शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

सोनभद्र हत्याकांड: प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात, यूपीतील राजकारण तापले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 1:14 PM

उत्तर प्रदेशमध्ये सोनभद्र जिल्ह्यातील हत्याकांड प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे.

लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये सोनभद्र जिल्ह्यातील हत्याकांड प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी आज वाराणसीत जाऊन याप्रकरणातील जखमींची भेट घेतली. त्यानंतर  प्रियंका गांधी सोनभद्रला जात असतानाच, त्यांचा वाहनताफा पोलिसांकडून अडविण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना आपल्या ताब्यात घेतले आणि चुनार गेस्ट हाऊसला नेले. याविरोधात प्रियंका गांधी यांनी आपल्या समर्थकांसह धरणे धरले आहे. 

 

'आम्ही फक्त पीडित कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. माझ्यासोबत फक्त चार जण असतील असेही सांगितले होते. तरीही प्रशासन आम्हाला त्याठिकाणी जाऊ देत नाही. आम्हाला का अडवले आहे, त्याचे त्यांनी द्यायलाच हवे.' असे यावेळी प्रियंका गांधी यांनी सांगितले. याशिवाय, मला कुठे घेऊन जात आहेत याची कल्पना नाही. पण जिथे घेऊन जातील तिथे जायला मी तयार आहे. तुम्हाला काय करायचे आहे, ते करा आता झुकणार नाही, असेही प्रियंका गांधी यांनी सांगितले. 

दरम्यान, सोनभद्र या ठिकाणी जमिनीच्या वादातून 10 जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणात मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांची भेट घेण्यासाठी प्रियंका गांधी सोनभद्रला निघाल्या होत्या. त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. सोनभद्र या ठिकाणी कलम 144 अर्थात जमावबंदी संदर्भातले कलमही लागू करण्यात आले आहे. 

टॅग्स :Sonbhadra Shootoutसोनभद्र हत्याकांडUttar Pradeshउत्तर प्रदेशPriyanka Gandhiप्रियंका गांधी