शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
5
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
6
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
7
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
8
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
9
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
10
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
11
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
12
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
13
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
14
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
15
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
16
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
17
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
18
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
19
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
20
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!

CoronaVirus: बिहारमध्ये कोरोनामुळे ६ जणांचा मृत्यू, पण ७८९ जणांवर अंत्यसंस्कार!; हायकोर्टही हैराण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 16:32 IST

CoronaVirus: पाटणा उच्च न्यायालयात दाखल करण्यात अहवालामुळे न्यायालयही संभ्रमात पडल्याची माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देबिहारमध्ये कोरोनामुळे ६ जणांचा मृत्यू, पण ७८९ जणांवर अंत्यसंस्कार!हायकोर्टही झाले हैराण मुख्य न्यायधीश संजय करोल यांची तीव्र नाराजी

पाटणा: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. नव्या कोरोनाबाधितांची संख्या काही अंशी घटताना दिसत असली, तरी कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या चिंता वाढवणारी आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण येत असून, कोरोना लस, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स यांचा तुटवडा जाणवत आहे. अशातच देशातील विविध न्यायालयांमध्ये कोरोनासंदर्भातील याचिकांवर सुनावणी सुरू असून, पाटणा उच्च न्यायालयात दाखल करण्यात अहवालामुळे न्यायालयही संभ्रमात पडल्याची माहिती समोर आली आहे. (patna high court slams state govt over figures death in buxar due to coronavirus)

कोरोना संकटाच्या काळात बिहारमधील गंगा नदीत आढळलेल्या मृतदेहांमुळे देशभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे बिहारमधील बक्सर भागात कोरोनाच्या परिस्थितीबाबत दाखल केलेल्या एका अहवालामुळे पाटणा उच्च न्यायालयही हैराण झाले असून, मुख्य न्यायधीश संजय करोल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

राज्यात १ जूननंतरही लॉकडाऊन कायम राहणार? आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

नेमका कोणता अहवाल खरा?

कोरोनासंदर्भात झालेल्या एका याचिकेवरील सुनावणीवेळी मुख्य सचिवांनी दाखल केलेल्या अहवालानुसार, बक्सर भागात १ ते १३ मे या कालावधीत ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मात्र, प्रभागीय आयुक्तांनी दाखल केलेल्या अहवालानुसार, ५ ते १४ मे या कालावधीत ७८९ जणांवर अत्यंसंस्कार करण्यात आले. या दोन्ही रिपोर्टबाबत उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली असून, या दोन्ही रिपोर्टपैकी नेमका खरा रिपोर्ट कोणता, अशी विचारणा उच्च न्यायालयाने केली आहे. यावर, महाधिवक्त्यांनी पुन्हा एकदा आकडेवारी सादर करण्यासाठी वेळ मागितला आहे. 

चिंतेत भर! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत २६९ डॉक्टरांनी गमावला जीव; बिहारमध्ये सर्वाधिक मृत्यू

गंगा नदीतील मृतदेहांवर अंत्यसंस्कार

बक्सर भागात वाहणाऱ्या गंगा नदीत आढळून आलेल्या मृतदेहांसंदर्भात बिहार राज्याने हात वर केले असून, हे मृतदेह उत्तर प्रदेशातून आल्याचे म्हटले होते. मात्र, यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने सरकारला उत्तर देण्यास सांगितले होते. दुसरीकडे, बक्सर भागात १० मे रोजी सर्वाधिक १०६, तर ५ मे रोजी १०२ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

“देशात कोणाच्याही जीवाची किंमत राहिलेली नाही”; रवीश कुमारांचे PM मोदींवर टीकास्त्र

योगी सरकारलाही न्यायालयाने फटकारले

उत्तर प्रदेशातील छोटी शहरे आणि ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था राम भरोसे असल्याचे सांगत योगी सरकारला फटकारले. अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्या. अजित कुमार आणि न्या. सिद्धार्थ वर्मा यांच्या खंडपीठाने योगी सरकारला धारेवर धरले.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसBiharबिहारNitish Kumarनितीश कुमारHigh Courtउच्च न्यायालयState Governmentराज्य सरकार