शहरं
Join us  
Trending Stories
1
मातृभाषेसोबतच आणखी एक भारतीय भाषा शिकवा; यूजीसीचं सर्व राज्यांना पत्र, नियमावली जारी
2
काहीही होवो, सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
आजचे राशीभविष्य, ०८ डिसेंबर २०२५: आपण केलेल्या कामातून यश अन् कीर्ती लाभ होईल
4
इंडिगोवर मोठा आर्थिक दंड लावा; डीजीसीए आणि कंपनीच्या प्रमुखांना हटवा
5
यंदा अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज : सभापती, उपसभापतींनी घेतला आढावा
6
देशातील सर्वांत मोठी एअरलाइन का डगमगली?; नवीन नियमांमुळे संकट! कमी कर्मचारी मॉडेलचाही फटका
7
विमानसेवाच जमीनदोस्त ! अनेक विमानतळांवर गोंधळ सुरू, प्रवाशांचे हाल
8
विरोधी पक्षनेतेपद मुद्यावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; ‘मविआ’ला खुर्चीचीच चिंता असल्याची सरकारची टीका
9
महाराष्ट्रात लवकरच येणार ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’ योजना, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
10
विमानतळावर इंडिगोने स्थापन केला आपत्ती व्यवस्थापन गट; अडथळ्यांबाबत २४ तासांत स्पष्टीकरण देण्याची नोटीस
11
क्रिकेटपटू स्मृती मानधना अन् पलाशचे लग्न अखेर माेडले; कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा : स्मृती
12
...ये दोस्ती हम नही तोडेंगे ! मोदी आणि पुतीन यांच्या भेटीकडे अमेरिका, युरोप आणि चीनचेही होते लक्ष
13
आजी-आजोबांच्या ‘स्क्रीन’च्या ‘व्यसनां’चं काय करणार?
14
गोव्यात नाइट क्लब ठरला ‘मृत्यू क्लब’; अग्नितांडवात २५ ठार; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
15
गोवा नाइट क्लबमध्ये कशामुळे भडकली आग? 25 जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार? CM सावंत यांचा मोठा खुलासा, 4 जणांना अटक
16
Bigg Boss 19: गौरव खन्नाने करुन दाखवलं! 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीवर कोरलं नाव
17
गोवा क्लबला दोन एक्झिट गेट, बाहेर पडण्यासाठी धडपडत होते लोक; यामुळे झपाट्याने पसरली आग
18
नाईट क्लब पाडण्याचे आदेश रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; गोव्यातील दुर्घटनेनंतर पंचायत संचालकासह तिघे निलंबित
19
'बिग बॉस १९'मधून तान्या मित्तलचा प्रवास संपला; प्रणित मोरेची टॉप ३ मध्ये एन्ट्री, ट्रॉफी जिंकणार?
20
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: शीतल तेजवानीनंतर रवींद्र तारूला अटक, घरातून घेतलं ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी विमानांना ढाल बनवतोय पाक; कर्नल सोफियांनी पुढे आणला पाकचा चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 06:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : पाकिस्तानने गुरुवारी रात्री साडेआठ वाजता भारतातील सीमेजवळील नागरी वस्त्या, धार्मिक स्थळे आणि लष्करी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पाकिस्तानने गुरुवारी रात्री साडेआठ वाजता भारतातील सीमेजवळील नागरी वस्त्या, धार्मिक स्थळे आणि लष्करी तळ अशा ३६ ठिकाणी ३०० ते ४०० ड्रोनच्या साहाय्याने हल्ले केले. हे सर्व ड्रोन भारताने पाडले. तसेच, भारताचे प्रत्युत्तर रोखण्यासाठी पाकिस्तानने आपली हवाई हद्द खुली ठेवून नागरिकांना ढाल म्हणून वापरण्याचा घातकी प्रयत्न केला, अशी माहिती परराष्ट्र खात्याने शुक्रवारी दिली. कर्नल सोफिया यांनी पत्रकार परिषदेत त्याचा छायाचित्रासह पुरावाही दाखविला.

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, कर्नल सोफिया कुरैशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी भारताकडून पाकिस्तानी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले जात असल्याचे ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत सुरू असलेल्या कारवाईची माहिती देण्यासाठी आयोजित संयुक्त पत्रपरिषदेत सांगितले. 

पाक करतोय प्रार्थनास्थळांवर हल्लेपरराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितले की, पाकिस्तानने भारतातील शहरे, नागरी वस्त्या, काही लष्करी तळांवर हल्ला केला. मात्र भारतीय लष्कराने संयम राखत चोख प्रत्युत्तर दिले. भारतातील कोणत्याही प्रार्थनास्थळावर आपण हल्ला केला नाही, असा पाकिस्तानने केलेला दावा खोटा आहे. पुंछमधील गुरुव्दारावर पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात तेथील रागी व काही शीख भाविकांचा मृत्यू झाला. 

नानकाना साहिब गुरुव्दारावर भारताने हल्ला केल्याचा पाकिस्तानचा आरोप खोटा आहे. पाकिस्तानच्या माऱ्यातील तोफगोळा पुंछमधील चर्चवर पडल्यामुळे एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. पाकिस्तानकडून चर्च, गुरुद्वारे आणि मंदिरांवर हल्ले सुरू आहेत. पहलगाम हल्ल्याच्या घटनेपासूनच पाकिस्तान सर्व गोष्टींना धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप मिस्री यांनी केला.पूंछ येथे पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात कॉन्व्हेंट शाळेतील दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. मंदिर, गुरुद्वारा आणि शाळांना टार्गेट करून पाकिस्तानने खालची पातळी गाठली आहे, असेही मिस्री म्हणाले.

तुर्कीचे सोंगर ड्रोन वापरून सुरू आहेत भारतावर हल्ले सोफिया यांनी सांगितले की, पाकिस्तानने वापरलेले ड्रोन हे तुर्की असिसगार्ड सोंगर ड्रोन असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. याची फॉरेंसिक तपासणी केली जात आहे.पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्राचा अयशस्वी हल्ला केला. मात्र, पाकिस्तानने आपले नागरी हवाई क्षेत्र बंद केले नाही. ही विमान सेवा भारताच्या हल्ल्यापासून आपला बचाव करेल ही त्यामागची भूमिका असल्याचे व्योमिका सिंग यांनी सांगितले. भारतीय लष्कराने प्रत्येक हल्ला हाणून पाडत लाहोर, कराची आणि सियालकोटमधील लष्करी तळांवर जोरदार निशाणा साधला. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तानwarयुद्धIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तान