शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

इंधन दरवाढीने जनता झाली त्रस्त, रेल्वेच्या भाडेवाढीचीही चर्चा; राहुल गांधी यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 06:50 IST

लोकनियुक्त सरकार पाडण्यात भाजपला रस

नवी दिल्ली : मोदी सरकार पेट्राेल व डिझेलचे भाव रोजच्या रोज वाढवत असून, आता ऱेल्वे तिकिटांच्या दरातही दुप्पट वाढ केली जाणार  असल्याचे वृत्त आहे. सर्वसामान्यांचे जगणे अवघड करण्याची आणि त्यांची रोजीरोटी हिसकावण्याची तयारीच भाजपने चालवली आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी केली.

 रेल्वे लवकरच तिकिटांच्या दरात दुप्पट वाढ करणार असल्याचे वृत्त एका वर्तमानपत्रात प्रकाशित झाले आहे. त्या बातमीचा उल्लेख करीत राहुल गांधी यांनी, आता मोदी सरकार सामान्यांना जगू देणार की नाही, असा सवाल केला आहे. कोरोनामुळे देशातील जनता आधीच आर्थिक अडचणीत असताना, रेल्वेची भाडेवाढ करून, स्वत:चे उत्पन्न वाढविण्याचा हा मार्ग अयोग्य आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

न्यायपालिकेवरही दबाव

पुडुच्चेरीमधील काँग्रेस सरकार सोमवारी बहुमताअभावी कोसळले. त्याआधी तेथील काँग्रेस व द्रमुकच्या काही आमदारांनी राजीनामा दिला होता. त्याचा उल्लेख करून राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, लोकनियुक्त सरकारे पाडण्याचा चंगच मोदी सरकारने बांधलेलाआहे.जे विजयी झाले, त्यांना अशा पद्धतीने पराभूत करायचे आणि स्वत:चा पराजय झाला तरी याचप्रकारे विजय मिळवायचा, असा डावच भाजपने रचला आहे.लोकसभा व राज्यसभेतही आता विरोधी खासदारांना बोलू दिले जात नाही आणि आता तर न्यायपालिकेवरही भाजप व मोदी सरकार दबाव आणत आहे, असा गंभीर आरोपही राहुल गांधी यांनी केला. 

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस