शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaishnavi Hagawane Death Case: 'जणू वैष्णवीच आमच्याकडे परतली'; बाळाला पाहताच कस्पटे कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला
2
"सुप्रिया सुळेंची केंद्रात मंत्री होण्याची तीव्र इच्छा, शरद पवार दुसऱ्या पक्षात जाताना दिसतील"; संजय शिरसाटांचं मोठं भाकित
3
Investment Tips by Robert Kiyosaki : 'महामंदी' येणार? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा इशारा! म्हणाले फक्त 'या' गोष्टीच तुमची संपत्ती वाचवतील
4
Jyoti Malhotra : "माझ्याकडे पैसे नाहीत..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी सरकारकडे केली 'ही' मोठी मागणी
5
लष्कर जंग जंग पछाडतंय, पण महिना झाला तरी पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी का सापडत नाही आहेत? ही आहेत कारणं
6
INDvENG: वासिम जाफरने इंग्लंडच्या कसोटी दौऱ्यासाठी निवडला भारताचा संघ; कर्णधार कुणाला केलं पाहिलंत का?
7
हा विकृतपणा अन् नीचपणाचा कळस,अशा प्रवृत्ती ठेचल्याच पाहिजेत;उदय सामंत यांची संतप्त भावना
8
Government Jobs: सरकारी नोकरी आणि पगार जवळपास २ लाख रुपये; एमपीएससीकडून भरतीची घोषणा!
9
बाजारात पुन्हा 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी 'धडाम', बाजाराच्या घसरणीमागे 'ही' आहेत ४ मोठी कारणे
10
Astro Tips: रोज सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावण्याबरोबरच ठेवा 'या' तीन गोष्टी; लक्ष्मी होईल कृपावंत!
11
Vastu Shastra: वास्तुसाठी फर्निचर निवडताना 'या' चुका टाळा, अन्यथा निर्माण होऊ शकतो वास्तुदोष!
12
आठवडाभराने करणार होता प्रपोज, पण..., इस्राइली दूतावासातील कर्मचाऱ्यांची प्रेमकहाणी राहिली अधुरी 
13
IPL 2025: पाकिस्तानला रडवणाऱ्या तगड्या बॅट्समनची RCB मध्ये 'एन्ट्री'; किती मिळाले पैसे?
14
इतरांनी मृत समजले, पण तिने वाचवले; अपघातग्रस्त तरुणासाठी देवदूत बनून आली नर्स
15
"माझी आई फुकट आणायची"; परदेशात ४ हजारांना विकली जाणारी बॅग पाहताच नेटकरी सुसाट
16
असले नालायक लोक माझ्या पक्षात नको; पळून पळून जाणार कुठं? दोषींवर कारवाई होणार - अजित पवार
17
बापरे! ७ महिन्यांत २५ लग्न केली, नवरीने सुहागरात्रीनंतर प्रत्येकाला लुटले; कारनामे ऐकून सर्वांनाच धक्का बसला
18
MI vs DC: मुंबईनं सामना जिंकला अन् मालकीण निता अंबानी यांनी प्रेक्षकांचे मन! पाहा फोटो
19
'संघराज्य रचनेचा अनादर, ED ने सर्व मर्यादा ओलांडल्या...', सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
20
दानिश निघाला ISI एजंट, दिल्लीत बसून करायचा हेरगिरी; ज्योती मल्होत्रा प्रकरणात मोठा खुलासा

"सिंदूर स्फोटक बनतं तेव्हा...’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला पुन्हा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 13:49 IST

Operation Sindoor: २२ तारखेला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून आम्ही २२ मिनिटांत दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त केले. जेव्हा सिंदूर स्फोटकाचं रूप घेतं तेव्हा काय परिणाम होतात हे या हल्ल्यांच्या निमित्ताने जगाने आणि देशाच्या शत्रूंनी पाहिले,असे मोदी यांनी सांगितले.

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज एक महिना पूर्ण झाला आहे. हा हल्ला झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्य दलांनी ऑपरेशन सिंदूर राबवत या हल्ल्याचा बदला घेतला होता. या कारवाईत सुरुवातीला पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. तर पाकिस्तानने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केल्यावर पाकिस्तानमधील अनेक हवाई तळांना लक्ष्य करण्यात आले होते, त्यामुळे पाकिस्तानवर युद्धविरामासाठी विनवणी करण्याची वेळ आली होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरदरम्यान, सैन्यदलांनी दाखवलेल्या शौर्याला अभिवादन करत पाकिस्तानला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. जेव्हा सिंदूर स्फोटक बनतं तेव्हा काय होतं हे जगाने आणि पाकिस्तानने पाहिलंय, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

राजस्थानमधील बिकानेर येथे एका सभेसाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील सभेला संबोधित करताना ऑपरेशन सिंदूरबाबत मोठं विधान केलं. ते म्हणाले की, पहलगाममध्ये ज्या गोळ्या झाडल्या गेल्या, त्यामुळे देशातील १४० कोटी देशवासियांच्या हृदयाला जखमा झाल्या होत्या. त्यानंतर प्रत्येक देशवासीयाने एकजूट होऊन दहशतवाद्यांना मातीत गाडण्याचा संकल्प केला होता. आज तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने आणि देशाच्या सैन्यदलांनी दाखवलेल्या शौर्यामुळे आम्ही तो संकल्प पूर्ण करण्यात यशस्वी ठरलो आहोत. आमच्या सरकारने तिन्ही सैन्य दलांना कारवाईसाठी पूर्ण सुट दिली होती. मग तिन्ही सैन्यदलांनी मिळून असं चक्रव्युह रचलं की ज्यामुळे पाकिस्तानला गुडघे टेकून शरणागती पत्करावी लागली, असे मोदी यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, २२ तारखेला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून आम्ही २२ मिनिटांत दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त केले. जेव्हा सिंदूर स्फोटकाचं रूप घेतं तेव्हा काय परिणाम होतात हे या हल्ल्यांच्या निमित्ताने जगाने आणि देशाच्या शत्रूंनी पाहिले,असे मोदी यांनी सांगितले. तसेच ऑपरेशन सिंदूरने तीन महत्त्वाचे संदेश दिले आहेत. पहिला म्हणजे जर कुठला दहशतवादी हल्ला झाला, तर आमचं लष्कर प्रत्युत्तर देईल. वेळ आणि पद्धतही लष्कराकडून ठरवलं जाईल. दुसरी बाब म्हणजे आम्ही अणुबॉम्बच्या भीतीला घाबरत नाही. तिसरी बाब म्हणजे दहशतवादी आणि त्यांना पाठीशी घालणारं सरकार यांना एकच मानलं जाईल. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतPakistanपाकिस्तान