शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

सुप्रीम कोर्टात ५० टक्के मतांच्या व्हीव्हीपॅट पडताळणीसाठी याचिका; आज सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 4:31 AM

२१ विरोधी पक्षांची सर्वोच्च न्यायालयात याचिका

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानयंत्रांमधील मतांची मोजणी करून निकाल जाहीर करण्यापूर्वी किमान ५० टक्के मतांची ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रातील नोंदींशी पडताळणी करणे सक्तीचे केले जावे यासाठी २१ विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात याचिकाकेली असून त्यावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.बिगर ‘रालोआ’ आघाडील पक्षांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या बैठकीत अशी याचिका करण्याचा निर्णय अलीकडेच घेण्यात आला होता. तेलगु देसमचे अध्यक्ष व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे याचिकेतील मुख्य याचिकाकर्ते आहेत. सर्वोच्च न्यायालयातील शुक्रवारच्या कामकाजात ही याचिका सुनावणीसाठी दाखविण्यात आली आहे. याआधी २१ विरोधी पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेऊन अशीच मागणी केली होती. मात्र मुख्य निवडणूक आयुक्तांनी निवडणुकीची घोषणा करताना जी माहिती दिली त्यावरून ही मागणी अमान्य झालयचे स्पष्ट झाल्याने या पक्षांनी न्यायालयात धाव घेतली आहे.प्रत्येक मतदान केंद्रात झालेल्या मतदानापैकी ५० टक्के मतांची मतदानयंत्रातून व ५० टक्के मतांची व्हीव्हीपॅटमधून मोजणी केली जावी.या दोन्हींची पडतालणी करून नंतरच निकाल जाहीर केला जावा, अशी या पक्षांची मागणी आहे. मतदाराने केलेल्या मतदानाची लेखी नोंद व्हीव्हीपॅटमध्ये होते. ती पाहून आपण दिलेले मत योग्य प्रकारे नोंदले गेले आहे याची खात्री झाल्यावर मतदाराने बटण दाबले की मताच्या लेखी नोंदीची ती पावती मयदानयंत्राला जोडलल्या स्वतंत्र पेटीमध्ये पडते, अशी ही सोय आहे. मतदानयंत्रांमध्ये मतदानाच्या आधी किंवा मतदानानंतर काही हेराफेरी केली गेलेली नाही याची खातरजमा व्हावी यासाठी दोन्ही प्रकारची ५०-५० टक्के मते घेऊन मोजणी केली जावी, अशी या पक्षांची मागणी आहे.आगामी निवडणुकीत देशभरातील सर्व १० लाख मतदान केंद्रांवर मतदानयंत्रे व व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार आहे. निवडणूक कार्यक्रम १० मार्च रोजी जाहीर करताना निवडणूक आयोगाने असे सांगितले की, प्रत्येक मतदारसंघात सरधोपटपणे निवडलेल्या एका मतदानकेंद्रावरील एक मतदानयंत्र व एक व्हीव्हीपॅट यामध्ये झालेल्या मतांच्या नोंदणीची पडताळणी केली जाईल.

टॅग्स :VVPATव्हीव्हीपीएटीSupreme Courtसर्वोच्च न्यायालयLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक