शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
2
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
3
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
4
भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
5
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
6
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
7
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
8
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
9
Sports Events Schedule 2026 : क्रीडा प्रेमींसाठी नवे वर्ष आहे एकदम खास! कारण...
10
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
11
Arjun Tendulkarचा विजय हजारे स्पर्धेत फ्लॉप शो; ३ सामने खेळून झाले, तरी एकही विकेट मिळेना
12
केवळ १६ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा १ कोटींहून अधिक परतावा; SIP ठरतेय वरदान, सोपं गणित पाहा
13
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ३ उमेदवार बिनविरोध विजयी; प्रभाग २४मध्ये जल्लोष
14
Beauty Jha : संघर्षाची गाथा! वडिलांची नोकरी गेली; मोमोज विकत लेकीने NEET क्रॅक केली, आता होणार डॉक्टर
15
१५ ऑगस्ट… बुलेट ट्रेन मुहूर्त ठरला! पहिला रुट कोणता, मुंबईत कधी सुरू होणार? मोठी माहिती समोर
16
२७ जागांवर वंचित कुणाचा करणार 'गेम', महापालिका निवडणुकीत ५३ उमेदवार उतरवले रिंगणात
17
GST संकलनातून भरली सरकारची तिजोरी; डिसेंबरमध्ये 6% वाढीसह ₹1.74 लाख कोटी पार...
18
Municipal Election 2026: भाजपाचा विजयरथ सुसाट! मतदानाआधी ११ उमेदवार बिनविरोध जिंकले, कुठे-कुठे फुलले कमळ?
19
Vastu Tips : नवीन वर्षाचे कॅलेंडर या दिशेला ठेवू नका; नाही तर अडचणी येऊ शकतात
20
Ahilyanagar Election 2025: मतदानाआधीच 'बिनविरोध' निकालांचा पाऊस; अहिल्यानगरमध्ये अजित पवारांचे दोन उमेदवार विजयी
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 09:14 IST

भारतातील नागरिक विशेषत: पत्रकार, निवृत्त सैन्य अधिकारी यांना काही संशयास्पद कॉल्स येत आहेत.

नवी दिल्ली - भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविराम झाला असला तरीही पाकच्या कुरापती अजूनही सुरूच आहेत. भलेही शत्रू राष्ट्र बंदुकीतून गोळीबार करत नसेल परंतु मोबाईलच्या माध्यमातून तो भारतीय नागरिकांना टार्गेट करत आहे. देशाच्या सुरक्षा यंत्रणेने याबाबत मोठा अलर्ट जारी केला आहे. ज्यात सर्वसामान्य नागरिकांसह निवृत्त सैन्य अधिकारी आणि पत्रकारांनाही सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मोबाईलवरून जाळ्यात अडकवण्याचा प्लॅन

सुरक्षा यंत्रणेनुसार, भारतातील नागरिक विशेषत: पत्रकार, निवृत्त सैन्य अधिकारी यांना काही संशयास्पद कॉल्स येत आहेत. ज्यात कॉल करणारा स्वत:ला भारतीय सैन्याचा अथवा एखाद्या गुप्तचर संस्थेचा अधिकारी असल्याची बतावणी करतो. हे लोक संबंधितांना जाळ्यात ओढून त्यांच्याकडून संवेदशनशील माहिती आणि सैन्य ऑपरेशननिगडीत काही प्रश्न विचारतात. 

'या' नंबरवरून कॉल आल्यास करा ब्लॉक

जर तुम्हाला फोनवर +91 7340921702 यासारख्या कुठल्या नंबरवरून कॉल आल्यास तुम्हीही सतर्क राहा. हे नंबर दिसताना भारतीय नंबर प्रमाणे आहेत परंतु त्यात स्पूफिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. याचा अर्थ खरा नंबर तुम्हाला दिसत नाही आणि त्याऐवजी फेक नंबर स्क्रिनवर झळकतो. कॉल करणारा व्यक्ती ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती मागत असतो. लक्षात कुणीही अधिकारी अशाप्रकारे वैयक्तिक माहिती फोनवर मागत नाही.

सतर्क राहणे सुरक्षित

  • कुठल्याही अज्ञात कॉलवर तुम्ही तुमची ओळख आणि खासगी माहिती शेअर करू नका
  • कॉल करणाऱ्या व्यक्तीवर सहजपणे विश्वास ठेवू नका, मग ते कितीही तुम्हाला विश्वासात आणण्याचा प्रयत्न करत असेल.
  • जर कॉलबाबत थोडीही शंका वाटला तर तातडीने फोन कट करा आणि तो नंबर ब्लॉक करा
  • अशाप्रकारे तुम्हाला कॉल येत असतील तर जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन अथवा सायबर क्राइम पोर्टलवर याबाबत तक्रार करा. 

 

WhatsApp आणि ईमेलवरही धोका

केवळ कॉलच नाही तर WhatsApp आणि इतर सोशल मीडियावर संशयित फाईल्स, लिंक अथवा व्हिडिओ पाठवले जातात. त्यातील काही फाईल्स Tasksche.exe नावाने असतात. ज्यात व्हायरस असतो. या लिंकवर क्लिक केल्यास तुमचा फोन किंवा संगणक यातील सर्व डेटा चोरला जाऊ शकतो. 

या गोष्टींची काळजी घ्या

  • अज्ञात नंबरवरून आलेले कॉल, फाईल्स अथवा लिंक उघडू नका
  • .apk अथवा .exe सारख्या फाईल्सपासून दूर राहा
  • तुमच्या मोबाईल आणि कॉम्प्युटरमध्ये चांगला एंटीव्हायरसचा वापर करा.

 

दरम्यान, सीजफायरमुळे सीमेवर शांतता असेल परंतु आता या दोन्ही देशातील संघर्ष डिजिटल वॉरमध्ये लढला जाईल. शत्रू तंत्रज्ञानाच्या सहाय्याने भारताची सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न करत राहील. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहणे आणि कुठल्याही अज्ञात कॉल्स, संशयित मेसेजला हलक्यात घेऊ नये. तुमची सतर्कता ही देशाची खरी सुरक्षा आहे. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानcyber crimeसायबर क्राइमdigitalडिजिटलOperation Sindoorऑपरेशन सिंदूर