शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
2
IPL 2026: भर मैदानात राडा? मग क्रुणाल पांड्याची इन्स्टाग्राम पोस्ट; त्यावर पूरननं केली 'अशी' कमेंट!
3
MCX Share Price: मार्च तिमाहीत एमसीएक्सचा नफा २९१% नं वाढला, ११ मे रोजी रॉकेट बनू शकतो शेअर
4
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
5
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
6
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
7
गळाभेट घेतली, नमस्कार केला, पंतप्रधान मोदी भर मंचावर कुणासमोर झाले नतमस्तक, ती ज्येष्ठ व्यक्ती कोण?
8
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
9
Budget Travel: खिशात ५० हजार अन् परदेश वारी! 'या' ७ देशांमध्ये भारतीय रुपया आहे लय भारी
10
सामुद्रिक शास्त्र : डोळा लवणे शुभ की अशुभ? स्त्री आणि पुरुषांसाठी काय आहेत याचे वेगवेगळे अर्थ!
11
महागड्या Personal Loan ला विसरा; PPF खात्यावर मिळवू शकता स्वस्त कर्ज, जाणून घ्या नियम
12
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
13
Astro Tips: देवापर्यंत प्रार्थना पोहोचली हे कसे ओळखावे? पूजेदरम्यान मिळणाऱ्या 'या' ५ खुणांचा नेमका अर्थ
14
पंतप्रधान मोदींचा करिष्मा अन् अमित शाहांची चाणक्यनीती पश्चिम बंगालमध्ये यशस्वी- एकनाथ शिंदे
15
युझवेंद्र चहल ई-सिगारेट पिताना दिसला, पण कारवाई मात्र अर्शदीप सिंगवर होणार? जाणून घ्या प्रकरण
16
"६००० कोटींची शासकीय जमीन खासगी बिल्डर्सच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव"; काँग्रेसचा आरोप
17
पेट्रोल पंपांवर मोफत मिळतात 'या' ६ सुविधा; पैसे मागितले तर करू शकता तक्रार, जाणून घ्या तुमचा अधिकार
18
Nashik TCS Case: निदा खानचा हैदराबादला पळण्याचा प्लॅन कसा फसला? एआयएमआयएम नेत्याचा मोबाईल सापडला अन्...
19
Astrology: तुमचा जन्म सकाळचा की रात्रीचा? जन्मवेळ सांगते तुमच्या स्वभावाचे विशिष्ट पैलू!
20
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या सीमांचा अधिकृत इतिहास लिहिण्याची योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 06:03 IST

भारताच्या सीमांचा अधिकृत इतिहास लिहिण्याची संरक्षण मंत्रालयाची योजना

नवी दिल्ली : भारताच्या सीमांचा अधिकृत इतिहास लिहिण्याची संरक्षण मंत्रालयाची योजना असून, संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी हे काम सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. सर्वंकष स्वरूपाचा हा इतिहास येत्या दोन वर्षांत लिहून पूर्ण होणे अपेक्षित आहे.
संरक्षण मंत्रालयाने ही माहिती देताना एका निवेदनात म्हटले : भारताच्या सीमा कशा ठरविल्या गेल्या व त्यात वेळोवेळी कसे बदल होत गेले, यासह सीमेसंबंधीच्या सर्व पैलूंचा आंतर्भाव करून हे इतिहास लेखन करण्याचा प्रस्ताव आहे. सीमांच्या संदर्भात सुरक्षा दलांची भूमिका, तसेच सीमा भागांमधील लोकांची वांशिक पृष्ठभूमी, जीवनशैली, संस्कृती यांचाही यात समावेश असेल. यासंदर्भात राजनाथसिंग यांनी मंगळवारी भारतीय इतिहास संशोधन परिषद, नेहरू स्मृती संग्रहालय व ग्रंथालय, पुरातत्त्व महासंचालनालय आणि संरक्षण, गृह व परराष्ट्र व्यवहार या मंत्रालयातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
सर्वसामान्य नागरिकांना व खास करून सरकारमधील अधिकाऱ्यांना देशाच्या सीमा व तेथील परिस्थितीचे वस्तुनिष्ठ ज्ञान व्हावे यासाठी हे इतिहास लेखन महत्त्वाचे आहे, यावर संरक्षणमंत्र्यांनी भर दिला. यासाठी सूचनांचे स्वागत केले जाईल, असे सांगून त्यांनी अधिकाºयांना निर्देश दिले की, या इतिहास लेखनासाठी कोणत्या संदर्भसाधनांचा उपयोग करावा, त्यासाठी कोणती पद्धत वापरावी, ढोबळ रूपरेखा काय असावी व याचे कसे नियोजन करावे, यासंदर्भात अधिकाºयांनी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घ्यावे.
>पाक, चीनला लागून असलेल्या सीमांचा वाद
भारताच्या खासकरून पाकिस्तान व चीनला लागून असलेल्या सीमा हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे व सीमांची नेमकी आखणी कशी व कुठे आहे, याविषयी एकवाक्यता नसल्याने तंटे-बखेडे होत असतात. जम्मू-काश्मीरची सीमा हा तर मोठ्या संघर्षाचा विषय बनला आहे. चीननेही भारताच्या हद्दीत घुसखोरी केल्याच्या बातम्या अधूनमधून येत असतात. या घडामोडींचे सामान्य नागरिकांना नीट आकलन व्हावे यासाठी हा इतिहास उपयुक्त ठरेल.