शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

ओवैसी हे नव्या भारताचे जिन्ना; विरोधकांवर गंभीर आरोप करत भाजपाने घेतला आक्रमक पवित्रा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 17:25 IST

प्रत्येक मुद्द्यावरुन काही लोक हिंदू मुस्लीम असं विभाजन करत आहेत असा आरोप संबित पात्रा यांनी केला. 

नवी दिल्ली - संसदेत बहुमताने सुधारित नागरिकत्व कायदा पारित झाल्यानंतर देशातील काही भागात हिंसक आंदोलन होत आहे. त्यामुळे विरोधी पक्ष जबाबदारीने वागत नसल्याचं दिसून येतं. राजकीय पक्षांनी आपापल्या ओवैसींना मुस्लीम मतांसाठी उतरविले आहे. औवेसी देशाचे नवे जिन्ना आहेत असा आरोप भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे. 

देशात जे हिंसक आंदोलन सुरु आहे त्याला काँग्रेस जबाबदार आहे. शनिवारी रामलीला मैदानावर राहुल गांधी यांचे रिलॉन्चिंग करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी हिंसक आंदोलन भडकले असा आरोप संबित पात्रांनी केला. ओवैसी नव्या जिन्नासारखे देशात काम करत आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी नेते अमानतुल्लाह खान आहेत ज्यांना दिल्लीतील जिन्ना बनायचं आहे. ममता बॅनर्जी यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होतं की, बंगालमध्ये राहणाऱ्यांना बंगाली भाषा बोलावी लागेल. मात्र आता हिंदीमध्ये पूर्ण भाषण करत आहेत. पूर्ण देशात वातावरण बिघडावं असं त्यांना वाटतं का असा सवाल भाजपाने केला आहे. 

तसेच हिंसक आंदोलन करणाऱ्यांनी सरन्यायाधीश शरद बोबडे काय म्हणाले ते ऐकावं. तुम्ही विद्यार्थी असाल पण सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही. पंतप्रधान मोदींनी जे सांगितले त्याने धडा घ्यावा. त्याचसोबत कलम ३७० हटविण्यावरही चिदंबरम म्हणाले होते की, जर जम्मू काश्मीर मुस्लीम राज्य असतं तर हे कलम हटवले नसते. राम मंदिर प्रकरणाच्या सुनावणीवेळीही ज्याप्रकारे सुप्रीम कोर्टाच्या निकालावर भाष्य केलं जात होतं. यावरुन स्पष्ट आहे की, प्रत्येक मुद्द्यावरुन काही लोक हिंदू मुस्लीम असं विभाजन करत आहेत असा आरोप संबित पात्रा यांनी केला. 

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही जण राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत ते दुर्दैवी आहे. हा कायदा जो सरकारने आणला आहे त्यात कोणत्याही भारतीयांचे नुकसान नाही. कोणत्याही भारतीयांच्या अधिकारांवर परिणाम होणार नाही. विद्यार्थ्यांनी या गोष्टी समजून घ्यायला हव्यात. मात्र त्यांची माथी भडकावून विद्यार्थ्यांचा वापर करण्याचं काम केलं जात आहे असा आरोप भाजपाने काँग्रेसवर केला.

जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणाबाजी करण्यात आली त्यावेळी राहुल गांधी, प्रकाश करात, डी. राजा असे लोक त्याठिकाणी गेले होते. पुन्हा एकदा अशाप्रकारचे प्रयत्न होताना दिसत आहे. शनिवारी राहुल गांधी यांची रॅली झाली. या रॅलीच्या माध्यमातून रिलॉन्चिंग करण्याचा प्रयत्न झाला अन् दुसऱ्याच दिवशी हिंसाचार वाढला. त्यामुळे या संपूर्ण हिंसक आंदोलनाच्या मागे काँग्रेसचा हात आहे असा आरोप भाजपाने केला आहे.   

 

टॅग्स :Sambit Patraसंबित पात्राcongressकाँग्रेसHinduहिंदूMuslimमुस्लीम