शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

पंतप्रधानांची शिस्त आणि प्रदूषणाविषयीची चिंता; कॅबिनेट मंत्र्यांच्या गाडीतूनच येतात राज्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 9:14 AM

कॅबिनेट मंत्र्यांच्या गाडीतूनच येतात राज्यमंत्री

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली प्रदूषणाच्या विळख्यात आहे. दिवाळीच्या दिवशी येथील वायु गुणवत्ता निर्देशांक १००० वर गेला होता. अजुनही येथील प्रदूषण धोकादायक पातळीत आहे. केंद्र आणि राज्य सरकार त्यांच्या स्तरावर प्रयत्न करीत असतातच. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहनांची अनावश्यक एनर्जी वाचविण्याचा व प्रदूषण टाळण्यासाठी अभिनव प्रयोग सुरू केला आहे. 

दर पंधरा दिवसाला पंतप्रधान मंत्री परिषदेची बैठक घेत असतात. येथील सुषमा स्वराज मेमोरियल हॉलमध्ये ही बैठक पार पडते. पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळात ३० कॅबिनेट, २ स्वतंत्र प्रभार असलेले, तर ४५ राज्यमंत्री आहेत. या बैठकीला आता कॅबिनेट मंत्र्यांच्या वाहनातून दोन राज्यमंत्री येतात. यामुळे वाहनांचा ताफा एकतृतीयांश कमी होतो.

मंत्र्यांच्या मागेपुढे असणाऱ्या सुरक्षा वाहनांनाही फाटा देण्यात आला आहे. प्रदूषण आणि अनावश्यक वाहने पाहता मोदींनी ‘कार पूल’ करण्याचा हा अभिनव प्रयोग सुरू केला आहे. प्रत्येक मंत्र्याने त्यांच्या विभागात फेरफटका मारून अधिकारी ते कारकुनापर्यंत सगळ्यांशी चर्चा करावी, त्यांच्या संपर्कात असावे आणि मंत्र्यांच्या टेबलावर कोणतीही फाइल चार दिवसांपेक्षा अधिक काळ पडून राहू नये, अशा सूचना पंतप्रधान मोदी यांनी दिल्या आहेत.

  • कोणत्या कॅबिनेट मंत्र्यांसह तुम्ही बैठकीला यायचे आहे याची सूचना राज्यमंत्र्यांना पंतप्रधान कार्यालयातून देण्यात येते. या प्रवासातून कॅबिनेट व राज्यमंत्र्यामध्ये सौहार्द, संवाद वाढविणे हाही उद्देश आहे. 
  • विशेष म्हणजे या बैठकीत पंतप्रधान सगळ्यात मागे बसतात. ज्या मंत्र्यांचे नाव घेतले गेले की, त्याने आपल्या विभागाने काय केले, याबाबतचा आढावा सादर करायचा असतो. 
  • यात केवळ २० मंत्र्यांचा नंबर लागतो. परंतु कोणत्या मंत्र्यांचे नाव पुकारले जाईल हे त्या वेळेपर्यंत त्या मंत्र्यालाही माहीत नसते. त्यामुळे सगळेच संपूर्ण तयारीनिशी जातात. 
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीenvironmentपर्यावरणIndiaभारत