शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 15:17 IST

Operation Sindoor: त्यांचे नेते मोरारजी देसाई हे हा पुरस्कार मिळालेले एकमेव भारतीय राजकारणी आहेत. त्याशिवाय लालकृष्ण अडवाणींसारखे आणखी काही नेते निशान ए पाकिस्तानचे हक्कदार आहेत. तसेच नवाज शरीफ यांच्या घरी न बोलावता बिर्याणी खायला गेलेली व्यक्तीही या पुरस्कारासाठी पात्र आहे, अशी टीका पवन खेरा यांनी केली.  

पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला, त्यानंतर भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूर राबवत त्याचा घेतलेला बदला आणि चार दिवस चाललेल्या संघर्षानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेला युद्धविराम, यानंतर आता भारताच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांना उत आला आहे. एकीकडे राहुल गांधी यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यावर गंभीर आरोप करत या संघर्षात भारताने किती राफेल विमानं गमावली आसा, सवाल केला होता. त्यानंतर भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी सोशल मीडियावर एक व्यंगचित्र शेअर करून राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. त्याला आता काँग्रेसकडूनही तिखट प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

अमित मालवीय यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा म्हणाले की, गंभीर वातावरणामध्ये सत्ताधारी पक्षाकडून कार्टुनगिरी सुरू आहे. विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांसोबत उभे होते. मात्र भाजपा नेहमी वाह्यातपणा करते. आमचा सैन्यदलांवर विश्वास आहे, मात्र आमचा राष्ट्रीय नेतृत्वावर विश्वास नाही. पहलगाममध्ये निष्पाप लोकांची हत्या करून फरार झालेल्या चार दहशतवाद्यांचे काय झाले? खरंतर नवाज शरीफ यांच्या घरी बिर्याणी खाऊन आलेल्यांना निशान-ए-पाकिस्तान मिळाला पाहिजे, अशा टोलाही त्यांनी लगावला.

पवन खेरा पुढे म्हणाले की, आम्ही देशाच्या राजकीय नेतृत्वाला विचारू इच्छितो की, तुम्ही पाकिस्तानला आधीच कल्पना दिली होती, त्यामुळेच अझहर मसूद आणि हाफिज सईद बचावले का? आता निशान ए पाकिस्तानचा प्रश्न विचाराल तर, त्यांचे नेते मोरारजी देसाई हे हा पुरस्कार मिळालेले एकमेव भारतीय राजकारणी आहेत. त्याशिवाय लालकृष्ण अडवाणींसारखे आणखी काही नेते निशान ए पाकिस्तानचे हक्कदार आहेत. तसेच नवाज शरीफ यांच्या घरी न बोलावता बिर्याणी खायला गेलेली व्यक्तीही या पुरस्कारासाठी पात्र आहे, अशी टीका पवन खेरा यांनी केली.  

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरcongressकाँग्रेसBJPभाजपाIndiaभारतPakistanपाकिस्तान