शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

मन की बात : ''एक मुलगी दहा मुलांच्या बरोबरीची, महिला देशाचा गौरव वाढवत आहेत''

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2018 1:49 PM

मुंबईतील माटुंगा रेल्वे स्टेशनाच मोदींनी 'मन की बात'मध्ये उल्लेख केला.  देशातील माटुंगा स्टेशन हे एकमेव स्टेशन आहे, जिथे महिला सर्व काम सांभाळत आहेत, असं सांगत माटुंगा स्टेशनच्या कर्मचारी महिलांचा मोदींनी गौरव केला. 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (रविवारी) मन की बात कार्यक्रमातून देशवासियांसोबत संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी 'स्त्री शक्ती'चा गौरव केला आणि 'एक मुलगी दहा मुलांच्या बरोबरीची असते असं ते म्हणाले. नवीन वर्ष सुरू झाल्यानंतरची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही पहिलीच 'मन की बात' होती. ते म्हणाले, प्राचीन काळापासून सध्याच्या स्थितीपर्यंत अनेक महिलांनी देशाच्या विकासात महत्त्वाचे योगदान दिले आहे.  भारतात आज महिला सर्वच क्षेत्रात पुढे जात आहेत आणि देशाचा गौरव वाढवत आहेत. नारी शक्ती नेहमीच देश, समाज आणि कुटुंब एकतेच्या सुत्रात बांधले आहे. देशात प्रचीन काळापासून महिलांना सन्मान दिला जात आहे.अंतराळवीर कल्पना चावलाचा उल्लेख यावेळी मोदींनी केला. मोदींनी  प्रकाश त्रिपाठी यांचे आभार मानले कारण, त्यांनी महिला शक्तीचे उदाहरण देताना लिहिलेल्या पत्रात भारतीय वंशाच्या अंतराळवीर कल्पना चावला यांचा उल्लेख केला. मोदी म्हणाले, 1 फेब्रुवारीला कल्पना चावलाची पुण्यतिथी आहे. अंतराळातील दुर्घटनेत तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. ती आपल्यातून लवकर गेल्याचं दुःख आहे. कल्पना चावला भलेही आज आपल्यात नसेल. पण तिने देशाची मान उंचावली आहे. आज कल्पना अनेक मुलींची प्रेरणा बनललेली आहे, असं ते म्हणाले.  मुंबईतील माटुंगा रेल्वे स्टेशनाच मोदींनी 'मन की बात'मध्ये उल्लेख केला.  देशातील माटुंगा स्टेशन हे एकमेव स्टेशन आहे, जिथे महिला सर्व काम सांभाळत आहेत, असं सांगत माटुंगा स्टेशनच्या कर्मचारी महिलांचा मोदींनी गौरव केला. मोदी म्हणाले, भारतीय विदुषिंची परंपरा फार पुरातन राहिली आहे. वेदांच्या निर्मितीमध्ये त्यांचे योगदान मोठे होते. लोपमुद्रा आणि गार्गीचा आपण त्यासाठी नेहमीच उल्लेख करतो. आपण 'बेटी बचाओ' बद्दल बोलत असतो मात्र, वेदांमध्ये म्हटले आहे की एक मुलगी 10 मुलांच्या बरोबरीची असते.

टॅग्स :Man ki Baatमन की बातNarendra Modiनरेंद्र मोदी