शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

‘भारत माता की जय’ न म्हणणारे पाकिस्तानी!, भाजपा आमदाराचे उद्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:51 AM

भारत माता की जय न म्हणणा-यांना तर राजकारणात प्रवेशच करू द्यायला नको. ज्या लोकांना ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’ म्हणण्यात मनात काही किंतू असेल, तर ते...

बलिया (उत्तर प्रदेश) : ‘भारत माता की जय’ जे म्हणणार नाहीत ते पाकिस्तानी आहेत, असे उत्तर प्रदेशमधील भाजपाचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी सोमवारी येथे म्हटले.बैरिया मतदार संघातून निवडून आलेले सुरेंद्र सिंह यांनीच काही दिवसांपूर्वी भारत २०२४ पर्यंत हिंदू राष्ट्र बनेल, असे जाहीर केले होते. रातसाद येथील कार्यक्रमात सुरेंद्र सिंह म्हणाले की, भारत माता की जय न म्हणणा-यांना तर राजकारणात प्रवेशच करू द्यायला नको. ज्या लोकांना ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’ म्हणण्यात मनात काही किंतू असेल, तर ते पाकिस्तानी असून देशात राहण्याचा त्यांना हक्क नाही. जे लोक आपल्या मातृभूमीला आईचा दर्जा देत नाहीत, त्यांची देशभक्ती संशयास्पद आहे. ज्यांना ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’ म्हणताना अडचणी आहेत, त्यांना राजकारणात प्रवेश करण्याचीच परवानगी असू नये, असेही त्यांनी म्हटले. बल्लिया येथे १४ जानेवारी रोजी बोलताना सिंह म्हणाले होते की, एकदा भारत हिंदू राष्ट्र बनले की, जे हिंदू संस्कृतीशी एकरूप होतील, तेच मुस्लीम या देशात राहतील. फारच थोडे मुस्लीम हे देशभक्त आहेत. एकदा भारत हिंदू राष्ट्र बनले की, जे मुस्लीम आमच्या संस्कृतीशी एकरूप होतील, ते भारतात राहतील. सुरेंद्र सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अवतारी पुरुष अशा शब्दांत वर्णन केले व काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर हल्ला केला. (वृत्तसंस्था)पोलिसांना थप्पड माराबेकायदा खाणकामाबद्दल बोलताना सुरेंद्र सिंह यांनी असा सल्ला दिला की, खासगी कामासाठी वाळू घेताना कुणा पोलिसांनी अडवले, तर त्यांना सरळ दोन थपडी मारा.

टॅग्स :BJPभाजपा