शहरं
Join us  
Trending Stories
1
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
2
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
3
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
4
१७ वर्षीय आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; पण फिफ्टी आड आला माफाका
5
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
6
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
7
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
8
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
9
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
10
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
11
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
12
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
13
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
14
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
15
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
16
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
17
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
18
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
19
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
20
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...

"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 15:17 IST

Operation Sindoor: त्यांचे नेते मोरारजी देसाई हे हा पुरस्कार मिळालेले एकमेव भारतीय राजकारणी आहेत. त्याशिवाय लालकृष्ण अडवाणींसारखे आणखी काही नेते निशान ए पाकिस्तानचे हक्कदार आहेत. तसेच नवाज शरीफ यांच्या घरी न बोलावता बिर्याणी खायला गेलेली व्यक्तीही या पुरस्कारासाठी पात्र आहे, अशी टीका पवन खेरा यांनी केली.  

पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला, त्यानंतर भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूर राबवत त्याचा घेतलेला बदला आणि चार दिवस चाललेल्या संघर्षानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेला युद्धविराम, यानंतर आता भारताच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांना उत आला आहे. एकीकडे राहुल गांधी यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यावर गंभीर आरोप करत या संघर्षात भारताने किती राफेल विमानं गमावली आसा, सवाल केला होता. त्यानंतर भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी सोशल मीडियावर एक व्यंगचित्र शेअर करून राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. त्याला आता काँग्रेसकडूनही तिखट प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

अमित मालवीय यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा म्हणाले की, गंभीर वातावरणामध्ये सत्ताधारी पक्षाकडून कार्टुनगिरी सुरू आहे. विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांसोबत उभे होते. मात्र भाजपा नेहमी वाह्यातपणा करते. आमचा सैन्यदलांवर विश्वास आहे, मात्र आमचा राष्ट्रीय नेतृत्वावर विश्वास नाही. पहलगाममध्ये निष्पाप लोकांची हत्या करून फरार झालेल्या चार दहशतवाद्यांचे काय झाले? खरंतर नवाज शरीफ यांच्या घरी बिर्याणी खाऊन आलेल्यांना निशान-ए-पाकिस्तान मिळाला पाहिजे, अशा टोलाही त्यांनी लगावला.

पवन खेरा पुढे म्हणाले की, आम्ही देशाच्या राजकीय नेतृत्वाला विचारू इच्छितो की, तुम्ही पाकिस्तानला आधीच कल्पना दिली होती, त्यामुळेच अझहर मसूद आणि हाफिज सईद बचावले का? आता निशान ए पाकिस्तानचा प्रश्न विचाराल तर, त्यांचे नेते मोरारजी देसाई हे हा पुरस्कार मिळालेले एकमेव भारतीय राजकारणी आहेत. त्याशिवाय लालकृष्ण अडवाणींसारखे आणखी काही नेते निशान ए पाकिस्तानचे हक्कदार आहेत. तसेच नवाज शरीफ यांच्या घरी न बोलावता बिर्याणी खायला गेलेली व्यक्तीही या पुरस्कारासाठी पात्र आहे, अशी टीका पवन खेरा यांनी केली.  

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरcongressकाँग्रेसBJPभाजपाIndiaभारतPakistanपाकिस्तान