शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 15:34 IST

Pahalgam Attack: भारताने सिंधू पाणी करार स्थगित केल्यापासून पाकिस्तान सातत्याने पोकळ धमक्या देत आहे.

Pahalgam Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानसोबत असलेला सिंधू पाणी करार अनिश्चित काळासाठी स्थगित केला आहे. सिंधूचे पाणी रोखल्यामुळे पाकिस्तानात दुष्काळसदृष्य परिस्तिती उद्भवली आहे. त्यामुळेच पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) प्रमुख आणि माजी पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी सातत्याने बारताला युद्धाच्या पोकळ धमक्या देत आहे. आता या धमक्यांना भारताने चोख उत्तर दिले आहे. 

भुट्टोचो पोकळ धमकी२२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या पाच प्रमुख निर्णयांपैकी पाकिस्तानला सर्वात जास्त रडवणारा निर्णय म्हणजे सिंधू पाणी करार रद्द करणे. पाकिस्तान या निर्णयावर इतका संतापला आहे की, वारंवार धमक्या देत आहे. बिलावल भुट्टो झरदारी याच्याकडे धमक्या देण्याचे काम दिले असून, ते सतत सिंधूचा मुद्दा उपस्थित करतात आणि भारताला युद्धाची धमकी देत ​​राहतात. आता पुन्हा एकदा त्यांनी धमकी दिली की, 'जर सिंधूचे पाणी थांबवले, तर आम्ही सर्व सहा नद्या ताब्यात घेऊ. युद्धापासूनही मागे हटणार नाही...' 

भारताचे प्रत्युत्तरबिलावल भुट्टोच्या धमक्यांवर जलशक्ती मंत्री सीआर पाटील यांनी एका ओळीत म्हटले की, पाणी कुठेही जाणार नाही, जे काही बोलायचे आहे ते बोलत राहा. भुट्टो जे बोलतात, तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांना राजकारण करायचे असेल, तर ते करत राहावे. 'पाणी वाहिले नाही, तर रक्त वाहेल', अशी धमकीही त्यांनी दिली होती. अशा धमक्यांना आपण घाबरत नाही, असे प्रत्युत्तर पाटील यांनी दिले. अलिकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील स्पष्टपणे सांगितले होते की, सिंधू पाणी करार कधीही पूर्ववत होणार नाही.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतPakistanपाकिस्तान