शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींचा मोठा दावा ! पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण केले नसते तर...; नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 14:17 IST

PM Modi Jewar Airport, E20 Speech: पंतप्रधान मोदींनी जेवर विमानतळाच्या उद्घाटनावेळी इथेनॉल मिश्रणाचे यश सांगितले. साडेचार कोटी बॅरल तेल आयात वाचली आणि शेतकऱ्यांना १.५ लाख कोटींचा फायदा झाला.

जागतिक स्तरावर इराण-अमेरिका युद्धामुळे इंधन संकट गडद होत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या 'इथेनॉल ब्लेंडिंग' कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. या धोरणामुळे भारताने केवळ परकीय चलनात मोठी बचत केली नाही, तर कच्च्या तेलावरील अवलंबित्वही कमी केले आहे. इथेनॉल निर्मितीमुळे भारताचे सुमारे १.५ लाख कोटी रुपयांचे परकीय चलन वाचले आहे. हे पैसे परदेशात गेले असते, पण इथेनॉलमुळे हा पैसा आपल्या देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला आहे, असे मोदी म्हणाले. 

देशातील सर्वात मोठ्या विमानतळाचे, म्हणजेच नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले.  विशेषतः उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाचा गौरव केला. "तुमच्या शेतात पिकणाऱ्या उसापासून तयार झालेल्या इथेनॉलने देशाला मोठ्या संकटातून वाचवले आहे," असे गौरवोद्गार त्यांनी काढले. नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे ७,२०० एकर जागेवर विकसित केले जात आहे. चार टप्प्यांत काम पूर्ण झाल्यानंतर हे भारतातील सर्वात मोठे विमानतळ ठरेल. यासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांचेही पंतप्रधानांनी आभार मानले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्यामुळे भारताने ४ कोटी बॅरलपेक्षा जास्त कच्च्या तेलाची आयात वाचवली आहे. जर हे मिश्रण झाले नसते, तर भारताला हे तेल महागड्या किमतीत बाहेरून विकत घ्यावे लागले असते. इथेनॉल प्रामुख्याने ऊस आणि धान्यापासून बनवले जाते. यामुळे तेल कंपन्यांकडून मिळणारा पैसा थेट देशातील शेतकऱ्यांच्या खिशात गेला आहे. गेल्या १० वर्षांत इथेनॉल पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना हजारो कोटी रुपये मिळाले आहेत.

भारत सध्या पेट्रोलमध्ये २०% इथेनॉल (E20) मिसळण्याचे उद्दिष्ट गाठण्याच्या दिशेने वेगाने काम करत आहे. यामुळे भारताची ऊर्जा सुरक्षा मजबूत झाली असून, जागतिक बाजारपेठेतील तेलाच्या वाढत्या किमतींचा भारतीय ग्राहकांवर होणारा परिणाम कमी झाला आहे. कच्च्या तेलाच्या तुलनेत इथेनॉल हे अधिक स्वच्छ इंधन आहे. यामुळे कार्बन उत्सर्जनात घट झाली असून भारताच्या पर्यावरणाचे रक्षण होण्यास मदत मिळत आहे.सध्या मध्यपूर्वेतील तणावामुळे तेलाचा पुरवठा विस्कळीत होण्याचा धोका आहे. अशा वेळी भारताचे हे स्वदेशी इंधन धोरण देशाला मोठा आधार देत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Ethanol blending saved India billions, says PM at airport launch.

Web Summary : PM Modi highlights ethanol blending benefits at Noida airport launch. It saved India ₹1.5 lakh crore and reduced oil dependence. Farmers profited, and India cut oil imports, boosting energy security and protecting the environment.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAirportविमानतळUttar Pradeshउत्तर प्रदेश