शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

Video - 'दहशतवाद न थांबवल्यास पाकिस्तानचे तुकडे होतील'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 08:58 IST

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला पुन्हा एकदा खडेबोल सुनावले आहेत.

ठळक मुद्देसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला पुन्हा एकदा खडेबोल सुनावले आहेत. 'पाकिस्तानने दहशतवादाचा पुरस्कार करणे थांबवले नाही तर पाकिस्तानचे तुकडे होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही' 'काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्याचा भारताचा निर्णय पचवणे पाकिस्तानला अवघड जात आहे.'

सुरत - संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला पुन्हा एकदा खडेबोल सुनावले आहेत. 'पाकिस्तानने दहशतवादाचा पुरस्कार करणे थांबवले नाही तर पाकिस्तानचे तुकडे होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही' असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. कर्तव्य बजावताना हुतात्मा झालेल्या 122 सैनिकांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यासाठी शनिवारी (14 सप्टेंबर) एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.  

पाकिस्तानी नागरिकांनी नियंत्रण रेषा (एलओसी) पार करण्याचा प्रयत्न केला तर भारतीय जवान त्यांना पुन्हा मागे फिरायची संधी देणार नाहीत, असा इशाराही राजनाथ यांनी यावेळी दिला आहे. 'काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्याचा भारताचा निर्णय पचवणे पाकिस्तानला अवघड जात आहे. या मुद्द्यावरून त्यांनी संयुक्त राष्ट्रांपर्यंत जाण्याचा व त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही' असं देखील राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. 

'स्वातंत्र्यानंतर भारतातील अल्पसंख्याकांच्या लोकसंख्येत वाढ झाली. परंतु पाकिस्तानमध्ये शीख, बौद्ध व इतरांचे मानवी हक्क पायदळी तुडवण्याच्या घटनेमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अन्य कोणी पाकिस्तानचे तुकडे करण्याची गरज नाही. दहशतवादाला पाठीशी घालणे थांबवले नाही, तर पाकिस्तानचे आपोआप तुकडे होतील' असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. याआधी त्यांनी काश्मीर हा नेहमी भारताचा भाग राहिलेला आहे. काश्मीर पाकिस्तानचा भाग होताच कधी? पाकिस्तानचा काश्मीरवर काहीही हक्क नाही, असे  ठणकावले होते. ''मी काश्मीर हा नेहमी भारताचा भाग राहिलेला आहे. मी पाकिस्तानला विचारू इच्छितो की, काश्मीर पाकिस्तानचा भाग होताच कधी? ज्याच्यासाठी तुम्ही नेहमी रडगाणे गात असता. पाकिस्तानचा काश्मीरवर काहीही हक्क नाही.'' पाकिस्तानने त्यांच्या ताब्यातील काश्मीरमध्ये होत असलेल्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाकडे लक्ष द्यावे,असे राजनाथ यांनी पाकिस्तानला सुनावले होते. 

''काश्मीर प्रश्नाबाबत माझी अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांसोबतसुद्धा चर्चा झाली. त्यावेळी अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी कलम 370 हटवणे हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचे मान्य केले. आमचा शेजारी असेल्या पाकिस्तानसोबत चांगले संबंध ठेवण्याची आमची इच्छा आहे. मात्र त्याआधी पाकिस्तानने भारताविरोधात सुरू असलेला दहशतवादाचा वापर बंद केला पाहिजे. जोपर्यंत पाकिस्तानकडून दहशतवादाचा वापर भारताला अस्थिर करण्यासाठी करण्यात येईल तोपर्यंत आम्ही पाकिस्तानशी चर्चा कशी काय करू शकतो,'' अशी विचारणाही राजनाथ सिंह यांनी केली होती. 

 

 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहIndiaभारतPakistanपाकिस्तानterroristदहशतवादी