शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
देशातील मुस्लिमांना दाबले जाते, म्हणून पहलगाम हल्ला झाला; रॉबर्ड वाड्रांचे धक्कादायक वक्तव्य
5
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
6
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
7
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
9
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
10
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
11
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
15
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
16
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
17
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
18
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
19
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
20
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!

Delhi Election 2020 : 'पंतप्रधान मोदी ताजमहालही विकतील', राहुल गांधीचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 09:16 IST

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. 'नरेंद्र मोदींनी सर्व काही विकायला काढलं आहे. त्यांनी मनात आणलं तर ते ताजमहालही विकतील' दिल्लीमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी मोदींवर टीका केली.

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. 'नरेंद्र मोदींनी सर्व काही विकायला काढलं आहे. त्यांनी मनात आणलं तर ते ताजमहालही विकतील' असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा, काँग्रेस आणि आपने जोरदार तयारी सुरू केली आहे. विधानसभेसाठी 8 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. दिल्लीमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. 

'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेक इन इंडियाची घोषणा केली आहे. ही घोषणा खूपच लोकप्रिय झाली आहे. मात्र इंडियन ऑईल, एअर इंडिया, हिंदुस्थान पेट्रोलियम, रेल्वे, लाल किल्ला हे सर्व ते विकायला निघाले आहेत. एवढंच काय मनात आलं तर उद्या ते ताजमहालही विकतील' अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी मोदींवर केली आहे. तसेच भाजपाचे काही नेते देशभक्तीबाबत बोलतात. पाकिस्तानच्या नावाने खडे फोडत आहेत. पाकिस्तानात जाऊन भारतमाता की जय म्हणण्याची हिंमत दाखवणारा एक तरी भाजपाचा नेता दाखवा, असं आव्हान देखील राहुल गांधी यांनी दिलं आहे. 

राहुल गांधी यांनी भाजपासह आम आदमी पार्टीवरही टीका केली आहे. आप आणि भाजपा हे दोन्ही पक्ष काम करत नाहीत  तर यांचा भर हा केवळ मार्केटिंग करण्यावर असतो. नरेंद्र मोदींनी दरवर्षी 2 कोटी लोकांना नोकरी देण्याचं आश्वासन दिलं होतं. कुठे आहेत नोकऱ्या? दिल्लीत केजरीवाल यांनी रोजगारासाठी काय केलं? असा सवालही त्यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी आर्थिक मोर्च्यावर केंद्र सरकारला घेरलं होतं. राहुल गांधींनी आपल्या ट्विटवर नरेंद्र मोदी योगा करत असलेला व्हिडीओ पोस्ट केला होता. बजेटवर टीका करत राहुल गांधींनी मोदींना पुन्हा एकदा योगा करण्याचा सल्ला दिला.

2020-21च्या बजेटवर टीका करत त्यात काहीही नसल्याचं सांगितलं. बेरोजगारीशी दोन हात करण्यासाठी मोदी सरकारनं काहीही प्रयत्न केलेले नाहीत. बजेटमधून रोजगार निर्माण होतील अशी कोणतीही उपाययोजना केल्याचं मला दिसलेलं नाही असं म्हटलं होतं. इतिहासातील सर्वात मोठं  आणि लांब भाषणाचा हा बजेट असू शकतो, परंतु यात काहीही ठोस असं नाही. यात जुन्या गोष्टी पुन्हा पुन्हा नव्यानं सांगण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा अर्थमंत्र्यांचा दावा पोकळ आहे. त्यात काहीही तथ्य नाही. कृषी विकासदर दोन टक्क्यांवर आला आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होण्यासाठी कृषी विकासदर 11 टक्क्यांवर असला पाहिजे, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी केली होती. 

महत्त्वाच्या बातम्या 

IND vs NZ, 1st ODI Live Score: भारताचे दोन्ही सलामीवीर माघारी, किवींचे कमबॅक

केंद्र सरकारकडून राज्याची आर्थिक कोंडी; उद्धव ठाकरेंचा आरोप

'...तेव्हा पर्यावरणप्रेम कुठे गेले होते?; शिवसेनेच्या हट्टापायी तीनशे कोटींचे नुकसान'

औरंगाबादेत हिंगणघाटची पुनरावृत्ती; घरात घुसण्यास विरोध केल्याने महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाdelhi electionदिल्ली निवडणूकTaj Mahalताजमहाल