शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

नोव्हेंबरमध्ये येऊ शकतो अयोध्या खटल्याचा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2019 6:40 AM

नवी दिल्ली : अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद खटल्याचा अंतिम निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून येत्या नोव्हेंबरमध्ये दिला जाण्याची शक्यता आहे. अलाहाबाद उच्च ...

नवी दिल्ली : अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद खटल्याचा अंतिम निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून येत्या नोव्हेंबरमध्ये दिला जाण्याची शक्यता आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निवाड्यात वादातील दोन तृतीयांश जमीन मिळालेल्या हिंदू पक्षकारांनी सर्वोच्च न्यायालयातील आपला युक्तिवाद संपविला आहे. त्यावरून ही शक्यता वर्तविण्यात येत आहे.

७० वर्षे जुन्या अयोध्या खटल्यात २.७७ एकर जागेचा वाद आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निवाड्यास आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात ६ आॅगस्ट रोजी सुनावणी सुरू झाली होती. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. न्या. एस. ए. बोबडे, न्या. डी. वाय. चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. एस. अब्दुल नजीर यांचा न्यायपीठात समावेश आहे. रामलला, निर्मोही आखाडा, अखिल भारतीय रामजन्मस्थान पुनरुत्थान समिती, हिंदू महासभेचे दोन गट, शिया वक्फ बोर्ड आणि गोपाल सिंग विशारद यांचे कायदेशीर वारस हे या खटल्यातील पक्षकार आहेत.

१९४९ च्या डिसेंबरमध्ये बाबरी मशिदीत मूर्ती स्थापन झाल्यानंतर १९५१ मध्ये गोपाल सिंग विशारद यांनी पहिली याचिका न्यायालयात दाखल केली होती. तेव्हापासून हा खटला सुरू आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई हे १७ नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. त्याआधीच न्यायालय निर्णय देऊ शकेल, असे बोलले जात आहे. धवन यांनी आपणास युक्तिवादासाठी किमान २० दिवस लागतील, असे म्हटले आहे. त्यांना २० दिवस दिले तरीही न्यायालयाकडे निर्णयासाठी एक महिना उरतो.च्अलाहाबाद उच्च न्यायालयाने या जमिनीचे तीन तुकडे केले होते. एक तृतीयांश जमीन रामलला देवतेस, एक तृतीयांश जमीन निर्मोही आखाड्याच्या राम चबुतरा आणि सीता रसोईस तसेच उरलेली एक तृतीयांश जमीन सुन्नी वक्फ बोर्डास दिली होती. या निर्णयास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.च्रामलला देवता आणि निर्मोही आखाडा यांचा युक्तिवाद संपला असून, आता केवळ सुन्नी वक्फ बोर्डाचे वकील राजीव धवन यांचा युक्तिवाद राहिला आहे. त्यांना न्यायालयाने आठवड्यातील पाच दिवस युक्तिवाद करण्यास सांगितले आहे.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरCourtन्यायालयSupreme Courtसर्वोच्च न्यायालय