शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

जम्मू-काश्मीरच्या विनाशाला तीन कुटुंबे जबाबदार; श्रीनगरमधून PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 14:39 IST

'काँग्रेस-एनसी-पीडीपीने राज्यात फूटीचे राजकारण केले होते. पण भाजप सर्वांना जोडत आहे.'

PM Narendra Modi in J&K :जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गुरुवारी(दि.19) श्रीनगरमध्ये आपल्या पहिल्या निवडणूक रॅलीला संबोधित केले. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. 'काल येथे पहिल्या टप्प्यातील मतदान झाले, ज्यामध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. पहिल्यांदाच राज्यात दहशतीच्या सावलीशिवाय मतदान झाले. काश्मीरच्या विध्वंसाला तीन घराणे जबाबदार आहेत, मात्र आता राज्य या घराणेशाहीच्या तावडीत राहणार नाही,' असं पीएम मोदी म्हणाले.

'कालच 7 जिल्ह्यांमध्ये पहिल्या फेरीचे मतदान झाले. पहिल्यांदाच दहशतीच्या सावलीशिवाय हे मतदान झाले. एवढ्या मोठ्या संख्येने लोक मतदानासाठी घराबाहेर पडले ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. मतदानासाठी लोक मोठ्या संख्येने बाहेर पडले. सर्वांनीही मोकळ्या मनाने मतदान केले. अनेक जागांवर मतदानाचे विक्रम मोडले. किश्तवाडमध्ये 80% पेक्षा जास्त, डोडा जिल्ह्यात 71% पेक्षा जास्त मतदान, रामबनमध्ये 70% पेक्षा जास्त आणि कुलगाममध्ये 62% पेक्षा जास्त मतदान झाले. अनेक जागांवर गतवेळचे मतदानाचे विक्रम मोडले.' 

विनाशाला तीन कुटुंबे जबाबदार : पंतप्रधान मोदीमोदी पुढे म्हणतात, 'काँग्रेस-एनसी-पीडीपीने राज्यात फूटीचे राजकारण केले होते. पण भाजप सर्वांना जोडत आहे. काश्मीरच्या विनाशाला तीन कुटुंबे जबाबदार आहेत. या तिन्ही कुटुंबांना वाटते की, त्यांच्यावर कुणी प्रश्न उपस्थित करू शकतत नाही. खुर्चीवर बसून तुम्हाला जनतेला लुटायचे आहे. तुमचा न्याय्य हक्क हिरावून घेणे हे या लोकांचे काम आहे. त्यांनी जम्मू आणि काश्मीरला फक्त अराजकता दिली. पण आता जम्मू-काश्मीर या तीन राजघराण्यांच्या ताब्यात राहणार नाही.'

दुसरी पिढी वाया जाऊ देणार नाही: पंतप्रधान मोदी'जम्मू-काश्मीरला दहशतवादापासून मुक्त करणे, जम्मू-काश्मीरविरुद्ध कट करणाऱ्या प्रत्येक शक्तीला पराभूत करणे आणि येथील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. या तीन कुटुंबांकडून दुसरी पिढी नष्ट करू देणार नाही. येथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी मी पूर्ण प्रामाणिकपणे काम करत आहे. आज जम्मू-काश्मीरमध्ये शाळा आणि महाविद्यालये सुरळीत सुरू आहेत. मुलांच्या हातात पेन, वह्या, लॅपटॉप असतात. आज राज्यात नवीन शाळा, नवीन महाविद्यालये, एम्स, वैद्यकीय महाविद्यालये, आयआयटी बांधल्याच्या बातम्या येतात,' असेही मोदी यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJammu Kashmirजम्मू-काश्मीरElectionनिवडणूक 2024congressकाँग्रेसBJPभाजपा