शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

पणजीत आता एकेरी वाहतूक - 1 सप्टेंबरपासून लागू : महिनाभर प्रायोगिक तत्त्वावर होणार अंमलबजावणी

By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST

(फोटो : एडिट लोकमवर + आराखडा)

(फोटो : एडिट लोकमवर + आराखडा)
पणजी : राजधानी शहरातील वाहतूक येत्या 1 सप्टेंबरपासून एकेरी होणार असून महिनाभर प्रायोगिक तत्त्वावर ती राबविल्यानंतर येणार्‍या सूचना, हरकती विचारात घेऊन आवश्यक तेथे कायमस्वरूपी केली जाईल.
वाहतूक पोलीस उपाधीक्षक धर्मेश आंगले यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. वाहतुकीची होणारी कोंडी दूर करण्यासाठी ही उपाययोजना केली आहे. नव्या व्यवस्थेनुसार शहरात आता केवळ तीन ते चार रस्त्यांवरच दुहेरी वाहतूक असेल. यात पोलीस मुख्यालयासमोरचा रस्ता, आयनॉक्ससमोरील मार्गाचा समावेश आहे. मार्केटमध्ये दुकानांसाठी माल घेऊन येणार्‍या अवजड वाहनांकरिता ही व्यवस्था आहे.
महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी सल्लामसलत करूनच एकेरी मार्ग निश्चित केले आहेत. पहिला महिनाभर प्रयोग म्हणून ही व्यवस्थात अमलात असेल. या कालावधीत वाहनधारकांना दंड ठोठावला जाणार नाही. उलट त्यांची जागृती घडवून आणली जाईल, असे आंगले यांनी स्पष्ट केले. सध्या 18 जून रस्ता आणि आत्माराम बोरकर मार्ग पूर्णपणे एकेरी आहे. ही व्यवस्था तशीच कायम ठेवली जाईल.
नवी वाहतूक व्यवस्था हाताळण्यासाठी अतिरिक्त 110 पोलीस तैनात केले जातील. गृहरक्षकांचीही मदत घेतली जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर ही व्यवस्था लागू असताना प्रमुख नाक्यांवर पोलीस तैनात करून वाहनधारकांमध्ये जागृती घडविण्याचेही काम केले जाईल.
एकेरीमार्ग
- महात्मा गांधी मार्ग (जुने सचिवालय ते काकुलो बेट)
- दादा वैद्य मार्ग (हॉटेल सम्राट ते कुंडईकर नगर आणि सिंगबाळ बूक स्टॉल ते कुंडईकर नगर)
- जन. बेर्नाद गिदिश मार्ग (मार्केट गेट ते धेंपो निवास)
- कायतान आल्बुकर्क मार्ग (वैद्य हॉस्पिटल ते मॅन्शन गेस्ट हाउस)
- मिनेझिस ब्रागांझा मार्ग (अँपल कॉर्नर ते भोसले हॉटेल)
- डॉ. पिसुर्लेकर मार्ग (कुंडईकर नगर ते आझाद मैदान जंक्शन)
- शिरगावकर मार्ग (महालक्ष्मी मंदिर ते गोविंदा बिल्डिंग)
- स्वामी विवेकानंद मार्ग (बोक द व्हाक जंक्शन ते टू सिग्नल ट्रेनिंग सेंटर)
- टी. बी. कुन्हा मार्ग (सेसॉल बार ते ए. बी. नाईक चौक)
- हेलिदोर साल्गादो मार्ग (रायू चेंबर ते कामत सेंटर)
- गव्हर्नादोर पेस्ताना मार्ग (बोरकर मार्ग ते मार्केट गेट व बांदोडकर मार्ग ते मार्केट गेट)
- डॉ. वोल्फांगो सिल्वा मार्ग (ईडीसी हाउस ते हॉटेल त्रिमूर्ती)
- इस्माइल ग्राशियस मार्ग (नवहिंद भवन ते मिनेझिस ब्रागांझा सभागृह)
- अपरान्त हस्तकला दालन ते वर्षा बूक स्टॉल


शहरात रोज येतात 90 हजार वाहने
एका प्रश्नावर उत्तर देताना आंगले म्हणाले की, रोज शहरात सुमारे 90 हजार वाहने प्रवेश करतात. साधारणपणे 5500 दुचाक्यांचे आणि 2200 चारचाकी वाहनांचे पार्किंग होते. पत्रकार परिषदेस वाहतूक निरीक्षक सुदेश वेळीप हेही उपस्थित होते. (प्रतिनिधी)

फोटो कॅप्शन
1. वाहतूक उपाधीक्षक धर्मेश आंगले नव्या वाहतूक व्यवस्थेची माहिती देताना. बाजूस वाहतूक निरीक्षक सुदेश वेळीप.
2. लाल रंगातील मार्ग (नव्याने एकेरी होणार असलेले) तर हिरव्या रंगातील मार्ग (सध्या अस्तित्वात असलेले एकेरी)