शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

अरुणाचल प्रदेशात ‘पीआरसी’ने भाजपा घायाळ; काँग्रेस ४२ जागा आणू शकेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 06:32 IST

लोकसभेपेक्षा विधानसभेच्या ६0 जागांवरच लक्ष

- कुंदन पाटीलअरूणाचल प्रदेशात लोकसभेच्या दोन जागांसह विधानसभेच्या ६0 जागांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकांच्या आधी सहा जाती-जमातींना स्थायी रहिवास प्रमाणपत्र (पीआरसी) देण्याचा प्रयत्न भाजपाच्या अंगी आला आहे. या निर्णयाला विरोध करणाऱ्या जनतेला काँग्रेससहभाजपाविरोधी सर्वच घटक पक्षांनी पाठिंबा दिल्याने अरुणाचल विधानसभेच्या पटलावरच येण्यापूर्वीच ‘पीआरसी’च्या शिफारशी बासनात गेल्या. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा भाजपासाठी अडचणीचा ठरणार आहे.राज्यात लोकसभेच्या दोनच जागा आहेत. त्यामुळे स्थानिक जनता लोकसभेपेक्षा विधानसभेच्या ६0 जागांसाठी कसे मतदार करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आता तिथे भाजपाचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या नेतृत्वाखालील सरकार असले तरी २0१४ साली विधानसभेत काँग्रेसला ४२ जागांवर तर भाजपाला केवळ ११ जागांवरच यश मिळाले होते. काँग्रेसचे नबाम तुकी मुख्यमंत्री झाले. पण केंद्रातील सत्तेच्या आधारे भाजपाने येथील काँग्रेसमध्ये फूट पाडली आणि कालिखो पूल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे आमदार भाजपामध्ये आणले. कालिखो पूल फेब्रुवारी २0१६ मध्ये मुख्यमंत्री झाले. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. पुढे कालिखो पूल यांनी आॅगस्ट २0१६ मध्ये आत्महत्या केली. राज्यात २0१६ पासून पेमा खांडू मुख्यमंत्री आहेत आणि २0१४ साली ११ आमदार असलेल्या भाजपाकडे आज ४८ आमदार आहेत. त्यापैकी ३७ काँग्रेसमधून आलेले. त्यामुळे जनता आता भाजपाच्या हाती सत्ता देणार की पूर्वीप्रमाणे काँग्रेसला, हे पाहणे रंजक ठरेल.नामसाई व चांगलांग जिल्ह्यांतील ६ आदिवासी जाती-जमातींना स्थायी निवासी प्रमाणपत्र देण्याची तयारी सुरु केली. त्यासाठीच्या समितीने देवरीस, सोनोवाल, कछारी, मोरांस, आदिवासी आणि मिशींग या जमातींना ‘पीआरसी’ देण्यासंदर्भात अभ्यास सुरू केला. बिगर निवासी आणि बिगर आदिवासींना निवासी प्रमाणपत्र दिल्यास स्थानिक आदिवासींवर अन्याय होईल म्हणून जनतेत केंद्र व राज्य सरकारविरोधात जनता रस्त्यावर उतरली.काँग्रेस आणि पीपल्स पार्टी आॅफ अरुणाचलला (पीपीए) मुख्यमंत्री पेमा खांडू आणि अरुणाचलमधून निवडून आलेले केंद्रीय मंत्री किरेन रिजुजू याना लक्ष्य करण्याची संधी मिळाली. तिकडे अरुणाचलच्या जनतेने आंदोलनाला हिंसक वळण दिले. गोळीबार झाला. त्यात तीन जण मरण पावले. तो राग आजही धुमसत आहे. संचारबंदी लागली. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हिंसक आंदोलन झाले. उपमुख्यमंत्र्यांच्या घराला आग लावली. तेव्हा नमती भूमिका घेत राज्य सरकारने संयुक्त उच्चाधिकार समितीचा अहवाल पटलावर येण्यापूर्वीच विधानसभेचे कामकाज गुंडाळले. ‘पीआरसी’ देण्याचा विचार आहे. त्यासाठी समिती नेमली आहे. ही समिती केवळ शिफारस करणार आहे, असे आता सरकार सांगत आहे.तिकडे २२ वर्ष मुख्यमंत्री राहिलेल्या माजी मुख्यमंत्री गेगांग अपांग यांनी भाजपाला रामराम केला आणि माजी पंतप्रधान एच.पी.देवेगौडा यांच्या जनता दल सेक्युलरमध्ये (जेडीएस) प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीत तेही भाजपाविरोधात मैदानात येणार आहे.वाढती गुन्हेगारी ही खांडूंची डोकेदुखीभाजपाने खांडूंचा चेहरा पुढे करीत निवडणुकींना सामोरे जाण्याचे ठरविले आहे. कोळसा घोटाळा, पत्रकारांवरील हल्ले, दरोडा, हत्यांसह जवळपास दीडशे महिलांवर अत्याचाराचा मुद्दा निवडणूक काळात तापणार आहे. सर्वच विरोधी पक्ष या मुद्यावरुन भाजपाला घेरण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री खांडू यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.आयाराम-गयारामांची जत्रा भरणारअरुणाचलमध्ये लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणुकीला महत्त्व दिले जात आहे. अरुणाचल प्रदेश पूर्वमध्ये काँग्रेसचे निनोग इरिंग तर पश्चिममध्ये भाजपाचे किरेन रिजूजू विद्यमान खासदार आहेत. दोघांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. त्यामुळे भाजपा आणि काँग्रेसला प्रत्येकी एक उमेदवाराचा शोध करावा लागत आहे. आगामी काळात आयाराम-गयारामांची जत्रा भरणार आहे. त्याचा फटका काँग्रेसला बसल्यास भाजपाचा विजयाची वाट सुकर होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Arunachal Pradeshअरुणाचल प्रदेशcongressकाँग्रेसBJPभाजपा