शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
2
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
3
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
4
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
5
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
7
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
8
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
9
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
10
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
11
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
12
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
13
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
14
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
15
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
16
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
18
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
19
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
20
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं

सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 09:14 IST

भारतातील नागरिक विशेषत: पत्रकार, निवृत्त सैन्य अधिकारी यांना काही संशयास्पद कॉल्स येत आहेत.

नवी दिल्ली - भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविराम झाला असला तरीही पाकच्या कुरापती अजूनही सुरूच आहेत. भलेही शत्रू राष्ट्र बंदुकीतून गोळीबार करत नसेल परंतु मोबाईलच्या माध्यमातून तो भारतीय नागरिकांना टार्गेट करत आहे. देशाच्या सुरक्षा यंत्रणेने याबाबत मोठा अलर्ट जारी केला आहे. ज्यात सर्वसामान्य नागरिकांसह निवृत्त सैन्य अधिकारी आणि पत्रकारांनाही सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मोबाईलवरून जाळ्यात अडकवण्याचा प्लॅन

सुरक्षा यंत्रणेनुसार, भारतातील नागरिक विशेषत: पत्रकार, निवृत्त सैन्य अधिकारी यांना काही संशयास्पद कॉल्स येत आहेत. ज्यात कॉल करणारा स्वत:ला भारतीय सैन्याचा अथवा एखाद्या गुप्तचर संस्थेचा अधिकारी असल्याची बतावणी करतो. हे लोक संबंधितांना जाळ्यात ओढून त्यांच्याकडून संवेदशनशील माहिती आणि सैन्य ऑपरेशननिगडीत काही प्रश्न विचारतात. 

'या' नंबरवरून कॉल आल्यास करा ब्लॉक

जर तुम्हाला फोनवर +91 7340921702 यासारख्या कुठल्या नंबरवरून कॉल आल्यास तुम्हीही सतर्क राहा. हे नंबर दिसताना भारतीय नंबर प्रमाणे आहेत परंतु त्यात स्पूफिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. याचा अर्थ खरा नंबर तुम्हाला दिसत नाही आणि त्याऐवजी फेक नंबर स्क्रिनवर झळकतो. कॉल करणारा व्यक्ती ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती मागत असतो. लक्षात कुणीही अधिकारी अशाप्रकारे वैयक्तिक माहिती फोनवर मागत नाही.

सतर्क राहणे सुरक्षित

  • कुठल्याही अज्ञात कॉलवर तुम्ही तुमची ओळख आणि खासगी माहिती शेअर करू नका
  • कॉल करणाऱ्या व्यक्तीवर सहजपणे विश्वास ठेवू नका, मग ते कितीही तुम्हाला विश्वासात आणण्याचा प्रयत्न करत असेल.
  • जर कॉलबाबत थोडीही शंका वाटला तर तातडीने फोन कट करा आणि तो नंबर ब्लॉक करा
  • अशाप्रकारे तुम्हाला कॉल येत असतील तर जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन अथवा सायबर क्राइम पोर्टलवर याबाबत तक्रार करा. 

 

WhatsApp आणि ईमेलवरही धोका

केवळ कॉलच नाही तर WhatsApp आणि इतर सोशल मीडियावर संशयित फाईल्स, लिंक अथवा व्हिडिओ पाठवले जातात. त्यातील काही फाईल्स Tasksche.exe नावाने असतात. ज्यात व्हायरस असतो. या लिंकवर क्लिक केल्यास तुमचा फोन किंवा संगणक यातील सर्व डेटा चोरला जाऊ शकतो. 

या गोष्टींची काळजी घ्या

  • अज्ञात नंबरवरून आलेले कॉल, फाईल्स अथवा लिंक उघडू नका
  • .apk अथवा .exe सारख्या फाईल्सपासून दूर राहा
  • तुमच्या मोबाईल आणि कॉम्प्युटरमध्ये चांगला एंटीव्हायरसचा वापर करा.

 

दरम्यान, सीजफायरमुळे सीमेवर शांतता असेल परंतु आता या दोन्ही देशातील संघर्ष डिजिटल वॉरमध्ये लढला जाईल. शत्रू तंत्रज्ञानाच्या सहाय्याने भारताची सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न करत राहील. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहणे आणि कुठल्याही अज्ञात कॉल्स, संशयित मेसेजला हलक्यात घेऊ नये. तुमची सतर्कता ही देशाची खरी सुरक्षा आहे. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानcyber crimeसायबर क्राइमdigitalडिजिटलOperation Sindoorऑपरेशन सिंदूर