'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 18:39 IST2025-06-10T18:38:46+5:302025-06-10T18:39:36+5:30

Pahalgam Terror Attack : 'भारताने केलेली कारवाई पाकिस्तान कधीच विसरू शकणार नाही.'

Pahalgam Terror Attack: 'If any further attack is attempted...', Foreign Minister Jaishankar's direct warning to Pakistan | '...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा

'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा

Pahalgam Terror Attack : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलेच, शिवाय पाकिस्तानी सैन्यालाही गुडघे टेकायला भाग पाडले. आता त्या कारवाईच्या सुमारे १ महिन्यानंतर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर युरोपच्या दौऱ्यावर गेले आहेत. बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्समधून जयशंकर यांनी पाकिस्तानला पुन्हा एकदा कडक शब्दात इशारा दिला. भारताला पुन्हा दहशतवादी हल्ल्यांची चिथावणी दिली, तर आम्ही पाकिस्तानात घुसून मोठा हल्ला करू, असा धमकी वजा इशारा परराष्ट्रमंत्र्यांनी दिला.

...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू
भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर ब्रुसेल्समध्ये बोलताना म्हणाले की, पाकिस्तान हजारो दहशतवाद्यांना उघडपणे प्रशिक्षण देतो आणि त्यांना भारतात हल्ले करण्यासाठी पाठवतो. भारत यापुढे हे अजिबात सहन करणार नाही. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत एस जयशंकर यांनी पाकिस्तानला इशारा दिला की, जर त्यांनी एप्रिल महिन्यात केलेली क्रूर कृत्ये थांबवली नाहीत, तर त्यांना भारताकडून प्रत्युत्तराला सामोरे जावे लागेल. दहशतवादी पाकिस्तानच्या आत असतील, तर आम्ही पाकिस्तानच्या आत खोलवर जाऊ.

पुन्हा युद्ध सुरू होण्याची शक्यता आहे का?
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पुढे म्हटले की, संघर्षाची मूळ कारणे अजूनही तशीच आहेत. पाकिस्तान हा असा देश आहे, जो दहशतवादाचा वापर साधन म्हणून करतो. यावेळी जयशंकर यांना विचारण्यात आले की, भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्ध होऊ शकते का? यावर ते म्हणाले, पाकिस्तानने दहशतवादी कारवाया थांबवल्या नाही, तर निश्चितच होऊ शकते. 

ब्रुसेल्समध्ये जयशंकर यांना ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताला झालेल्या नुकसानीबद्दल देखील प्रश्न विचारण्यात आला. यावर जयशंकर म्हणाले की, भारताच्या लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्रांमुळे पाकिस्तानी हवाई दलाचे बरेच जास्त नुकसान झाले आहे. याच कारणामुळे पाकिस्तानला भारतासमोर युद्धविरामासाठी हात जोडावे लागले. राफेल विमानांनी केलेली कारवाई किती यशस्वी झाली, याचा पुरावा पाकिस्तानचे नष्ट झालेले हवाई तळ आहेत, असेही ते यावळी म्हणाले. 

Web Title: Pahalgam Terror Attack: 'If any further attack is attempted...', Foreign Minister Jaishankar's direct warning to Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.