शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
2
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
3
अमेठी, रायबरेलीत काँग्रेसच्या हाताला सपाच्या सायकलची साथ, अखिलेश यादव यांचे कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश 
4
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
5
Breaking: मोठी बातमी! शिक्षक, पदवीधर विधान परिषद निवडणूक पुढे ढकलली
6
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज
7
UPSC मध्ये घटस्फोटित कोट्यातून नोकरीसाठी पतीला सोडलं, पहिल्याच Marriage Anniversary ला केली विचित्र मागणी
8
तुम्ही काय दिवे लावले? हार्दिकवर टीका करणाऱ्या AB de Villiers वर गौतम गंभीर खवळला 
9
"बायको गेल्यानंतर स्वत:ला संपवायचं ठरवलं होतं", कठीण काळाबद्दल बोलताना भूषण कडू भावुक
10
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; अदानी एन्टरप्राईजेसमध्ये तेजी, Cipla घसरला
11
जगातील सर्वात पॉवरफुल क्रॉसओवर बाईक BMW M 1000 XR लाँच,  जाणून घ्या किंमत...
12
मराठा आरक्षण आंदोलनाचा 'एल्गार', मनोज जरांगे पाटील ४ जूनपासून पुन्हा उपोषण करणार
13
RCB vs CSK सामन्यावर पावसाचं सावट! सामना रद्द झाल्यास प्ले ऑफमध्ये कोण जाणार?
14
घाटकोपरसारखीच चूक २१ वेळा; होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार असलेला भावेश भिंडे कोण आहे?
15
Weather Alert: मुंबईत आजही पाऊस लावणार हजेरी; राज्यातील ९ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'; असा आहे हवामान अंदाज!
16
शुभकार्यासाठी निघाले होते, पण...; बस-कारच्या धडकेत कुटुंबातील तिघांचा मृत्यू, चिमुकला बचावला
17
Women World Cup 2024: भारत वर्ल्ड कपची सेमीफायनल खेळणारच; हरमनने सांगितले तगडे आव्हान
18
मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात वाद? हार्दिक सरावाला येताच रोहितसह तिघांनी मैदान सोडले
19
'गलिच्छ! साडी नेसून लोकांच्या मांडीवर बसतो', कपिल शर्मा शोवर भडकला सुनील पाल
20
Video: बापरे..! चिखलात लपलेल्या मगरीने अचानक उघडला जबडा अन् पुढे जे घडलं...

Parliament Monsoon Session: मोदी सरकारनं शब्द फिरवला; शेतकऱ्यांसह विरोधकांना लवकरच मोठा धक्का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 3:56 PM

सहा महिन्यांपूर्वी दिलेला शब्द मोदी सरकारनं फिरवला; संसदेत गदारोळ होण्याची शक्यता

नवी दिल्ली: संसदेच्या पावसाळी अधिवेशानाला आजपासून सुरुवात झाली आहे. संसदेच्या अधिवेशनात मोदी सरकारकडून कोणती विधेयकं मंजूर करून घेणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. यंदाच्या अधिवेशनात केंद्र सरकार वीज (संधोधन) विधेयक मांडणार आहे.  कृषी विधेयकांना आधीच शेतकरी विरोध करत आहेत. विरोधी पक्षांनीदेखील यावरून सरकारला धारेवर धरलं आहे. याच विधेयकाच्या मुद्द्यावरून पंजाबमध्ये भारतीय जनता पक्षाचा जुना मित्र असलेल्या शिरोमणी अकाली दलानं एनडीएची साथ सोडली. आता अकाली दल या विधेयकाविरोधात स्थगन प्रस्ताव आणणार आहे.

अकाली दलाच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांनी रविवारी एक ट्विट केलं होतं. 'आधी कृषी कायदे आणि आता वीज संशोधन विधेयक. हे विधेयक संसदेत मांडण्यात येणार नाही, असं शेतकऱ्यांना मोदी सरकारनं सांगितलं होतं. मात्र आता हे विधेयक संसदेत मांडण्यात येणार आहे. विजेचं खासगीकरण करून सरकार शेतकऱ्यांना शार्क माशांच्या तोंडात फेकत आहे,' असं कौर यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. 

गेल्या वर्षाच्या अखेरीस सरकारची शेतकरी संघटनांच्या नेत्यांसोबत चर्चा झाली. त्यातील सहाव्या बैठकीत केंद्र सरकारनं एक महत्त्वाचं आश्वासन दिलं होतं. वीज संशोधन विधेयकाचा मसुदा मागे घेण्यात येईल, असा शब्द सरकारनं दिला होता. मात्र या बैठकीला जेमतेम सहा महिने पूर्ण झाले असताना सरकारनं आपला शब्द फिरवला आहे. वीज संशोधन विधेयक सरकार संसदेत मांडणार आहे. त्यामुळे आंदोलक शेतकरी आणखी आक्रमक पवित्रा घेऊ शकतात. या विधेयकासोबतच कृषी कायद्यांविरोधात अकाली दलानं आक्रमक भूमिका घेतली आहे. यावर चर्चा करण्याची त्यांची मागणी आहे. यासाठी अकाली दलानं शिवसेना, राष्ट्रवादी, डीएमके, टीएमसी आणि बीएसपी यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे.  

 

टॅग्स :FarmerशेतकरीBJPभाजपाShiromani Akali Dalशिरोमणी अकाली दल