शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

CoronaVirus: बिहारमध्ये कोरोनामुळे ६ जणांचा मृत्यू, पण ७८९ जणांवर अंत्यसंस्कार!; हायकोर्टही हैराण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 16:32 IST

CoronaVirus: पाटणा उच्च न्यायालयात दाखल करण्यात अहवालामुळे न्यायालयही संभ्रमात पडल्याची माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देबिहारमध्ये कोरोनामुळे ६ जणांचा मृत्यू, पण ७८९ जणांवर अंत्यसंस्कार!हायकोर्टही झाले हैराण मुख्य न्यायधीश संजय करोल यांची तीव्र नाराजी

पाटणा: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. नव्या कोरोनाबाधितांची संख्या काही अंशी घटताना दिसत असली, तरी कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या चिंता वाढवणारी आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण येत असून, कोरोना लस, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स यांचा तुटवडा जाणवत आहे. अशातच देशातील विविध न्यायालयांमध्ये कोरोनासंदर्भातील याचिकांवर सुनावणी सुरू असून, पाटणा उच्च न्यायालयात दाखल करण्यात अहवालामुळे न्यायालयही संभ्रमात पडल्याची माहिती समोर आली आहे. (patna high court slams state govt over figures death in buxar due to coronavirus)

कोरोना संकटाच्या काळात बिहारमधील गंगा नदीत आढळलेल्या मृतदेहांमुळे देशभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे बिहारमधील बक्सर भागात कोरोनाच्या परिस्थितीबाबत दाखल केलेल्या एका अहवालामुळे पाटणा उच्च न्यायालयही हैराण झाले असून, मुख्य न्यायधीश संजय करोल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

राज्यात १ जूननंतरही लॉकडाऊन कायम राहणार? आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

नेमका कोणता अहवाल खरा?

कोरोनासंदर्भात झालेल्या एका याचिकेवरील सुनावणीवेळी मुख्य सचिवांनी दाखल केलेल्या अहवालानुसार, बक्सर भागात १ ते १३ मे या कालावधीत ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मात्र, प्रभागीय आयुक्तांनी दाखल केलेल्या अहवालानुसार, ५ ते १४ मे या कालावधीत ७८९ जणांवर अत्यंसंस्कार करण्यात आले. या दोन्ही रिपोर्टबाबत उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली असून, या दोन्ही रिपोर्टपैकी नेमका खरा रिपोर्ट कोणता, अशी विचारणा उच्च न्यायालयाने केली आहे. यावर, महाधिवक्त्यांनी पुन्हा एकदा आकडेवारी सादर करण्यासाठी वेळ मागितला आहे. 

चिंतेत भर! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत २६९ डॉक्टरांनी गमावला जीव; बिहारमध्ये सर्वाधिक मृत्यू

गंगा नदीतील मृतदेहांवर अंत्यसंस्कार

बक्सर भागात वाहणाऱ्या गंगा नदीत आढळून आलेल्या मृतदेहांसंदर्भात बिहार राज्याने हात वर केले असून, हे मृतदेह उत्तर प्रदेशातून आल्याचे म्हटले होते. मात्र, यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने सरकारला उत्तर देण्यास सांगितले होते. दुसरीकडे, बक्सर भागात १० मे रोजी सर्वाधिक १०६, तर ५ मे रोजी १०२ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

“देशात कोणाच्याही जीवाची किंमत राहिलेली नाही”; रवीश कुमारांचे PM मोदींवर टीकास्त्र

योगी सरकारलाही न्यायालयाने फटकारले

उत्तर प्रदेशातील छोटी शहरे आणि ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था राम भरोसे असल्याचे सांगत योगी सरकारला फटकारले. अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्या. अजित कुमार आणि न्या. सिद्धार्थ वर्मा यांच्या खंडपीठाने योगी सरकारला धारेवर धरले.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसBiharबिहारNitish Kumarनितीश कुमारHigh Courtउच्च न्यायालयState Governmentराज्य सरकार