शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

भाजप सरकार गुंडांना खुले संरक्षण देतायत : प्रियंका गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 15:38 IST

भाजपचे मंत्री जेलमधून बाहेर आलेल्या गुंडाच्या गळ्यात हार घालून स्वागत करतात.

नवी दिल्ली : अहमदाबादमध्ये एबीव्हीपी आणि एनएसयूआय कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यावरून काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजप सरकार गुंडांना खुले संरक्षण देत असल्याचा आरोप प्रियंका गांधी यांनी केला आहे. तर या हिंसक घटनेला भाजपला जवाबदार ठरवत प्रियंका गांधी यांनी ट्वीट केलं आहे.

सोमवारी अहमदाबाद येथे एबीव्हीपीच्या कार्यालयाबाहेर जेएनयूमधील हिंसाचाराविरोधात आंदोलन होत होते. त्याचवेळी एनएसयूआय आणि एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर दोन्हीकडून एकमेकांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. या हामाणारीत सुमारे 10 जण जखमी झाले होते. तर या घटनेला भाजप कारणीभूत असल्याचा आरोप करत, प्रियंका गांधी यांनी भाजपवर टीका केली आहे.

भाजप सरकार गुंडांना खुले संरक्षण देत आहे. तर भाजपचे मंत्री जेलमधून बाहेर आलेल्या गुंडाच्या गळ्यात हार घालून स्वागत करतात. आता तर रस्त्यावर सुद्धा कायद्याचा धाख उरला नसल्याचा आरोप प्रियंका गांधी यांनी केला आहे. तर त्यांनी व्हिडिओ शेयर करत, गुजरात सरकारबरोबर पोलिसांवर सुद्धा आरोप केले आहेत. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांवर एबीव्हीपीच्या गुंडांनी हल्ला केला असल्याचं प्रियंका गांधी म्हणाल्या.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीjnu attackजेएनयूcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण