शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळमध्ये ३ महापालिकांच्या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर; तिरुवनंतपुरमला NDA आणि LDF मध्ये चुरस
2
एका गंभीर विषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; काय घडलं?
3
काय आहे 'SHANTI' विधेयक? केंद्र सरकानं दिली मंजुरी; खासगी सेक्टरसाठी उघडले अणुऊर्जा क्षेत्र
4
अमेरिकेकडून भारतावर लावलेलं टॅरिफ हटवण्याची मागणी; शुल्काला थेट आव्हान, खासदारांनी संसदेत मांडला प्रस्ताव
5
Crime: "मला प्रेग्नंट कर नाही तर,..." हे ऐकताच प्रियकर भडकला; विवाहित प्रेयसीला कायमचं संपवलं
6
Food: भेसळयुक्त पनीर कसे ओळखाल? फक्त ४ मिनिटात घरी 'या' ४ सोप्या चाचण्या करून पाहा!
7
SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?
8
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
9
जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे
10
काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती
11
Vaibhav Suryavanshi: "मी बिहारचा आहे, मला काही फरक पडत नाही"; वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी असं का म्हणाला?
12
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
13
पाकिस्तानी अभिनेत्रीची 'धुरंधर'साठी झालेली निवड, ऐनवेळी नाकारला सिनेमा? रणवीरसोबतचे फोटो शेअर करून झाली ट्रोल
14
भारतीय लष्कारात इंटर्नशिप करण्याची संधी, ७५ हजार मिळणार मानधन; २१ डिसेंबरपर्यंत अर्ज करा
15
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
16
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
17
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
18
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
19
Tarot Card: येत्या आठवड्यात परिस्थिती कशीही असो, मनःस्थिती उत्तम ठेवा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 17:31 IST

Priyanka Gandhi: पंतप्रधानांनी मणिपूर अशा अवस्थेत का सोडले आहे? प्रियंका गांधींचा प्रश्न

Priyanka Gandhi on Manipur: गेल्या काही महिन्यांपासून शांत असलेल्या मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आला आहे. शनिवारी रात्री मेतेई संघटनेच्या नेत्या अरामबाई टेंगोल आणि इतर अनेक नेत्यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर हिंसाचार सुरू झाला. निदर्शकांनी रस्त्यांवर उतरुन बसेस जाळल्या, मालमत्तेची तोडफोड केली. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने बिष्णुपूर जिल्ह्यात कर्फ्यू लागू केला असून, पाच जिल्ह्यांमध्ये इंटरनेटवर बंदी घातली आहे. दरम्यान, आता या हिंसाचारावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची प्रतिक्रिया आली आहे.

काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी मणिपूरबाबत सरकारवर निशाणा साधला आहे. एका ट्विटमध्ये प्रियांका गांधी यांनी लिहिले की, मणिपूर पुन्हा एकदा हिंसाचाराच्या विळख्यात सापडला आहे. गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील जनता हिंसाचार, खून, बलात्कार आणि स्थलांतराला तोंड देत आहे. शेकडो लोक मृत्युमुखी पडले आहेत, हजारो लोक बेघर आहेत. केंद्राचे राज्य असूनही तिथे शांतता प्रस्थापित होत नसल्याचे कारण काय? पंतप्रधानांनी मणिपूर अशा अवस्थेत का सोडले आहे? असा प्रश्न त्यांनी विचारला.

आजपर्यंत पंतप्रधान मणिपूरला गेले नाहीत, राज्याच्या कोणत्याही प्रतिनिधीला भेटले नाहीत, कधीही शांततेचे आवाहन केले नाही किंवा कोणतेही ठोस प्रयत्न केले नाहीत. ही असंवेदनशील आणि बेजबाबदार वृत्ती कोणत्याही लोकशाहीसाठी अत्यंत दुर्दैवी आहे. देशवासीयांना शांतता आणि सुरक्षितता सुनिश्चित करणे, ही पंतप्रधानांची जबाबदारी आहे. यापासून मागे हटणे म्हणजे कर्तव्यापासून दूर जाणे होय, अशी टीकाही प्रियंका गांधी यांनी केली. 

२०२३ पासून संघर्ष सुरूमणिपूरमध्ये २०२३ पाहून तीव्र संघर्ष पेटला आहे. एका रिपोर्टनुसार, या संघर्षात २५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर हजारो लोक विस्थापित झाले आहेत. मणिपूर विधानसभेत ६० जागा आहेत, त्यापैकी एक जागा अजूनही रिक्त आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीत ३२ मेइतेई आमदार, तीन मणिपुरी मुस्लिम आमदार आणि नऊ नागा आमदार आहेत. त्यांची एकूण संख्या ४४ आहे. याशिवाय काँग्रेसकडे पाच मेइतेई जागा आहेत, तर उर्वरित १० आमदार कुकी आहेत, ज्यात भाजपचे सात बंडखोर, कुकी पीपल्स अलायन्सचे दोन आणि एक अपक्ष आहे. तुम्हाला सांगतो की मेइतेई गट मणिपूरची प्रादेशिक अखंडता राखण्याचा आग्रह धरत आहे, तर कुकी-झो प्रतिनिधी डोंगराळ जिल्ह्यांमध्ये स्वतंत्र प्रशासनाची मागणी करत आहेत. त्यामुळे मे २०२३ पासून तणाव सुरू आहे.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारPriyanka Gandhiप्रियंका गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस