शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

इंधन दरवाढीने जनता झाली त्रस्त, रेल्वेच्या भाडेवाढीचीही चर्चा; राहुल गांधी यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 06:50 IST

लोकनियुक्त सरकार पाडण्यात भाजपला रस

नवी दिल्ली : मोदी सरकार पेट्राेल व डिझेलचे भाव रोजच्या रोज वाढवत असून, आता ऱेल्वे तिकिटांच्या दरातही दुप्पट वाढ केली जाणार  असल्याचे वृत्त आहे. सर्वसामान्यांचे जगणे अवघड करण्याची आणि त्यांची रोजीरोटी हिसकावण्याची तयारीच भाजपने चालवली आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी केली.

 रेल्वे लवकरच तिकिटांच्या दरात दुप्पट वाढ करणार असल्याचे वृत्त एका वर्तमानपत्रात प्रकाशित झाले आहे. त्या बातमीचा उल्लेख करीत राहुल गांधी यांनी, आता मोदी सरकार सामान्यांना जगू देणार की नाही, असा सवाल केला आहे. कोरोनामुळे देशातील जनता आधीच आर्थिक अडचणीत असताना, रेल्वेची भाडेवाढ करून, स्वत:चे उत्पन्न वाढविण्याचा हा मार्ग अयोग्य आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

न्यायपालिकेवरही दबाव

पुडुच्चेरीमधील काँग्रेस सरकार सोमवारी बहुमताअभावी कोसळले. त्याआधी तेथील काँग्रेस व द्रमुकच्या काही आमदारांनी राजीनामा दिला होता. त्याचा उल्लेख करून राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, लोकनियुक्त सरकारे पाडण्याचा चंगच मोदी सरकारने बांधलेलाआहे.जे विजयी झाले, त्यांना अशा पद्धतीने पराभूत करायचे आणि स्वत:चा पराजय झाला तरी याचप्रकारे विजय मिळवायचा, असा डावच भाजपने रचला आहे.लोकसभा व राज्यसभेतही आता विरोधी खासदारांना बोलू दिले जात नाही आणि आता तर न्यायपालिकेवरही भाजप व मोदी सरकार दबाव आणत आहे, असा गंभीर आरोपही राहुल गांधी यांनी केला. 

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस