शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनो, एकही पाऊल मागे घेऊ नका, आम्ही तुमच्या पाठिशी आहोत: प्रियंका गांधी

By देवेश फडके | Updated: February 10, 2021 17:16 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका, चीन, पाकिस्तान अशा अनेकविध देशात गेले. मात्र, ज्या शहरात राहतात, तेथील सीमेवर आले नाहीत. शेतकऱ्यांनो, काही झाले तरी एकही पाऊल मागे हटू नका. आम्ही तुमच्या पाठिशी आहोत. जोपर्यंत अन्यायकारक असलेले कृषी कायदे रद्द होत नाहीत, तोपर्यंत आपल्या मतांवर ठाम राहा, असे आवाहन प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी यावेळी बोलताना केले. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली.

ठळक मुद्देप्रियंका गांधींची भाजप सरकारवर जोरदार टीकाकाँग्रेस सत्तेत आल्यास कृषी कायदे रद्द करण्याचे आश्वसानपंतप्रधान मोदींवरही साधला निशाणा

सहारनपूर : किसान महापंचायतच्या माध्यमातून काँग्रेसउत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा आपली ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी आज (बुधवारी) आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी प्रियंका गांधी यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आतापासून तयारीला लागली आहे, असे सांगितले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रियंका गांधी किसान महापंचायमध्ये सहभागी झाल्याचे म्हटले जात आहे. (priyanka gandhi criticized bjp government in kisan mahapanchayat at saharanpur)

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका, चीन, पाकिस्तान अशा अनेकविध देशात गेले. मात्र, ज्या शहरात राहतात, तेथील सीमेवर आले नाहीत. शेतकऱ्यांनो, काही झाले तरी एकही पाऊल मागे हटू नका. आम्ही तुमच्या पाठिशी आहोत. जोपर्यंत अन्यायकारक असलेले कृषी कायदे रद्द होत नाहीत, तोपर्यंत आपल्या मतांवर ठाम राहा, असे आवाहन प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी यावेळी बोलताना केले. तत्पूर्वी, सहारनपूर येथील शाकंभरी मंदिरात जाऊन प्रियंका गांधी यांनी दर्शन घेतले आणि त्यानंतर किसान महापंचायतमध्ये सहभागी झाल्या.

पंतप्रधानांकडून शेतकऱ्यांचा अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. शेतकऱ्यांना आंदोलजीवी म्हटले गेले. याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? आंदोलन करत असलेले शेतकरी आपल्या मातीसाठी, जमिनींसाठी लढा देत आहेत. आंदोलकांना देशद्रोही म्हणणारे देशभक्त असूच शकत नाही, अशी बोचरी टीकाही प्रियंका गांधी यांनी केली. 

क्रोनीजीवी... देश विकायला निघालाय तो, आंदोलनजीवीवरुन राहुल गांधींचा टोला

हृदयात केवळ उद्योगपतींसाठी स्थान

५६ इंची छाती असलेल्या व्यक्तींच्या हृदयात केवळ उद्योगपतींना स्थान आहे, असा दावा करत कृषी कायद्याच्या माध्यमातून शेती आणि शेतकरी यांना संपुष्टात आणण्याचा केंद्र सरकारचा डाव असल्याचा आरोपही प्रियंका गांधी यांनी केला. तसेच काँग्रेसचे सरकार आल्यास कृषी कायदे रद्द करण्यात येतील, असे आश्वासनही प्रियंका गांधी यांनी यावेळी बोलताना दिले. 

दरम्यान, राहुल गांधींनी केवळ एक ट्विट करून मोदींनी क्रोनीजीवी असे म्हटलेय. क्रोनी म्हणजे मैत्रीजीवी... असे म्हणत राहुल गांधींनी मोदींना टोला लगावला. तसेच, देश विकायला लागलाय तो... असे म्हणत राहुल गांधांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीकाही केली. बाबा रामदेव, किरण बेदी, अण्णा हजारे आणि त्यांच्या लोकांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे वक्तव्य जरा निर्दयी वाटत नाही का? असा खोचक प्रश्न शशी थरुर यांनी आपल्या ट्विटमधून विचारला. 

टॅग्स :PoliticsराजकारणPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसFarmers Protestशेतकरी आंदोलनUttar Pradeshउत्तर प्रदेश