शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

"सिंदूर स्फोटक बनतं तेव्हा...’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला पुन्हा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 13:49 IST

Operation Sindoor: २२ तारखेला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून आम्ही २२ मिनिटांत दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त केले. जेव्हा सिंदूर स्फोटकाचं रूप घेतं तेव्हा काय परिणाम होतात हे या हल्ल्यांच्या निमित्ताने जगाने आणि देशाच्या शत्रूंनी पाहिले,असे मोदी यांनी सांगितले.

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज एक महिना पूर्ण झाला आहे. हा हल्ला झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्य दलांनी ऑपरेशन सिंदूर राबवत या हल्ल्याचा बदला घेतला होता. या कारवाईत सुरुवातीला पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. तर पाकिस्तानने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केल्यावर पाकिस्तानमधील अनेक हवाई तळांना लक्ष्य करण्यात आले होते, त्यामुळे पाकिस्तानवर युद्धविरामासाठी विनवणी करण्याची वेळ आली होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरदरम्यान, सैन्यदलांनी दाखवलेल्या शौर्याला अभिवादन करत पाकिस्तानला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. जेव्हा सिंदूर स्फोटक बनतं तेव्हा काय होतं हे जगाने आणि पाकिस्तानने पाहिलंय, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

राजस्थानमधील बिकानेर येथे एका सभेसाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील सभेला संबोधित करताना ऑपरेशन सिंदूरबाबत मोठं विधान केलं. ते म्हणाले की, पहलगाममध्ये ज्या गोळ्या झाडल्या गेल्या, त्यामुळे देशातील १४० कोटी देशवासियांच्या हृदयाला जखमा झाल्या होत्या. त्यानंतर प्रत्येक देशवासीयाने एकजूट होऊन दहशतवाद्यांना मातीत गाडण्याचा संकल्प केला होता. आज तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने आणि देशाच्या सैन्यदलांनी दाखवलेल्या शौर्यामुळे आम्ही तो संकल्प पूर्ण करण्यात यशस्वी ठरलो आहोत. आमच्या सरकारने तिन्ही सैन्य दलांना कारवाईसाठी पूर्ण सुट दिली होती. मग तिन्ही सैन्यदलांनी मिळून असं चक्रव्युह रचलं की ज्यामुळे पाकिस्तानला गुडघे टेकून शरणागती पत्करावी लागली, असे मोदी यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, २२ तारखेला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून आम्ही २२ मिनिटांत दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त केले. जेव्हा सिंदूर स्फोटकाचं रूप घेतं तेव्हा काय परिणाम होतात हे या हल्ल्यांच्या निमित्ताने जगाने आणि देशाच्या शत्रूंनी पाहिले,असे मोदी यांनी सांगितले. तसेच ऑपरेशन सिंदूरने तीन महत्त्वाचे संदेश दिले आहेत. पहिला म्हणजे जर कुठला दहशतवादी हल्ला झाला, तर आमचं लष्कर प्रत्युत्तर देईल. वेळ आणि पद्धतही लष्कराकडून ठरवलं जाईल. दुसरी बाब म्हणजे आम्ही अणुबॉम्बच्या भीतीला घाबरत नाही. तिसरी बाब म्हणजे दहशतवादी आणि त्यांना पाठीशी घालणारं सरकार यांना एकच मानलं जाईल. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतPakistanपाकिस्तान