शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
3
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
4
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
5
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
6
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
7
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
9
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
10
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
11
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
12
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
13
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
14
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
15
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
16
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
17
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
18
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
19
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
20
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींनी वायनाडमध्ये भूस्खलनग्रस्त भागांना भेट दिली, पीडितांशीही चर्चा केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2024 18:47 IST

हवाई पाहणीनंतर पीएम मोदींचे हेलिकॉप्टर कलपेट्टा येथील एसकेएमजे विद्यालयात उतरले. येथून ते रोडने चुरलमला येथे रवाना झाले.

केरळमधील वायनाड जिल्ह्यातील भूस्खलन झालेल्या ठिकाणी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. त्यांनी चुरलमला येथे जाऊन आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. पीएम मोदी कन्नूर विमानतळावरून हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने वायनाडला पोहोचले. ३० जुलै रोजी झालेल्या भूस्खलनामुळे प्रभावित झालेल्या चुरलमला परिसरात  नुकसानीचा त्यांनी आढावा घेतला. यापूर्वी पंतप्रधान मोदींनी भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टरद्वारे भूस्खलनग्रस्त चुरलमाला, मुंडक्काई आणि पंचिरिमट्टमचे हवाई पाहणी केली होती.

"मी कधीच असं सांगितलं..."; परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हवाई पाहणीनंतर पीएम मोदींचे हेलिकॉप्टर कलपेट्टा येथील एसकेएमजे विद्यालयात उतरले. येथून ते रस्त्याने चुरलमला येथे रवाना झाले. चुरलमला येथे, आपत्तीनंतर मदत आणि बचाव कार्यात मदत करण्यासाठी लष्कराने १९० फूट लांबीचा बेली ब्रिज बांधला आहे. नुकसानीचा आढावा घेताना मोदी या पुलावरून पायी गेले. पीएम मोदींनी बचाव कर्मचारी, राज्याचे मुख्य सचिव व्ही वेणू आणि जिल्हा अधिकाऱ्यांशी संवाद साधला. 

यावेळी केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, मुख्यमंत्री पिनाराई विजयन आणि केंद्रीय पर्यटन आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी हेही त्यांच्यासोबत होते. अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी,हवाई सर्वेक्षणादरम्यान त्यांना भूस्खलनाचा केंद्रबिंदू सापडला, जो इरुवाझिंजी पुझा (नदी) च्या उगमस्थानी आहे. त्यांनी पुनचिरीमट्टम, मुंडक्काई आणि चुरलमाला या सर्वात जास्त प्रभावित क्षेत्रांचा आढावा घेतला. 

केरळमधील वायनाड जिल्ह्यात ३० जुलै रोजी झालेल्या भूस्खलनात २२६ लोकांचा मृत्यू झाला होता. या परिसरात अजूनही अनेक लोक बेपत्ता आहेत.

वायनाड दुर्घटनेची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३० जुलै रोजी बैठक घेऊन आढावा घेतला होता. त्यांनी एनडीआरएफ, लष्कर, हवाई दल आणि नौदलाला मदत आणि बचाव कार्यात सहभागी होण्याच्या सूचना दिल्या होत्या. लष्कर आणि केंद्रीय दलाच्या तिन्ही सेवांचे तसेच अग्निशमन दल आणि नागरी संरक्षणाचे १२०० हून अधिक जवान घटनास्थळी मदत आणि बचाव कार्यात होते. केंद्राने या भागाला भेट देण्यासाठी एक आंतर-मंत्रालयीन पथकही पाठवले आहे, हे ८ ऑगस्टपासून भेट देत आहे आणि बाधित भागातील नुकसानीचा आढावा घेत आहे.

टॅग्स :wayanad-pcवायनाडNarendra Modiनरेंद्र मोदी