शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

प्रवासी विमानांना ढाल बनवतोय पाक; कर्नल सोफियांनी पुढे आणला पाकचा चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 06:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : पाकिस्तानने गुरुवारी रात्री साडेआठ वाजता भारतातील सीमेजवळील नागरी वस्त्या, धार्मिक स्थळे आणि लष्करी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पाकिस्तानने गुरुवारी रात्री साडेआठ वाजता भारतातील सीमेजवळील नागरी वस्त्या, धार्मिक स्थळे आणि लष्करी तळ अशा ३६ ठिकाणी ३०० ते ४०० ड्रोनच्या साहाय्याने हल्ले केले. हे सर्व ड्रोन भारताने पाडले. तसेच, भारताचे प्रत्युत्तर रोखण्यासाठी पाकिस्तानने आपली हवाई हद्द खुली ठेवून नागरिकांना ढाल म्हणून वापरण्याचा घातकी प्रयत्न केला, अशी माहिती परराष्ट्र खात्याने शुक्रवारी दिली. कर्नल सोफिया यांनी पत्रकार परिषदेत त्याचा छायाचित्रासह पुरावाही दाखविला.

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, कर्नल सोफिया कुरैशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी भारताकडून पाकिस्तानी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले जात असल्याचे ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत सुरू असलेल्या कारवाईची माहिती देण्यासाठी आयोजित संयुक्त पत्रपरिषदेत सांगितले. 

पाक करतोय प्रार्थनास्थळांवर हल्लेपरराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितले की, पाकिस्तानने भारतातील शहरे, नागरी वस्त्या, काही लष्करी तळांवर हल्ला केला. मात्र भारतीय लष्कराने संयम राखत चोख प्रत्युत्तर दिले. भारतातील कोणत्याही प्रार्थनास्थळावर आपण हल्ला केला नाही, असा पाकिस्तानने केलेला दावा खोटा आहे. पुंछमधील गुरुव्दारावर पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात तेथील रागी व काही शीख भाविकांचा मृत्यू झाला. 

नानकाना साहिब गुरुव्दारावर भारताने हल्ला केल्याचा पाकिस्तानचा आरोप खोटा आहे. पाकिस्तानच्या माऱ्यातील तोफगोळा पुंछमधील चर्चवर पडल्यामुळे एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. पाकिस्तानकडून चर्च, गुरुद्वारे आणि मंदिरांवर हल्ले सुरू आहेत. पहलगाम हल्ल्याच्या घटनेपासूनच पाकिस्तान सर्व गोष्टींना धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप मिस्री यांनी केला.पूंछ येथे पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात कॉन्व्हेंट शाळेतील दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. मंदिर, गुरुद्वारा आणि शाळांना टार्गेट करून पाकिस्तानने खालची पातळी गाठली आहे, असेही मिस्री म्हणाले.

तुर्कीचे सोंगर ड्रोन वापरून सुरू आहेत भारतावर हल्ले सोफिया यांनी सांगितले की, पाकिस्तानने वापरलेले ड्रोन हे तुर्की असिसगार्ड सोंगर ड्रोन असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. याची फॉरेंसिक तपासणी केली जात आहे.पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्राचा अयशस्वी हल्ला केला. मात्र, पाकिस्तानने आपले नागरी हवाई क्षेत्र बंद केले नाही. ही विमान सेवा भारताच्या हल्ल्यापासून आपला बचाव करेल ही त्यामागची भूमिका असल्याचे व्योमिका सिंग यांनी सांगितले. भारतीय लष्कराने प्रत्येक हल्ला हाणून पाडत लाहोर, कराची आणि सियालकोटमधील लष्करी तळांवर जोरदार निशाणा साधला. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तानwarयुद्धIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तान