शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

पीएम अन्न योजना सर्वांपर्यंत पोहोचण्यात अपयशी, २७ टक्के कुटुंबांना पूर्ण लाभ; अभ्यासातील निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 5:07 AM

​​​​​​​ कोविड-१९ साथीच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर २४ एप्रिल रोजी ही योजना तिसऱ्यांदा सुरू करण्यात आली. या योजनेत तब्बल ८०० दशलक्ष लोकांना सामावून घेण्यात आले आहे.

 नवी दिल्ली : कोविड-१९ साथकाळात गरिबांना मोफत धान्य पुरवठा करणारी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना केंद्र सरकारने २०२० पासून तिसऱ्यांदा पुनरुज्जीवित केली असून ही योजना उद्दिष्टित लोकांपर्यंत पोहोचली असली तरी पात्र लाभार्थींना पूर्ण लाभ देेण्याचे उद्दिष्ट गाठण्यात ती अपयशी ठरली आहे, असे एका अभ्यासात समोर आले आहे.कोविड-१९ साथीच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर २४ एप्रिल रोजी ही योजना तिसऱ्यांदा सुरू करण्यात आली. या योजनेत तब्बल ८०० दशलक्ष लोकांना सामावून घेण्यात आले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यान्वये ज्या लोकांना स्वस्त धान्य दुकानातून अन्नधान्य मिळते, त्यांना मे आणि जून २०२१ मध्ये अतिरिक्त ५ किलो गहू आणि तांदूळ मोफत दिला जाणार आहे. त्यावर २५,३३२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ही योजना लाभार्थींपर्यंत पोहोचली असली तरी, अपेक्षित लाभ त्यांना पूर्णांशाने उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरली आहे, असे अजीम प्रेमजी विद्यापीठातील सेंटर ऑफ सस्टेनेबल एम्प्लॉयमेंटने केलेल्या सर्वेेक्षणात म्हटले आहे. विद्यापीठातील अर्थशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक अमित बसोले यांनी सांगितले की, केवळ २७ टक्के पात्र कुटुंबांना योजनेचा पूर्ण लाभ मिळाला आहे. ६८ टक्के कुटुंबांना काही प्रमाणात अतिरिक्त लाभ झाला आहे. या योजनेचा आढावा घेणारे तिसरे सर्वेक्षण बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या अर्थसाह्याने केले आहे. ८८ जिल्ह्यांत करण्यात आलेल्या या सर्वेक्षणानुसार, ९४ टक्के कुटुंबांना मासिक पातळीवर मोफत अन्नधान्य मिळाले आहे.

योजना यशस्वी झाल्याचा सरकारचा दावासरकारने मात्र ही योजना यशस्वी झाल्याचा दावा केला आहे. एप्रिल ते नोव्हेंबर २०२० या काळात योजनेअंतर्गत ३२.२ दशलक्ष टन अन्नधान्याचा पुरवठा करण्यात आला. त्यातील ९३ टक्के म्हणजेच २९.८ दशलक्ष टन धान्य लाभार्थींना वितरित झाले, असे अन्न मंत्रालयाने म्हटले आहे. डलबर्गने केलेल्या सर्वेक्षणानुसार योजना यशस्वी झाल्याचा दावा मंत्रालयाने केला आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसfoodअन्न