शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
3
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
4
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
5
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
6
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
7
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
8
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
9
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
10
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
11
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
12
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
13
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
14
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
15
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
17
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
18
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
19
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
20
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना

Delhi Election 2020 : 'पंतप्रधान मोदी ताजमहालही विकतील', राहुल गांधीचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 09:16 IST

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. 'नरेंद्र मोदींनी सर्व काही विकायला काढलं आहे. त्यांनी मनात आणलं तर ते ताजमहालही विकतील' दिल्लीमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी मोदींवर टीका केली.

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. 'नरेंद्र मोदींनी सर्व काही विकायला काढलं आहे. त्यांनी मनात आणलं तर ते ताजमहालही विकतील' असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा, काँग्रेस आणि आपने जोरदार तयारी सुरू केली आहे. विधानसभेसाठी 8 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. दिल्लीमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. 

'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेक इन इंडियाची घोषणा केली आहे. ही घोषणा खूपच लोकप्रिय झाली आहे. मात्र इंडियन ऑईल, एअर इंडिया, हिंदुस्थान पेट्रोलियम, रेल्वे, लाल किल्ला हे सर्व ते विकायला निघाले आहेत. एवढंच काय मनात आलं तर उद्या ते ताजमहालही विकतील' अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी मोदींवर केली आहे. तसेच भाजपाचे काही नेते देशभक्तीबाबत बोलतात. पाकिस्तानच्या नावाने खडे फोडत आहेत. पाकिस्तानात जाऊन भारतमाता की जय म्हणण्याची हिंमत दाखवणारा एक तरी भाजपाचा नेता दाखवा, असं आव्हान देखील राहुल गांधी यांनी दिलं आहे. 

राहुल गांधी यांनी भाजपासह आम आदमी पार्टीवरही टीका केली आहे. आप आणि भाजपा हे दोन्ही पक्ष काम करत नाहीत  तर यांचा भर हा केवळ मार्केटिंग करण्यावर असतो. नरेंद्र मोदींनी दरवर्षी 2 कोटी लोकांना नोकरी देण्याचं आश्वासन दिलं होतं. कुठे आहेत नोकऱ्या? दिल्लीत केजरीवाल यांनी रोजगारासाठी काय केलं? असा सवालही त्यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी आर्थिक मोर्च्यावर केंद्र सरकारला घेरलं होतं. राहुल गांधींनी आपल्या ट्विटवर नरेंद्र मोदी योगा करत असलेला व्हिडीओ पोस्ट केला होता. बजेटवर टीका करत राहुल गांधींनी मोदींना पुन्हा एकदा योगा करण्याचा सल्ला दिला.

2020-21च्या बजेटवर टीका करत त्यात काहीही नसल्याचं सांगितलं. बेरोजगारीशी दोन हात करण्यासाठी मोदी सरकारनं काहीही प्रयत्न केलेले नाहीत. बजेटमधून रोजगार निर्माण होतील अशी कोणतीही उपाययोजना केल्याचं मला दिसलेलं नाही असं म्हटलं होतं. इतिहासातील सर्वात मोठं  आणि लांब भाषणाचा हा बजेट असू शकतो, परंतु यात काहीही ठोस असं नाही. यात जुन्या गोष्टी पुन्हा पुन्हा नव्यानं सांगण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा अर्थमंत्र्यांचा दावा पोकळ आहे. त्यात काहीही तथ्य नाही. कृषी विकासदर दोन टक्क्यांवर आला आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होण्यासाठी कृषी विकासदर 11 टक्क्यांवर असला पाहिजे, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी केली होती. 

महत्त्वाच्या बातम्या 

IND vs NZ, 1st ODI Live Score: भारताचे दोन्ही सलामीवीर माघारी, किवींचे कमबॅक

केंद्र सरकारकडून राज्याची आर्थिक कोंडी; उद्धव ठाकरेंचा आरोप

'...तेव्हा पर्यावरणप्रेम कुठे गेले होते?; शिवसेनेच्या हट्टापायी तीनशे कोटींचे नुकसान'

औरंगाबादेत हिंगणघाटची पुनरावृत्ती; घरात घुसण्यास विरोध केल्याने महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाdelhi electionदिल्ली निवडणूकTaj Mahalताजमहाल