्रियंका गांधींच्या एन्ट्रीमुळे कोणाचा किती फायदा? किती नुकसान?प्रियंका गांधी सक्रीय झाल्यानं काँग्रेसच्या मतांमध्ये वाढ होईल, असा अंदाज आहे. मात्र त्यामुळे काँग्रेसच्या जागा फारशा वाढणार नाहीत. आधी काँग्रेसला दोन जागा मिळण्याचा अंदाज होता. प्रियंका गांधींमुळे त्यात फक्त दोननं वाढ होईल. काँग्रेसची मतं वाढल्याचा मोठा फटका महाआघाडीला बसू शकतो. त्यांना आधी 26 जागा मिळण्याचा अंदाज होता. त्या आता 19 वर येऊ शकतात. म्हणजेच 7 जागांचं नुकसान होऊ शकतं. काँग्रेसची मतं वाढल्यानं भाजपाच्या मतांवरही परिणाम होईल. मात्र महाआघाडीला सर्वाधिक फटका बसल्यानं भाजपाचा फायदा होऊ शकतो. त्यांना आधी 15 जागा मिळतील, असा अंदाज होता. मात्र आता त्यांना 20 जागा मिळू शकतात. म्हणजेच 5 जागांचा फायदा होऊ शकतो.  

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीUttar Pradeshउत्तर प्रदेशLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९congressकाँग्रेसBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBJPभाजपा