शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
3
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
4
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
5
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
6
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
7
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
8
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
9
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

Unnao Rape Case: 'ती'च्या कुटुंबाचा वर्षभर छळ होतोय; मुख्यमंत्री कुणाच्या बाजूने आहेत?; प्रियंका गांधींचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2019 3:23 PM

पीडित कुटुंबांतील लहान मुलीला शाळेतून नाव कमी करण्याचे धमक्या देण्यात आल्या. तसेच जून महिन्यात त्यांची शेतातील पिकांना आग लावण्यात आली.

नवी दिल्ली : उन्नाव बलात्कार प्रकरणात पीडितेच्या मृत्यूनंतर उत्तर प्रदेशमधील राजकीय वर्तुळात याचे पडसाद उमटत आहे. पीडित कुटुंबातील सदस्यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी योगी सरकारवर जोरदार टीका केली. उत्तर प्रदेशात गुन्हेगारांमध्ये भीती उरली नसून ते खुलेआम फिरत आहे. पीडित मुलीच्या कुटुंबावर वर्षभरापासून अत्याचार होत होते. आरोपींनी घरात घुसून मुलीच्या वडिलांना बेदम मारहाण केली. मात्र आरोपीचे कुटुंब भाजपशी निगडीत असल्याने त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे आरोप प्रियंका गांधी यांनी केला आहे.

शनिवारी प्रियंका गांधी यांनी पीडित मुलींच्या कुटुंबीयांची उन्नाव येथे जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी पीडित कुटुंबाशी बंद खोलीत चर्चा केली. या भेटीनंतर बाहेर आल्यावर प्रियंका गांधी म्हणाल्या की, पीडित कुटुंबाशी मी चर्चा करून संपूर्ण प्रकरण जाणून घेतले असून, खूप वाईट घटना घडली आहे. तसेच संपूर्ण कुटुंबावर वर्षभर अत्याचार होत होते. आरोपींनी घरात घुसून मुलीच्या वडिलांना बेदम मारहाण केली.  कुटुंबातील महिलांना धमकावल्याचा आरोप प्रियंका गांधीनी केला.

 कुटुंबांतील लहान मुलीला शाळेतून नाव कमी करण्याचे धमक्या देण्यात आल्या. तसेच जून महिन्यात त्यांची शेतातील पिकांना आग लावण्यात आली. अशा प्रकारे कुटुंबाचा छळ होत असल्याचा आरोप प्रियंका गांधी यांनी लावला. तर हे सर्व कसे घडत आहे याचा खुलासा प्रशासनाने करावा. तसेच योगी सरकारने यावर उत्तर दिले पाहिजे असेही प्रियंका गांधी यावेळी म्हणाल्या.

प्रियंका गांधी यांनी उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडित कुटुंबांची भेट घेतल्यानंतर ट्विटर हैंडलवरून ट्वीट करत योगी सरकारवर टीका केली आहे. या दुःखाच्या घटनेत पीडितेच्या कुटूंबाला धीर देण्याची मी देवाकडे प्रार्थना करते. त्यांना न्याय न मिळणे हे आपल्या सर्वांचे अपयश आहे. त्यामुळे सामाजिकदृष्ट्या आम्ही सर्व दोषी आहोत. मात्र हे सर्व उत्तर प्रदेशमधील पोकळ झालेली कायदा व सुव्यवस्था देखील दर्शवते, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.

आरोपीचे कुटुंब भाजपशी संबंधित

उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी हा गावच्या प्रमुखांचा मुलगा आहे. असे म्हटले जात आहे की त्याचे कुटुंब भाजपशी जोडलेले आहे. त्यामुळे त्याला वाचवण्याचा प्रयत्न केले जात आहे का ? कारण या आधी सुद्धा असे झाले असल्याचे प्रियंका म्हणाल्या. त्यामुळे यात राजकीय हस्तक्षेप तर होत नाही ना ? याकडे प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. आरोपींना कोणतेही भीती नसून ते पीडित कुटंबाला सतत धमकावत असल्याचे सुद्धा प्रियंका गांधी म्हणाल्या.