शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
4
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
5
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
7
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
8
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
10
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
11
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
12
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
13
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
16
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
17
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
18
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
19
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

पुंछ-रावलकोट मार्गावर चालणारी राह-ए-अमन बससेवा स्थगित, पाकिस्तानकडून एलओसीवर गेट बंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2019 7:11 PM

पुलवामा हल्ल्यात भारताचे 40 सीआरपीएफ जवान शहीद झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढलेला आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान दरम्यान धावणारी राह ए अमन ही बससेवा सोमवारी दुपारी पुन्हा रद्द करावी लागली

जम्मू - पुलवामा हल्ल्यात भारताचे 40 सीआरपीएफ जवान शहीद झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढलेला आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान दरम्यान धावणारी राह ए अमन ही बससेवा सोमवारी दुपारी पुन्हा रद्द करावी लागली. नियोजनानुसार सोमवारी दुपारी पुंछवरून रावलकोटसाठी ही बस धावली, मात्र पाकिस्तानकडून एलओसीवर गेट न उघडल्याने ही सेवा रद्द करण्यात आली. सोमवारी रावलकोटला जाण्यासाठी पुंछला पाकव्याप्त काश्मीरचे रहिवाशी सैय्यद बुखारी पोहचले मात्र त्यांना तिकीट खरेदी करणाऱ्या अधिकाऱ्याने पाकिस्तानकडून एलओसीवर गेट न उघडल्याने आजची बससेवा रद्द केल्याची माहिती दिली त्यानंतर अनेक प्रवाशांची गैरसोय झाली. 

एकीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान शांततेसाठी भारताने चर्चा करावी अशी वक्तव्य करत असले तरी दुसरीकडे या दोन्ही देशांमध्ये असणाऱ्या प्रवाशी सेवा रोखण्यात येत आहेत. 

2006 मध्ये सुरू झाली होती बससेवा 

भारत आणि पाकिस्तान यांच्यात सलोख्याचे संबंध राहवेत यासाठी 2006 मध्ये पुंछ-रावलकोट दरम्यान ही बससेवा सुरू केली होती. ज्या ज्या वेळी भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणावाची स्थिती निर्माण झाली अशा वेळी ही बससेवा रद्द करण्यात आली होती.   

टॅग्स :Indiaभारतpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीर