'ऑपरेशन सिंदूर' सुरू झाल्यानंतर ३० मिनिटांनी पाकिस्तानला माहिती दिली; एस जयशंकर यांनी खासदारांच्या पॅनेलला सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 22:37 IST2025-05-26T22:25:51+5:302025-05-26T22:37:31+5:30

'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने ६-७ मे रोजी पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ले केले.

Pakistan was informed 30 minutes after the launch of Operation Sindoor S Jaishankar told a panel of MPs | 'ऑपरेशन सिंदूर' सुरू झाल्यानंतर ३० मिनिटांनी पाकिस्तानला माहिती दिली; एस जयशंकर यांनी खासदारांच्या पॅनेलला सांगितलं

'ऑपरेशन सिंदूर' सुरू झाल्यानंतर ३० मिनिटांनी पाकिस्तानला माहिती दिली; एस जयशंकर यांनी खासदारांच्या पॅनेलला सांगितलं

'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती पाकिस्तानला कधी देण्यात आली, याबाबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सोमवारी मोठी माहिती दिली. एस जयशंकर यांनी संसदीय समितीला सांगितले की, भारतीय लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी पाकिस्तानला त्यांच्या हद्दीतील दहशतवादी छावण्यांवर हवाई हल्ले केल्यानंतरच माहिती दिली होती. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केल्यानंतर ३० मिनिटांनी इस्लामाबादला अलर्ट देण्यात आला. या कारवाईत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मधील ९ दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले. ही कारवाई ७ मे च्या रात्री करण्यात आली.

Government Yojana: आता रेशन कार्डधारकांना दरमहा १००० रुपये मिळणार, 'असा' करा अर्ज!

एस जयशंकर यांनी असेही म्हटले की त्यांनी कधीही पाकिस्तानशी चर्चा केली नाही. अमेरिकेच्या कथित हस्तक्षेपाबाबत त्यांनी स्पष्ट केले की लष्करी कारवाई थांबवण्याचा निर्णय पाकिस्तानच्या आवाहनानंतर द्विपक्षीय पातळीवर घेण्यात आला. परराष्ट्र व्यवहार सल्लागार समितीच्या सदस्यांना संबोधित करताना मंत्री म्हणाले, 'पाकिस्तानच्या डीजीएमओने जेव्हा ते थांबवण्यास सांगितले तेव्हाच ऑपरेशन सिंदूर थांबवण्यात आले. दोघांमध्ये अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रश्नच उद्भवत नाही. जयशंकर यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या निर्यात सल्लागार समितीच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवतानाचे फोटो शेअर केले. 

एस जयशंकर म्हणाले, 'ऑपरेशन सिंदूर आणि सर्व प्रकारच्या दहशतवादाविरुद्ध भारताच्या शून्य-सहिष्णुतेच्या धोरणावर चर्चा झाली.' या संदर्भात एक मजबूत आणि एकत्रित संदेश पाठवण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

एस जयशंकर यांनी दहशतवादी छावण्यांवर भारताच्या हल्ल्यांबद्दल पाकिस्तानला आधीच माहिती दिल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. मंत्र्यांनी बैठकीत खासदारांना सांगितले की, फक्त दोन्ही देशांच्या डीजीएमओ एकमेकांशी बोलले. इतर कोणत्याही भारतीय अधिकाऱ्याने पाकिस्तानी बाजूशी बोलले नाही. भारताला पाकिस्तानशी चर्चा करण्याचा आग्रह करणाऱ्या अमेरिकेला सांगण्यात आले होते की, दहशतवाद आणि संवाद एकत्र चालू शकत नाहीत, असंही ते म्हणाले.

एस जयशंकर म्हणाले की, डीजीएमओने त्यांच्या पाकिस्तानी समकक्षांना कळवले आहे की जर त्यांनी गोळीबार केला तर भारत प्रत्युत्तर देईल. पाकिस्तानमधील दहशतवादी छावण्यांवर लक्ष्यित हल्ल्यांमुळे पाकिस्तानी सैन्याचे मनोबलही खचले आहे.

Web Title: Pakistan was informed 30 minutes after the launch of Operation Sindoor S Jaishankar told a panel of MPs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.