शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 17:31 IST

Priyanka Gandhi: पंतप्रधानांनी मणिपूर अशा अवस्थेत का सोडले आहे? प्रियंका गांधींचा प्रश्न

Priyanka Gandhi on Manipur: गेल्या काही महिन्यांपासून शांत असलेल्या मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आला आहे. शनिवारी रात्री मेतेई संघटनेच्या नेत्या अरामबाई टेंगोल आणि इतर अनेक नेत्यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर हिंसाचार सुरू झाला. निदर्शकांनी रस्त्यांवर उतरुन बसेस जाळल्या, मालमत्तेची तोडफोड केली. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने बिष्णुपूर जिल्ह्यात कर्फ्यू लागू केला असून, पाच जिल्ह्यांमध्ये इंटरनेटवर बंदी घातली आहे. दरम्यान, आता या हिंसाचारावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची प्रतिक्रिया आली आहे.

काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी मणिपूरबाबत सरकारवर निशाणा साधला आहे. एका ट्विटमध्ये प्रियांका गांधी यांनी लिहिले की, मणिपूर पुन्हा एकदा हिंसाचाराच्या विळख्यात सापडला आहे. गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील जनता हिंसाचार, खून, बलात्कार आणि स्थलांतराला तोंड देत आहे. शेकडो लोक मृत्युमुखी पडले आहेत, हजारो लोक बेघर आहेत. केंद्राचे राज्य असूनही तिथे शांतता प्रस्थापित होत नसल्याचे कारण काय? पंतप्रधानांनी मणिपूर अशा अवस्थेत का सोडले आहे? असा प्रश्न त्यांनी विचारला.

आजपर्यंत पंतप्रधान मणिपूरला गेले नाहीत, राज्याच्या कोणत्याही प्रतिनिधीला भेटले नाहीत, कधीही शांततेचे आवाहन केले नाही किंवा कोणतेही ठोस प्रयत्न केले नाहीत. ही असंवेदनशील आणि बेजबाबदार वृत्ती कोणत्याही लोकशाहीसाठी अत्यंत दुर्दैवी आहे. देशवासीयांना शांतता आणि सुरक्षितता सुनिश्चित करणे, ही पंतप्रधानांची जबाबदारी आहे. यापासून मागे हटणे म्हणजे कर्तव्यापासून दूर जाणे होय, अशी टीकाही प्रियंका गांधी यांनी केली. 

२०२३ पासून संघर्ष सुरूमणिपूरमध्ये २०२३ पाहून तीव्र संघर्ष पेटला आहे. एका रिपोर्टनुसार, या संघर्षात २५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर हजारो लोक विस्थापित झाले आहेत. मणिपूर विधानसभेत ६० जागा आहेत, त्यापैकी एक जागा अजूनही रिक्त आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीत ३२ मेइतेई आमदार, तीन मणिपुरी मुस्लिम आमदार आणि नऊ नागा आमदार आहेत. त्यांची एकूण संख्या ४४ आहे. याशिवाय काँग्रेसकडे पाच मेइतेई जागा आहेत, तर उर्वरित १० आमदार कुकी आहेत, ज्यात भाजपचे सात बंडखोर, कुकी पीपल्स अलायन्सचे दोन आणि एक अपक्ष आहे. तुम्हाला सांगतो की मेइतेई गट मणिपूरची प्रादेशिक अखंडता राखण्याचा आग्रह धरत आहे, तर कुकी-झो प्रतिनिधी डोंगराळ जिल्ह्यांमध्ये स्वतंत्र प्रशासनाची मागणी करत आहेत. त्यामुळे मे २०२३ पासून तणाव सुरू आहे.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारPriyanka Gandhiप्रियंका गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस