शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
6
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
7
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
8
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
9
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
10
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
11
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
12
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
13
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
14
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
15
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
16
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
18
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
19
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
20
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी

अण्णाद्रमुकमधील पलानीस्वामी-पनीरसेल्वम गट येणार एकत्र, सोमवारी घोषणेची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2017 3:14 PM

मागच्या काही महीन्यांपासून अण्णाद्रमुकमध्ये सुरु असलेला संघर्ष संपुष्टात येण्याचे संकेत मिळत आहेत.

ठळक मुद्देयेत्या सोमवारी अण्णाद्रमुकमधील हे दोन्ही गट एकत्र येण्याची घोषणा करु शकतात.केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपा सरकारकडून या दोन्ही गटांवर एकत्र येण्यासाठी मोठा दबाव होता. 

चेन्नई, दि. 19 - मागच्या काही महीन्यांपासून अण्णाद्रमुकमध्ये सुरु असलेला संघर्ष संपुष्टात येण्याचे संकेत मिळत आहेत. ओ. पनीरसेल्वम यांचा गट विद्यमान मुख्यमंत्री के.पलानीस्वामी यांच्याबरोबर तडजोड करायला तयार झाल्याची सूत्रांची माहिती आहे. येत्या सोमवारी अण्णाद्रमुकमधील हे दोन्ही गट एकत्र येण्याची घोषणा करु शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपा सरकारकडून या दोन्ही गटांवर एकत्र येण्यासाठी मोठा दबाव होता. 

अण्णाद्रमुकमधील दोन्ही गट आणि भाजपामधील वरिष्ठ सूत्रांच्या माहितीनुसार येत्या सोमवारी हे दोन्ही गट एकत्र आल्याची घोषणा होऊ शकते. अमित शहा यांच्या तामिळनाडू दौ-याच्या एकदिवस आधी ही घोषणा होईल. काल दोन्ही गटातील नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका पार पडल्या. शुक्रवारीच हे दोन्ही गट एकत्र आल्याची घोषणा होईल असे चित्र निर्माण झाले होते. मरीना बीचवरील जयललिता यांच्या स्मृतीस्थळावर दोन्ही गटाचे नेते, कार्यकर्ते मोठया संख्येने जमले होते. पण उशिरापर्यंत कुठलीही माहिती मिळत नसल्याने अखेर जमलेले कार्यकर्ते माघारी फिरले. 

येत्या दोन दिवसात अंतिम निर्णय होईल. पक्ष कार्यकर्त्यांचे हित डोळयासमोर ठेऊन निर्णय घेऊ असे पनीरसेल्वम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. व्ही.के.शशिकलाच्या कुटुंबाची अण्णाद्रमुकमधून हकालपट्टी आणि जयललिता यांच्या मृत्यू प्रकरणाचा सीबीआय तपास या पनीरसेल्वम गटाच्या दोन मुख्य मागण्या आहेत तसेच मुख्यमंत्री किंवा पक्षाचे सरचिटणीसपदी द्यावे ही पनीरसेल्वम गटाची तिसरी  मागणी आहे. पलानीस्वामी गटाकडून या तिन्ही मागण्यांवर कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने एकत्रीकरणाची घोषणा रखडली आहे. 

जयललिता यांच्या निधनानंतर त्यांच्या पक्षात शशिकला व ओ पन्नीरसेल्वम असे दोन गट पडले. त्यांनी अण्णाद्रमुकमधील आमदारांच्या मदतीने पक्षाचे सरचिटणीसपद मिळवले व मुख्यमंत्रीपदाची मोर्चेबांधणी केली होती. पण या दरम्यान त्यांना बेहिशेबी संपत्तीप्रकरणी न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा झाली. त्यामुळे शशिकला यांना तुरुंगातून पलानीस्वामी यांचा शपथविधी पाहावा लागला. 

शशिकला तुरुंगात गेल्यानंतर पनीरसेल्वम आणि पलानीस्वामी गट यांच्या एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली. पनीरसेल्वम गटाने शशिकला आणि तिच्या कुटुंबाला बाहेरचा रस्ता दाखवण्याची अट टाकली. टीटीव्ही दिनकरन व त्यांच्या कुटुंबीयांना अण्णाद्रमुकपासून दूर ठेवण्याचा निर्णय पक्षाने घेतला. त्यामुळे दोन गटांतील ऐक्याची प्रक्रिया सोपी झाली.