शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
4
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
5
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
6
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

PM Narendra Modi: “अथक मेहनत, कठोर परिश्रमाने जनतेचा विश्वास जिंकलाय, PR करून नाही”: PM नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2021 3:14 PM

कोणत्याही शाही घराण्यातून येत नसल्यामुळे PR एजन्सीमुळे ही कामगिरी साध्य झालेली नाही, असे रोखठोक प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

ठळक मुद्देजनतेसाठी सर्वकाही, स्वतःसाठी काहीच नाहीअथक मेहनत, कठोर परिश्रमाने जनतेचा विश्वास जिंकलायकोणत्याही शाही घराण्यातून येत नसल्यामुळे PR एजन्सीमुळे ही कामगिरी साध्य झालेली नाही

नवी दिल्ली: सार्वजनिक जीवनात येण्यापूर्वी ३० ते ३५ वर्षे सामाजिक कार्यकर्ता म्हणून व्यतीत केले आहेत. या कालावधीत जीवनाचा मोठा अनुभव घेतला आहे. सामान्य माणसाच्या अडचणी, आकांक्षा आव्हाने आणि क्षमता जवळून आकलन केले आहे. अथक मेहनत आणि कठोर परिश्रमानेच जनतेचा विश्वास जिंकला आहे. कोणत्याही शाही घराण्यातून येत नसल्यामुळे PR एजन्सीमुळे ही कामगिरी साध्य झालेली नाही, असे रोखठोक प्रतिपादन पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी केले आहे. एका नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान पंतप्रधान मोदी बोलत होते.  (pm narendra modi says we gather public trust with hard working not using pr agencies)

आमच्या कार्यकाळात राबवण्यात आलेली धोरणे, घेतलेले निर्णय सामान्य जनतेच्या समस्या कमी करणारे ठरले. म्हणूनच जनता आम्हाल त्यांच्यातील एक असेच समजते. पंतप्रधानपदी असलेली व्यक्तीला आपल्या अडचणींची जाणीव आहे, ही बाब जनतेला माहिती आहे, असेही पंतप्रधान मोदींनी नमूद केले. PR एजन्सीचा वापर करून प्रतिमा संवर्धन करण्याविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, पंतप्रधानपदी असलेली व्यक्ती जनतेला आपल्याच घरातील एक सदस्य वाटते. जनतेला असलेला विश्वास कोणत्याही PR एजन्सीमुळे आलेला नाही. तर, तो अथक प्रयत्नांनी संपादन केला आहे. त्यासाठी खूप घाम गाळला आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. 

जनतेसाठी सर्वकाही, स्वतःसाठी काहीच नाही

देशवासीयांसाठी शौचालये उभारून एका प्रकारे सेवा करण्याचे कोणाच्याही मनात आले नाही. ते आम्ही करून दाखवले. आम्ही घेतलेल्या निर्णयांमुळे सामान्य जनतेला वाटते की, पंतप्रधान असलेली व्यक्ती आपल्यासारखाच विचार करतो, आपल्या समस्या जाणतो आणि म्हणूनच आपोआप ते घरातील माणूस असल्यासारखे समजतात. जिथे जातो, तिथे भरपूर प्रेम जनतेचे मिळते. जे काही आहे, ते सर्व जनतेचे आणि जनतेसाठीच आहे. स्वतःसाठी काहीच करणार आहे. सर्व जीवन देशाच्या आणि देशवासीयांसाठी समर्पित आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, गेली सात वर्षे आम्ही सत्तेत आहोत. जनतेचा आमच्याबद्दल असलेला विश्वास आणखी मजबूत होत आहे. तसेच गेल्या सात वर्षातील कामगिरी हीदेखील जनतेच्या विश्वासामुळेच साध्य होऊ शकली, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानBJPभाजपाPoliticsराजकारण