शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

ओवैसी हे नव्या भारताचे जिन्ना; विरोधकांवर गंभीर आरोप करत भाजपाने घेतला आक्रमक पवित्रा 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 5:06 PM

प्रत्येक मुद्द्यावरुन काही लोक हिंदू मुस्लीम असं विभाजन करत आहेत असा आरोप संबित पात्रा यांनी केला. 

नवी दिल्ली - संसदेत बहुमताने सुधारित नागरिकत्व कायदा पारित झाल्यानंतर देशातील काही भागात हिंसक आंदोलन होत आहे. त्यामुळे विरोधी पक्ष जबाबदारीने वागत नसल्याचं दिसून येतं. राजकीय पक्षांनी आपापल्या ओवैसींना मुस्लीम मतांसाठी उतरविले आहे. औवेसी देशाचे नवे जिन्ना आहेत असा आरोप भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे. 

देशात जे हिंसक आंदोलन सुरु आहे त्याला काँग्रेस जबाबदार आहे. शनिवारी रामलीला मैदानावर राहुल गांधी यांचे रिलॉन्चिंग करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी हिंसक आंदोलन भडकले असा आरोप संबित पात्रांनी केला. ओवैसी नव्या जिन्नासारखे देशात काम करत आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी नेते अमानतुल्लाह खान आहेत ज्यांना दिल्लीतील जिन्ना बनायचं आहे. ममता बॅनर्जी यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होतं की, बंगालमध्ये राहणाऱ्यांना बंगाली भाषा बोलावी लागेल. मात्र आता हिंदीमध्ये पूर्ण भाषण करत आहेत. पूर्ण देशात वातावरण बिघडावं असं त्यांना वाटतं का असा सवाल भाजपाने केला आहे. 

तसेच हिंसक आंदोलन करणाऱ्यांनी सरन्यायाधीश शरद बोबडे काय म्हणाले ते ऐकावं. तुम्ही विद्यार्थी असाल पण सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही. पंतप्रधान मोदींनी जे सांगितले त्याने धडा घ्यावा. त्याचसोबत कलम ३७० हटविण्यावरही चिदंबरम म्हणाले होते की, जर जम्मू काश्मीर मुस्लीम राज्य असतं तर हे कलम हटवले नसते. राम मंदिर प्रकरणाच्या सुनावणीवेळीही ज्याप्रकारे सुप्रीम कोर्टाच्या निकालावर भाष्य केलं जात होतं. यावरुन स्पष्ट आहे की, प्रत्येक मुद्द्यावरुन काही लोक हिंदू मुस्लीम असं विभाजन करत आहेत असा आरोप संबित पात्रा यांनी केला. 

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही जण राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत ते दुर्दैवी आहे. हा कायदा जो सरकारने आणला आहे त्यात कोणत्याही भारतीयांचे नुकसान नाही. कोणत्याही भारतीयांच्या अधिकारांवर परिणाम होणार नाही. विद्यार्थ्यांनी या गोष्टी समजून घ्यायला हव्यात. मात्र त्यांची माथी भडकावून विद्यार्थ्यांचा वापर करण्याचं काम केलं जात आहे असा आरोप भाजपाने काँग्रेसवर केला.

जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणाबाजी करण्यात आली त्यावेळी राहुल गांधी, प्रकाश करात, डी. राजा असे लोक त्याठिकाणी गेले होते. पुन्हा एकदा अशाप्रकारचे प्रयत्न होताना दिसत आहे. शनिवारी राहुल गांधी यांची रॅली झाली. या रॅलीच्या माध्यमातून रिलॉन्चिंग करण्याचा प्रयत्न झाला अन् दुसऱ्याच दिवशी हिंसाचार वाढला. त्यामुळे या संपूर्ण हिंसक आंदोलनाच्या मागे काँग्रेसचा हात आहे असा आरोप भाजपाने केला आहे.   

 

टॅग्स :Sambit Patraसंबित पात्राcongressकाँग्रेसHinduहिंदूMuslimमुस्लीम