शहरं
Join us  
Trending Stories
1
"तो गौरीला म्हणायचा की, स्वतः मरेन आणि तुलाही यात अडकवेल"; गौरी यांच्या मामाचे अनंत गर्जेबद्दल स्फोटक दावे, दोघांमध्ये काय घडलं?
2
'न बोलण्यासारखं काही घडलेलं नाही'; CM फडणवीसांकडून महायुतीतील दुराव्याच्या चर्चांना पूर्णविराम
3
ठाकरे बंधू एकत्र, उत्साह वाढला; पण अचानक ‘राज’ आज्ञा अन् मनसे इच्छुकांचा पुन्हा भ्रमनिरास
4
५० लाखांचे घर घ्यायचे की १ कोटीचे? '५-२०-३-४०' हा एक फॉर्म्युला देईल अचूक उत्तर!
5
IND vs SA 2nd Test : मुथुसामीची 'आउट ऑफ सिलॅबस सेंच्युरी'! पहिल्या डावात द.आफ्रिकेची मोठी धावसंख्या
6
शेअर बाजारात पैशांचा पाऊस! टॉप १० पैकी ७ कंपन्यांना १.२८ लाख कोटींचा फायदा; सर्वाधिक कमाई कोणाची?
7
VIDEO : "मजाक बना रखा है टेस्ट क्रिकेट को..." अंपायरनं घड्याळ दाखवलं; मग कुलदीपवर भडकला पंत
8
बापरे! आईच्या दुधात आढळलं युरेनियम, ६ जिल्ह्यांत ४० केस; नवजात बाळांना कॅन्सरचा मोठा धोका
9
पोलीस कॉन्स्टेबल होता ७ कोटींच्या लुटीच्या टोळीचा ट्रेनर; ३ महिन्यांचे नियोजन अन् RBI अधिकारी बनून केली लूट
10
बिहार निवडणूक निकाल २०२५ वर प्रशांत किशोर पुन्हा बोलले; म्हणाले, “महिलांना १० हजार...”
11
Senuran Muthusamy Maiden Test Century : मुथुसामीचा मोठा पराक्रम! ऐतिहासिक कसोटीत ठोकली पहिली सेंच्युरी
12
तुमच्या PAN कार्डवर कुणी कर्ज तर घेतले नाही ना? टीव्ही अभिनेत्यासोबत झाली मोठी फसवणूक; इथे तपासा
13
मार्गशीर्ष विनायक चतुर्थी २०२५: वरदान देईल गणपती, अर्पण करा ५ गोष्टी; कसा कराल व्रत विधी?
14
निवडणूक आयोगाचा चमत्कार; SIR अभियानाच्या एका फोन कॉलने जुळली ३७ वर्षांपूर्वी तुटलेली नाती
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना हवे तसे यश, कामे होतील; उसनवारी परत मिळेल, कोणाला कठीण काळ?
16
१६ वर्षांची साथ एका क्षणात सुटली... तेजस क्रॅशमधील विंग कमांडरच्या मृत्यूने पत्नीला मोठा धक्का
17
"मी घाबरून ३१व्या मजल्यावरील खिडकीतून..."; पत्नी गौरी पालवेंनी आयुष्य संपवले, गंभीर आरोपांवर अनंत गर्जे काय म्हणाले?
18
Sushma Andhare : "प्रिय उदयभाऊ, उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्वकांक्षा मी..."; सुषमा अंधारेंचा खोचक टोला
19
टीम इंडियाचा स्टार खेळाडू पुन्हा मैदानात ! तब्बल १ वर्षानंतर खेळताना दिसणार क्रिकेट सामना
20
शिंदेसेनेचे आमदार निलेश राणेंची BJP प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर आगपाखड, संतापून म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

"सिंदूर स्फोटक बनतं तेव्हा...’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला पुन्हा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 13:49 IST

Operation Sindoor: २२ तारखेला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून आम्ही २२ मिनिटांत दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त केले. जेव्हा सिंदूर स्फोटकाचं रूप घेतं तेव्हा काय परिणाम होतात हे या हल्ल्यांच्या निमित्ताने जगाने आणि देशाच्या शत्रूंनी पाहिले,असे मोदी यांनी सांगितले.

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज एक महिना पूर्ण झाला आहे. हा हल्ला झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्य दलांनी ऑपरेशन सिंदूर राबवत या हल्ल्याचा बदला घेतला होता. या कारवाईत सुरुवातीला पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. तर पाकिस्तानने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केल्यावर पाकिस्तानमधील अनेक हवाई तळांना लक्ष्य करण्यात आले होते, त्यामुळे पाकिस्तानवर युद्धविरामासाठी विनवणी करण्याची वेळ आली होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरदरम्यान, सैन्यदलांनी दाखवलेल्या शौर्याला अभिवादन करत पाकिस्तानला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. जेव्हा सिंदूर स्फोटक बनतं तेव्हा काय होतं हे जगाने आणि पाकिस्तानने पाहिलंय, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

राजस्थानमधील बिकानेर येथे एका सभेसाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील सभेला संबोधित करताना ऑपरेशन सिंदूरबाबत मोठं विधान केलं. ते म्हणाले की, पहलगाममध्ये ज्या गोळ्या झाडल्या गेल्या, त्यामुळे देशातील १४० कोटी देशवासियांच्या हृदयाला जखमा झाल्या होत्या. त्यानंतर प्रत्येक देशवासीयाने एकजूट होऊन दहशतवाद्यांना मातीत गाडण्याचा संकल्प केला होता. आज तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने आणि देशाच्या सैन्यदलांनी दाखवलेल्या शौर्यामुळे आम्ही तो संकल्प पूर्ण करण्यात यशस्वी ठरलो आहोत. आमच्या सरकारने तिन्ही सैन्य दलांना कारवाईसाठी पूर्ण सुट दिली होती. मग तिन्ही सैन्यदलांनी मिळून असं चक्रव्युह रचलं की ज्यामुळे पाकिस्तानला गुडघे टेकून शरणागती पत्करावी लागली, असे मोदी यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, २२ तारखेला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून आम्ही २२ मिनिटांत दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त केले. जेव्हा सिंदूर स्फोटकाचं रूप घेतं तेव्हा काय परिणाम होतात हे या हल्ल्यांच्या निमित्ताने जगाने आणि देशाच्या शत्रूंनी पाहिले,असे मोदी यांनी सांगितले. तसेच ऑपरेशन सिंदूरने तीन महत्त्वाचे संदेश दिले आहेत. पहिला म्हणजे जर कुठला दहशतवादी हल्ला झाला, तर आमचं लष्कर प्रत्युत्तर देईल. वेळ आणि पद्धतही लष्कराकडून ठरवलं जाईल. दुसरी बाब म्हणजे आम्ही अणुबॉम्बच्या भीतीला घाबरत नाही. तिसरी बाब म्हणजे दहशतवादी आणि त्यांना पाठीशी घालणारं सरकार यांना एकच मानलं जाईल. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतPakistanपाकिस्तान