शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

Delhi Election 2020 : शाहीन बाग हिंसाचार योगायोग नव्हे, तर कट- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2020 5:16 PM

केजरीवालांनी गरिबांचा हक्क हिरावून घेतला आहे.

नवी दिल्लीः  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे मागणाऱ्या केजरीवालांवर लोकपाल, बाटला हाऊस एन्काऊंटर आणि CAA विरोधात शाहीन बाग सुरू असलेल्या हिंसाचारावरून टीकास्त्र सोडलं आहे. देशाच्या सौहार्दाला खंडित करण्यासाठी ही सर्व कटकारस्थानं सुरू आहेत, असं मोदी म्हणाले आहेत. दिल्लीत मोदी सरकार येण्याआधी दहशतवादी हल्ले होत होते, परंतु ते आता थांबले आहेत. गुन्हेगारांना दिल्ली पोलिसांनी ठार केल्यावर ते बनावट एन्काऊंटर असल्याचा कांगावा करण्यात आला. शाहीन बागच्या मुद्द्यावरूनही मोदींनी काँग्रेस आणि आपवर हल्लाबोल केला आहे. शाहीन बाग हिंसाचार योगायोग नव्हे, तर कट असल्याचा आरोप मोदींनी केला आहे. तसेच दिल्लीच्या लोकांना विकासासाठी सुरक्षित वातावरण पाहिजे होतं. केजरीवालांनी गरिबांचा हक्क हिरावून घेतला आहे. दिल्लीतल्या लोकांनी परिवर्तनाचं मन बनवलं असून, सर्वच स्पष्ट दिसत आहे, असं म्हणत मोदींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी कडकडडुमामध्ये पोहोचले असून, त्यांनी एका रॅलीला संबोधित केलं आहे. 

दिल्ली फक्त शहरच नसून त्याला वारसा लाभलेला आहे. दिल्लीनं नेहमीच सर्वांचा सत्कार केलेला असून, सगळ्यांनाच स्वीकारलेलं आहे. फाळणीनंतर आलेल्या किंवा इतर राज्यांतील भारतीयांना दिल्लीनं आपल्या हृदयात सामावून घेतलं आहे. दिल्लीतल्या सातही जागा आम्हाला देऊन दिल्लीचे लोक कोणत्या दिशेनं विचार करतात हे समजलं आहे.देश बदलवण्यात दिल्लीच्या लोकांचं मोठं योगदान आहे. आता मतदार मतांनी दिल्लीसुद्धा बदल घडवणार आहेत. आम्ही संसदेत दिल्लीला अवैधरीत्या कॉलनीच्या समस्यांपासून मोकळं केलं आहे. आता दिल्लीच्या लोकांना सरकारी बुलडोझरला घाबरण्याची गरज नाही. जिथे झोपड्या आहेत, तिथे पक्की घरं देण्यात येणार  आहेत. पक्क्या घरात गॅस कनेक्शन, नळ, पाणी यांसारख्या सुविधा पुरविल्या जाणार आहेत.

भाजप नकारात्मकतेचं नव्हे तर सकारात्मकतेवर विश्वास ठेवते. देशासाठी आम्ही केलेले संकल्प मोठे आहेत. देशासमोरली शेकडो आव्हाने आम्ही सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. अवैध कॉलनींचा प्रश्न कोणीही सोडवला नव्हता. कोर्टात तारखांवर तारखा पडत होत्या. पण तो प्रश्न आम्ही सोडवून दाखवला. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीdelhi electionदिल्ली निवडणूक