शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
3
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
4
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
5
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
6
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
7
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
8
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
9
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
10
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
11
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
12
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
13
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
14
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
15
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
16
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
17
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
18
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
19
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

"सिंदूर स्फोटक बनतं तेव्हा...’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला पुन्हा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 13:49 IST

Operation Sindoor: २२ तारखेला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून आम्ही २२ मिनिटांत दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त केले. जेव्हा सिंदूर स्फोटकाचं रूप घेतं तेव्हा काय परिणाम होतात हे या हल्ल्यांच्या निमित्ताने जगाने आणि देशाच्या शत्रूंनी पाहिले,असे मोदी यांनी सांगितले.

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज एक महिना पूर्ण झाला आहे. हा हल्ला झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्य दलांनी ऑपरेशन सिंदूर राबवत या हल्ल्याचा बदला घेतला होता. या कारवाईत सुरुवातीला पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. तर पाकिस्तानने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केल्यावर पाकिस्तानमधील अनेक हवाई तळांना लक्ष्य करण्यात आले होते, त्यामुळे पाकिस्तानवर युद्धविरामासाठी विनवणी करण्याची वेळ आली होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरदरम्यान, सैन्यदलांनी दाखवलेल्या शौर्याला अभिवादन करत पाकिस्तानला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. जेव्हा सिंदूर स्फोटक बनतं तेव्हा काय होतं हे जगाने आणि पाकिस्तानने पाहिलंय, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

राजस्थानमधील बिकानेर येथे एका सभेसाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील सभेला संबोधित करताना ऑपरेशन सिंदूरबाबत मोठं विधान केलं. ते म्हणाले की, पहलगाममध्ये ज्या गोळ्या झाडल्या गेल्या, त्यामुळे देशातील १४० कोटी देशवासियांच्या हृदयाला जखमा झाल्या होत्या. त्यानंतर प्रत्येक देशवासीयाने एकजूट होऊन दहशतवाद्यांना मातीत गाडण्याचा संकल्प केला होता. आज तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने आणि देशाच्या सैन्यदलांनी दाखवलेल्या शौर्यामुळे आम्ही तो संकल्प पूर्ण करण्यात यशस्वी ठरलो आहोत. आमच्या सरकारने तिन्ही सैन्य दलांना कारवाईसाठी पूर्ण सुट दिली होती. मग तिन्ही सैन्यदलांनी मिळून असं चक्रव्युह रचलं की ज्यामुळे पाकिस्तानला गुडघे टेकून शरणागती पत्करावी लागली, असे मोदी यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, २२ तारखेला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून आम्ही २२ मिनिटांत दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त केले. जेव्हा सिंदूर स्फोटकाचं रूप घेतं तेव्हा काय परिणाम होतात हे या हल्ल्यांच्या निमित्ताने जगाने आणि देशाच्या शत्रूंनी पाहिले,असे मोदी यांनी सांगितले. तसेच ऑपरेशन सिंदूरने तीन महत्त्वाचे संदेश दिले आहेत. पहिला म्हणजे जर कुठला दहशतवादी हल्ला झाला, तर आमचं लष्कर प्रत्युत्तर देईल. वेळ आणि पद्धतही लष्कराकडून ठरवलं जाईल. दुसरी बाब म्हणजे आम्ही अणुबॉम्बच्या भीतीला घाबरत नाही. तिसरी बाब म्हणजे दहशतवादी आणि त्यांना पाठीशी घालणारं सरकार यांना एकच मानलं जाईल. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतPakistanपाकिस्तान