शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

21 हजार भारतीयांनी व्हीसाची मुदत उलटूनही अमेरिकेत वाढवला मुक्काम; 2017 चा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 13:49 IST

2017 या वर्षी 1 लाख 27 हजार 435 भारतीय विद्यार्थी आणि संशोधक विद्यार्थी यांनी एप, जे आणि एम व्हीसावर अमेरिकेत प्रवेश केला. त्यातील 4 हजार 400 भारतीय मुदत संपल्यावरही अमेरिकेत राहिले.

नवी दिल्ली- गेल्या वर्षी 21 हजार भारतीयांनी आपल्या व्हीसाची मुदत संपल्यावरही अमेरिकेत मुक्काम सुरुच ठेवल्याची नवी माहिती अहवालातून स्पष्ट झाली आहे. अर्थात असे करणाऱ्यांमध्ये भारतीयच आघाडीवर आहेत असे नाही तर भारतीयांपेक्षा इतर अनेक देशांच्या नागरिकांनी व्हीसाची मुदत उलटल्यावरही मायदेशी न जाता तेथेच दिवस काढल्याचे लक्षात आले आहे.अमेरिकेचे डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी दरवर्षी असा अहवाल प्रसिद्ध करत असते. 2017 या वर्षासाठी या विभागाने बुधवारी अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानुसार 10. 7 लाख भारतीयांनी बी-1, बी-2 या व्हीसासाठी अर्ज केला होता. हे सर्व नागरिक व्यवसाय, सदिच्छा भेट किंवा पर्यटनासाठी अमेरिकेत जात होते. त्यापैकी 14 हजार 2014 लोकांनी व्हीसा संपल्यावरही तेथेच मुक्काम केला तर 12 हजार 498 लोकांनी अमेरिका सोडल्याची कोणतीही माहिती मिळालेली नाही. हे लोक बेकायदेशील स्थलांतरित म्हणून अमेरिकेतच राहात असावेत.

2016 साली बी-1 आणि बी-2 व्हीसासाठी 10 लाख भारतीयांनी अर्ज केला होता मात्र त्यातील 17 हजार 763 लोकांनी व्हीसा संपल्यावरही अमेरिकेतच राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यातील 2,040 लोकांनी मुदत उलटल्यावर अमेरिका सोडली तर 15 हजार 723 लोक अजूनही बेकायदेशीर स्थलांतरित म्हणून अमेरिकेत कोठेतरी राहात असावेत. 2017 या वर्षी 1 लाख 27 हजार 435 भारतीय विद्यार्थी आणि संशोधक विद्यार्थी यांनी एप, जे आणि एम व्हीसावर अमेरिकेत प्रवेश केला. त्यातील 4 हजार 400 भारतीय मुदत संपल्यावरही अमेरिकेत राहिले. त्यातील 1,567 विद्यार्थ्यांनी नंतर अमेरिका सोडली आणि 2 हजार 833 लोक अजूनही अमेरिकेत राहात असावेत.

टॅग्स :USअमेरिकाVisaव्हिसाStudentविद्यार्थीAmericaअमेरिका