शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

काँग्रेस-जेडीएसनं 'ती' खेळी केल्यास महाराष्ट्रासोबतच कर्नाटकातही निवडणूक!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 12:44 PM

सर्वोच्च न्यायालयाने बंडखोर आमदारांना उद्याच्या बहुमत चाचणीवेळी हजर राहण्यासाठी जबरदस्ती करू शकत नसल्याचेही म्हटले आहे. यामुळे उद्याच्या चाचणीवेळी काँग्रेस-जेडीएसचे कुमारस्वामी सरकार पडण्याची दाट शक्यता आहे.

बेंगळुरू : कर्नाटकमधील सत्तेचे राजकीय 'नाटक' गेल्या दोन आठवड्यांपासून सुरूच आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने बंडखोर आमदारांच्या याचिकेवर दिलेल्या निर्णयामुळे येत्या दोन दिवसांत सर्व परिस्थिती समोर येण्याची शक्यता आहे. मात्र, विधानसभा अध्यक्षांना 16 बंडखोर आमदारांचे राजीनामे मंजूर करण्यासाठी वेळेचे बंधन नसल्याने नवा पेच निर्माण झाला आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने बंडखोर आमदारांना उद्याच्या बहुमत चाचणीवेळी हजर राहण्यासाठी जबरदस्ती करू शकत नसल्याचेही म्हटले आहे. यामुळे उद्याच्या चाचणीवेळी काँग्रेस-जेडीएसचे कुमारस्वामी सरकार पडण्याची दाट शक्यता आहे. मात्र, भाजपकडेही बहुमताचा 113 हा आकडा नसल्याने फेरनिवडणूक करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. राज्यपाल भाजपाला बहुमत सिद्ध करण्याचा प्रस्ताव देवू शकतात. पण यामध्येही पेच निर्माण झाला आहे. 

कर्नाटकमध्ये काँग्रेसचे 79, जेडीएसचे 37 आणि बसपा 1 असे 117 बहुमत होते. तर भाजपाकडे 105, अपक्ष 1 आणि केपीजेपीचा 1 असे 107 मते आहेत. यापैकी काँग्रेसच्या 13 आणि जेडीएसच्या 3 आमदारांनी राजीनामे दिले आहेत. विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी या बंडखोर आमदारांचे राजीनामे बहुमत चाचणीच्या आधी मंजूर केले नाहीत तर हे आमदार अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. चाचणीवेळी कुमारस्वामी सरकार अल्पमतात असणार आहे. भाजपा 107 विरुद्ध 101 मतांनी जेडीएस-काँग्रेसवर मात करेल. 

कुमारस्वामी सरकारला बहुमत सिद्ध करण्यात अपयश आल्यास राज्यपाल भाजपाला सत्तास्थापनेची संधी देऊ शकतात. जर बंडखोर आमदारांचे राजीनामे मंजूर झालेले नसतील तर भाजपाला बहुमताचा 113 आकडा गाठावा लागणार आहे. मात्र, बंडखोर आमदारांचे राजीनामे मंजूर झाल्यास भाजपाचा मुख्यमंत्री बसण्याची शक्यता आहे. कारण विधानसभेचा 224 चा आकडा 209 वर येणार आहे आणि बहुमतासाठीचा आकडा 113 वरून 106 वर येणार आहे. 

 

'ती' खेळी केल्यास पुन्हा निवडणूकभाजपाने जरी बंडखोर आमदारांना सुप्त पाठिंबा दिलेला असला तरीही कुमारस्वामी यांचे सरकार पाडून येडीयुराप्पांना मुख्यमंत्री होणे कठीण जाणार आहे. कारण उद्या बहुमत चाचणीच्या शेवटच्या क्षणापर्यंत सत्तेचे धागे काँग्रेस-जेडीएसच्याच हातात असणार आहेत. कुमारस्वामींकडे मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्याचा मार्ग मोकळा आहे. या बैठकीत जर विधानसभा भंग करण्याचा निर्णय झाला तर भाजपचे सत्ता स्थापनेचे स्वप्न भंगणार आहे. असे झाल्यास येत्या काळात महाराष्ट्रासोबतच कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणूक लागण्याची शक्यता आहे.  

 

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणkumarswamyकुमारस्वामीYeddyurappaयेडियुरप्पाcongressकाँग्रेसBJPभाजपाJanata Dal (Secular)जनता दल (सेक्युलर)Maharashtraमहाराष्ट्र