शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

प्रियंका गांधींच्या एन्ट्रीचा उत्तर प्रदेशात काँग्रेसला फायदा; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 07:25 IST

प्रियंका गांधींच्या सक्रीय राजकारणातील प्रवेशामुळे काँग्रेसच्या मतांमध्ये वाढ होण्याचा अंदाज

लखनऊ: प्रियंका गांधींच्या राजकारणातील एन्ट्रीचा फायदा उत्तर प्रदेशातकाँग्रेसला होणार असल्याचा अंदाज एका सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे. प्रियंका गांधींकडेउत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रियंका राजकारणात सक्रीय झाल्यानं काँग्रेसला फायदा होऊ शकतो, असा अंदाज इंडिया टीव्ही-सीएनएक्सनं यांच्या सर्वेक्षणातून समोर आला आहे. मात्र यामुळे समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांच्या महाआघाडीला बसणार आहे. विशेष म्हणजे प्रियंका गांधींची सक्रीय राजकारणातील एन्ट्री भाजपाच्या पथ्यावर पडणार आहे. प्रियंका गांधींच्या सक्रीय राजकारणातील प्रवेशामुळे काँग्रेसच्या मतांमध्ये वाढ होण्याचा अंदाज आहे. मात्र यामुळे काँग्रेसच्या जागा फारशा वाढणार नाहीत. उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात लोकसभेच्या 43 जागा आहेत. यातील जवळपास सर्वच जागांवर काँग्रेसच्या मतांमध्ये वाढ होईल, असा अंदाज सर्वेक्षणातून वर्तवण्यात आला आहे. याचा फटका महाआघाडीला बसू शकेल. उत्तर प्रदेशच्या पूर्व भागातील 43 पैकी 19 जागांवर महाआघाडीला, 20 जागांवर भाजपाला यश मिळेल, असा अंदाज आहे. तर काँग्रेसला अवघ्या 4 जागांवर समाधान मानावं लागू शकतं. आधीचा अंदाज काय?प्रियंका गांधी सक्रीय राजकारणात येण्यापूर्वी एक सर्वेक्षण करण्यात आलं होतं. त्यात पूर्वांचलमध्ये (उत्तर प्रदेशचा पूर्व भाग) काँग्रेसला रायबरेली आणि अमेठी या दोनच जागांवर यश मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. तर सपा-बसपाच्या महाआघाडीला 26 आणि भाजपाला 15 जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. प्रियंका गांधींच्या एन्ट्रीमुळे कोणाचा किती फायदा? किती नुकसान?प्रियंका गांधी सक्रीय झाल्यानं काँग्रेसच्या मतांमध्ये वाढ होईल, असा अंदाज आहे. मात्र त्यामुळे काँग्रेसच्या जागा फारशा वाढणार नाहीत. आधी काँग्रेसला दोन जागा मिळण्याचा अंदाज होता. प्रियंका गांधींमुळे त्यात फक्त दोननं वाढ होईल. काँग्रेसची मतं वाढल्याचा मोठा फटका महाआघाडीला बसू शकतो. त्यांना आधी 26 जागा मिळण्याचा अंदाज होता. त्या आता 19 वर येऊ शकतात. म्हणजेच 7 जागांचं नुकसान होऊ शकतं. काँग्रेसची मतं वाढल्यानं भाजपाच्या मतांवरही परिणाम होईल. मात्र महाआघाडीला सर्वाधिक फटका बसल्यानं भाजपाचा फायदा होऊ शकतो. त्यांना आधी 15 जागा मिळतील, असा अंदाज होता. मात्र आता त्यांना 20 जागा मिळू शकतात. म्हणजेच 5 जागांचा फायदा होऊ शकतो.  

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीUttar Pradeshउत्तर प्रदेशLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९congressकाँग्रेसBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBJPभाजपा