शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
3
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
4
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
5
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
6
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
7
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
8
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
9
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
10
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
11
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
12
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
13
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
14
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
15
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
16
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
17
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
18
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
19
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?

पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 04:50 IST

पाकिस्तानातील दहशतवादी तळांविरोधात भारताची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ निरपराध लोकांचा मृत्यू झाला होता. अनेक माताभगिनींचे कुंकू (सिंदूर) त्या दिवशी पुसले गेले. कर्त्या माणसांवर दहशतवाद्यांनी घातलेल्या घाल्याने अवघा देश पेटून उठला. त्या कुंकवाची आण घेऊन भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे मंगळवारी मध्यरात्रीनंतर, बुधवारची पहाट उजाडत असताना  अवघ्या पंचवीस मिनिटांत पाकिस्तानातील नऊ ठिकाणचे दहशतवादी तळ क्षेपणास्त्रांचा मारा करीत उद्ध्वस्त केले, तसेच त्यातील १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. या भीम पराक्रमानंतर देशवासीयांनी लष्कराला सलाम केला. 

दहशतवाद्यांना पोसणारा, आपल्या भूमीतून भारतात व अन्यत्र घातपाती कारवाया घडविणाऱ्या पाकिस्तानचे भारताने लष्करी कारवाईद्वारे कंबरडे मोडायचे ठरविले. त्याला ऑपरेशन सिंदूरने सुरुवात झाली. भारतीय हवाई दलाने अत्यंत अचूकपणे केलेल्या कारवाईत जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा यांची दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे, लाँचिंग पॅड तसेच मुख्यालयांवर क्षेपणास्त्र हल्ले करून ते उद्ध्वस्त केले.  ही कारवाई पाकिस्तानच्या हवाई हद्दीत न शिरता करण्यात आली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पाकिस्तान तसेच पाकव्याप्त काश्मीरमधील ज्या नऊ महत्त्वाच्या ठिकाणी दहशतवादी मोठ्या संख्येने उपस्थित होते, अशा ठिकाणांनाच लक्ष्य करण्यात आले. त्यामध्ये पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बहावलपूर येथील जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय आणि मुरिदकेतील लष्कर-ए-तय्यबाच्या तळाचा समावेश आहे. या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले. पाकिस्तानातील चार व पाकव्याप्त काश्मीरमधील पाच ठिकाणी आरोग्य केंद्रांच्या बुरख्याआड दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे चालविली जात होती. भारताने तिथे हल्ला चढवून पाकिस्तानचा बुरखा टराटरा फाडला आहे. १९४७ ते २०१९ पर्यंत वेळोवेळी झालेल्या संघर्षात भारताने पाकिस्तानला नेहमीच धूळ चारली आहे. ऑपरेशन सिंदूरव्दारेदेखील पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या प्रमुख ठिकाणांवरच भारताने घाव घातला असून त्यामुळे पाकिस्तानची अवस्था भेदरलेल्या सशासारखी झाली आहे.

पाकचा जळफळाट, सीमेवर गोळीबार; १६ ठार, जवान शहीदजम्मू/श्रीनगर : पाकिस्तानी सैन्याने बुधवारी जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळील गावांना लक्ष्य करून जोरदार गोळीबार केला. यात सीमेवरील गावांतील  चार मुलांसह १६ जण ठार आणि १५० जण जखमी झाले. तर हरयाणाच्या पलवल येथील तरुण जवान दिनेश कुमार शहीद झाला.

भारतीय सशस्त्र दलांनी दहशतवादी अड्ड्यांवर हल्ले केल्यानंतर हा गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानी गोळीबारात सर्वाधिक नुकसान पूंछ जिल्ह्यात झाले आहे.  भारतीय सैन्य गोळीबाराला योग्य प्रत्युत्तर देत आहे. शत्रूच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यांच्या बाजूने मोठे नुकसान झाले आहे आणि अनेक जण जखमी झाले आहेत.

नागरी वस्त्या, लष्करी ठिकाणांवर हल्ले नाहीत : भारताने सांगितले की, भारतीय हवाई दलाने बुधवारी पहाटे केलेली कारवाई ही विशिष्ट लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून केलेली आहे. आम्ही पाकिस्तानमधील नागरी वस्त्या तसेच कोणत्याही लष्करी ठिकाणावर हल्ला केलेला नाही. ज्या दहशतवादी तळांतून भारतविरोधी कारवाया केल्या जात होत्या तीच ठिकाणे आम्ही नष्ट केली.

आरोग्य केंद्राच्या बुरख्याखाली होता दहशतवादी तळपाकच्या नारोवाल जिल्ह्यातील सरजाल तेहरा कलान येथे आरोग्य केंद्राच्या नावाखाली चालविला जाणारा जैश-ए-मोहम्मदचा असलेला तळ हे दहशतवाद्यांचे लाँचिंग पॅड आहे. हे ठिकाण जम्मूच्या सांबा सेक्टरपासून केवळ ६ किमी अंतरावर आहे आणि येथून बोगद्यांच्या माध्यमातून घुसखोरीसाठी योजना आखली जाते. तसेच ड्रोनद्वारे शस्त्रास्त्रे व अमली पदार्थ टाकण्याचं कामही इथूनच केलं जाते. तोही तळ हवाई दलाने बुधवारी उडवून दिला.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवान