शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची नाही, तर..; लोकसभा अध्यक्षांनी दिली मोठी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2023 15:23 IST

संसदेच्या सुरक्षेतील गंभीर चुकीनंतर विरोधक सरकारवर निशाणा साधत आहेत.

Parliament Security Breach News: संसदेच्या सुरक्षेत झालेल्या गंभीर चुकीमुळे दोन्ही सभागृहात विरोधी पक्षाचे खासदार प्रचंड गदारोळ करत आहेत. गुरुवारी लोकसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी याच मुद्द्यावर सरकारकडे उत्तरे मागितली. सभागृहाचे कामकाज सुरू होताच त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. यादरम्यान लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मोठे वक्तव्य केले. संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी लोकसभा सचिवालयाची असल्याची माहिती त्यांनी दिली.

आज पुन्हा संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली. यावेळी ओम बिर्ला म्हणाले की, संसद सचिवालयाच्या कामात सरकार कधीही हस्तक्षेप करत नाही. संसदेच्या संपूर्ण परिसराच्या सुरक्षेची जबाबदारी लोकसभा सचिवालयची अशते. संसदेची सुरक्षा सरकारचे नाही, तर आमचे कार्यक्षेत्र आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी विरोधांनी प्रचंड गोंधळ सुरू केला, त्यानंतर लोकसभेचे दुपारपर्यंत तहकूब करण्यात आले.

काय म्हणाले राजनाथ सिंह?

संसदेत घुसखोरीच्या घटनेबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, या प्रकरणाचा सर्वांनी निषेध केला पाहिजे. आपण सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. द्वेष आणि अराजकता पसरवणाऱ्यांना पास मिळू नये, याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. जुन्या इमारतीतही कागद फेकण्याच्या आणि सभागृहात उड्या मारण्याच्या घटना घडल्या आहेत. यावरुन विरोधकांनी सभागृहात घोषणाबाजी आणि गदारोळ करण्याची गरज नाही.

आठ सुरक्षा कर्मचारी निलंबित 

संसदेच्या सुरक्षेतील त्रुटींबाबत मोठी कारवाई करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने आठ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. संसद भवनातील सुरक्षा कर्मचाऱ्यांशी संबंधित हे लोक आहेत. दरम्यान, 13 डिसेंबर 2001 रोजी संसद भवनावर दहशतवादी हल्ला झाला होता. कालच्या घटनेने 22 वर्षे जुन्या जखमा पुन्हा एकदा ताज्या केल्या आहेत. 

टॅग्स :Parliamentसंसदom birlaओम बिर्लाCrime Newsगुन्हेगारीdelhiदिल्लीPoliceपोलिसRajnath Singhराजनाथ सिंहcongressकाँग्रेसBJPभाजपा