शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

शेतकऱ्यांनो, एकही पाऊल मागे घेऊ नका, आम्ही तुमच्या पाठिशी आहोत: प्रियंका गांधी

By देवेश फडके | Updated: February 10, 2021 17:16 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका, चीन, पाकिस्तान अशा अनेकविध देशात गेले. मात्र, ज्या शहरात राहतात, तेथील सीमेवर आले नाहीत. शेतकऱ्यांनो, काही झाले तरी एकही पाऊल मागे हटू नका. आम्ही तुमच्या पाठिशी आहोत. जोपर्यंत अन्यायकारक असलेले कृषी कायदे रद्द होत नाहीत, तोपर्यंत आपल्या मतांवर ठाम राहा, असे आवाहन प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी यावेळी बोलताना केले. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली.

ठळक मुद्देप्रियंका गांधींची भाजप सरकारवर जोरदार टीकाकाँग्रेस सत्तेत आल्यास कृषी कायदे रद्द करण्याचे आश्वसानपंतप्रधान मोदींवरही साधला निशाणा

सहारनपूर : किसान महापंचायतच्या माध्यमातून काँग्रेसउत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा आपली ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी आज (बुधवारी) आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी प्रियंका गांधी यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आतापासून तयारीला लागली आहे, असे सांगितले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रियंका गांधी किसान महापंचायमध्ये सहभागी झाल्याचे म्हटले जात आहे. (priyanka gandhi criticized bjp government in kisan mahapanchayat at saharanpur)

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका, चीन, पाकिस्तान अशा अनेकविध देशात गेले. मात्र, ज्या शहरात राहतात, तेथील सीमेवर आले नाहीत. शेतकऱ्यांनो, काही झाले तरी एकही पाऊल मागे हटू नका. आम्ही तुमच्या पाठिशी आहोत. जोपर्यंत अन्यायकारक असलेले कृषी कायदे रद्द होत नाहीत, तोपर्यंत आपल्या मतांवर ठाम राहा, असे आवाहन प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी यावेळी बोलताना केले. तत्पूर्वी, सहारनपूर येथील शाकंभरी मंदिरात जाऊन प्रियंका गांधी यांनी दर्शन घेतले आणि त्यानंतर किसान महापंचायतमध्ये सहभागी झाल्या.

पंतप्रधानांकडून शेतकऱ्यांचा अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. शेतकऱ्यांना आंदोलजीवी म्हटले गेले. याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? आंदोलन करत असलेले शेतकरी आपल्या मातीसाठी, जमिनींसाठी लढा देत आहेत. आंदोलकांना देशद्रोही म्हणणारे देशभक्त असूच शकत नाही, अशी बोचरी टीकाही प्रियंका गांधी यांनी केली. 

क्रोनीजीवी... देश विकायला निघालाय तो, आंदोलनजीवीवरुन राहुल गांधींचा टोला

हृदयात केवळ उद्योगपतींसाठी स्थान

५६ इंची छाती असलेल्या व्यक्तींच्या हृदयात केवळ उद्योगपतींना स्थान आहे, असा दावा करत कृषी कायद्याच्या माध्यमातून शेती आणि शेतकरी यांना संपुष्टात आणण्याचा केंद्र सरकारचा डाव असल्याचा आरोपही प्रियंका गांधी यांनी केला. तसेच काँग्रेसचे सरकार आल्यास कृषी कायदे रद्द करण्यात येतील, असे आश्वासनही प्रियंका गांधी यांनी यावेळी बोलताना दिले. 

दरम्यान, राहुल गांधींनी केवळ एक ट्विट करून मोदींनी क्रोनीजीवी असे म्हटलेय. क्रोनी म्हणजे मैत्रीजीवी... असे म्हणत राहुल गांधींनी मोदींना टोला लगावला. तसेच, देश विकायला लागलाय तो... असे म्हणत राहुल गांधांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीकाही केली. बाबा रामदेव, किरण बेदी, अण्णा हजारे आणि त्यांच्या लोकांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे वक्तव्य जरा निर्दयी वाटत नाही का? असा खोचक प्रश्न शशी थरुर यांनी आपल्या ट्विटमधून विचारला. 

टॅग्स :PoliticsराजकारणPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसFarmers Protestशेतकरी आंदोलनUttar Pradeshउत्तर प्रदेश