शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
2
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
3
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
4
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
5
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
6
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
7
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
8
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
9
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
10
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
11
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
12
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
13
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
14
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
15
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
16
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
17
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
18
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
19
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

शेतकऱ्यांनो, एकही पाऊल मागे घेऊ नका, आम्ही तुमच्या पाठिशी आहोत: प्रियंका गांधी

By देवेश फडके | Updated: February 10, 2021 17:16 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका, चीन, पाकिस्तान अशा अनेकविध देशात गेले. मात्र, ज्या शहरात राहतात, तेथील सीमेवर आले नाहीत. शेतकऱ्यांनो, काही झाले तरी एकही पाऊल मागे हटू नका. आम्ही तुमच्या पाठिशी आहोत. जोपर्यंत अन्यायकारक असलेले कृषी कायदे रद्द होत नाहीत, तोपर्यंत आपल्या मतांवर ठाम राहा, असे आवाहन प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी यावेळी बोलताना केले. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली.

ठळक मुद्देप्रियंका गांधींची भाजप सरकारवर जोरदार टीकाकाँग्रेस सत्तेत आल्यास कृषी कायदे रद्द करण्याचे आश्वसानपंतप्रधान मोदींवरही साधला निशाणा

सहारनपूर : किसान महापंचायतच्या माध्यमातून काँग्रेसउत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा आपली ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी आज (बुधवारी) आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी प्रियंका गांधी यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आतापासून तयारीला लागली आहे, असे सांगितले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रियंका गांधी किसान महापंचायमध्ये सहभागी झाल्याचे म्हटले जात आहे. (priyanka gandhi criticized bjp government in kisan mahapanchayat at saharanpur)

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका, चीन, पाकिस्तान अशा अनेकविध देशात गेले. मात्र, ज्या शहरात राहतात, तेथील सीमेवर आले नाहीत. शेतकऱ्यांनो, काही झाले तरी एकही पाऊल मागे हटू नका. आम्ही तुमच्या पाठिशी आहोत. जोपर्यंत अन्यायकारक असलेले कृषी कायदे रद्द होत नाहीत, तोपर्यंत आपल्या मतांवर ठाम राहा, असे आवाहन प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी यावेळी बोलताना केले. तत्पूर्वी, सहारनपूर येथील शाकंभरी मंदिरात जाऊन प्रियंका गांधी यांनी दर्शन घेतले आणि त्यानंतर किसान महापंचायतमध्ये सहभागी झाल्या.

पंतप्रधानांकडून शेतकऱ्यांचा अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. शेतकऱ्यांना आंदोलजीवी म्हटले गेले. याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? आंदोलन करत असलेले शेतकरी आपल्या मातीसाठी, जमिनींसाठी लढा देत आहेत. आंदोलकांना देशद्रोही म्हणणारे देशभक्त असूच शकत नाही, अशी बोचरी टीकाही प्रियंका गांधी यांनी केली. 

क्रोनीजीवी... देश विकायला निघालाय तो, आंदोलनजीवीवरुन राहुल गांधींचा टोला

हृदयात केवळ उद्योगपतींसाठी स्थान

५६ इंची छाती असलेल्या व्यक्तींच्या हृदयात केवळ उद्योगपतींना स्थान आहे, असा दावा करत कृषी कायद्याच्या माध्यमातून शेती आणि शेतकरी यांना संपुष्टात आणण्याचा केंद्र सरकारचा डाव असल्याचा आरोपही प्रियंका गांधी यांनी केला. तसेच काँग्रेसचे सरकार आल्यास कृषी कायदे रद्द करण्यात येतील, असे आश्वासनही प्रियंका गांधी यांनी यावेळी बोलताना दिले. 

दरम्यान, राहुल गांधींनी केवळ एक ट्विट करून मोदींनी क्रोनीजीवी असे म्हटलेय. क्रोनी म्हणजे मैत्रीजीवी... असे म्हणत राहुल गांधींनी मोदींना टोला लगावला. तसेच, देश विकायला लागलाय तो... असे म्हणत राहुल गांधांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीकाही केली. बाबा रामदेव, किरण बेदी, अण्णा हजारे आणि त्यांच्या लोकांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे वक्तव्य जरा निर्दयी वाटत नाही का? असा खोचक प्रश्न शशी थरुर यांनी आपल्या ट्विटमधून विचारला. 

टॅग्स :PoliticsराजकारणPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसFarmers Protestशेतकरी आंदोलनUttar Pradeshउत्तर प्रदेश