शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
4
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
5
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
6
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
7
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
8
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
9
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
10
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
11
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
12
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
13
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
14
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
15
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
16
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
17
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
19
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
20
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 

Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरच्या सन्मानार्थ सीएसएमटी रेल्वे स्थानकावर तिरंगी रोषणाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 23:29 IST

India Pakistan War Live Updates: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकविरोधात मोठी कारवाई करत ५ धाडसी निर्णय घेतले. त्यात सिंधु जल कराराला ...

13 May, 25 11:28 PM

ऑपरेशन सिंदूरच्या सन्मानार्थ सीएसएमटी रेल्वे स्थानकावर तिरंगी रोषणाई

ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावर तिरंगी रोषणाई करण्यात आली.

13 May, 25 09:03 PM

भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ तिरंगा यात्रेत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत सहभागी

ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर सशस्त्र दलांच्या सन्मानार्थ पोरवोरिममध्ये काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत सहभागी झाले.

13 May, 25 08:16 PM

मोदींनी सैनिकांचे मनोबल वाढवले- एकनाथ शिंदे

"ऑपरेशन सिंदूर यशस्वी करणाऱ्या सैनिकांना भेटल्याबद्दल मी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन करतो. आज त्यांनी सैनिकांशी आणि देशातील जनतेशी संवाद साधला. ते आदमपूर हवाई तळावर गेले आणि सैनिकांचे मनोबल वाढवले. ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाले आणि पाकिस्तानला त्याची जागा दाखवून देण्यात आली. यापुढे कोणताही दहशतवादी हल्ला झाला तर तो युद्ध मानला जाईल, असे मोदींकडून स्पष्ट करण्यात आले. यामुळे भारतीय सैनिकांचे मनोबल उंचावले आहे", असे एकनाथ शिंदे म्हणाले.

13 May, 25 08:04 PM

शहीद दीपक चिंगाखम यांच्यावर अंत्यसंस्कार

पाकिस्तानने केलेल्या सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात कर्तव्य बजावताना शहीद झालेले बीएसएफ कॉन्स्टेबल जीडी दीपक चिंगाखम यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.

13 May, 25 07:21 PM

गुजरातमधील अहमदाबादमध्ये तिरंगा यात्रा

भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनार्थ गुजरातमधील अहमदाबादमध्ये तिरंगा यात्रा काढण्यात आली.

13 May, 25 06:39 PM

"विजयाचा दावा करणं ही जुनी सवय, त्यांनी 1971, 1975 आणि 1999 कारगिल युद्धातही असंच केलं होतं"

13 May, 25 06:27 PM

जर त्यांनी आमच्यावर गोळीबार केला तर आम्ही योग्य प्रत्युत्तर देऊ - रणधीर जयस्वाल

13 May, 25 06:24 PM

"काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मंजूर नाही"

आमची दीर्घकाळापासूनची राष्ट्रीय भूमिका आहे की जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित कोणतेही प्रश्न भारत आणि पाकिस्तानने द्विपक्षीय पद्धतीने सोडवले पाहिजेत. त्या धोरणात बदल झालेला नाही. पाकिस्तानने पीओके रिकामा करावा - रणधीर जयस्वाल

13 May, 25 06:21 PM

सिंधू पाणी करार स्थगित

13 May, 25 06:12 PM

"पाकिस्तान जितक्या लवकर ते स्वीकारेल तितकं चांगलं"

13 May, 25 06:10 PM

आम्ही पाकिस्तानने केलेलं विधान पाहिलं आहे. ज्या राष्ट्राने औद्योगिक स्तरावर दहशतवादाला पोसलं आहे त्याने असा विचार करावा की ते परिणामांपासून वाचू शकतील, तर हे स्वतःला मूर्ख बनवत आहे. भारताने नष्ट केलेली दहशतवादी पायाभूत सुविधांची ठिकाणं केवळ भारतीयांच्याच नव्हे तर जगभरातील इतर अनेक निष्पाप लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार होती. पाकिस्तान जितक्या लवकर ते स्वीकारेल तितकं चांगलं - रणधीर जयस्वाल
 

13 May, 25 06:09 PM

जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. दहशतवाद्यांचे पाकिस्तानशी संबंध असल्याचे पुरावे आहेत - रणधीर जयस्वाल
 

13 May, 25 06:06 PM


 

13 May, 25 06:04 PM

पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी टीआरएफने घेतली होती - रणधीर जयस्वाल
 

13 May, 25 06:03 PM

पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी टीआरएफने घेतली होती - रणधीर जयस्वाल
 

13 May, 25 06:03 PM

पाकिस्तानाकडून हल्ला झाल्यास भारतही प्रत्युत्तर देणार, पाकिस्तानने अनेक वर्षांपासून दहशतवादाला खतपाणी घातलं - रणधीर जयस्वाल
 

13 May, 25 05:57 PM

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची पत्रकार परिषद

13 May, 25 05:53 PM

"आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"


 

13 May, 25 05:51 PM

"१०० हून अधिक दहशतवादी मारले गेले"

"ते भित्र्यासारखे लपून आले, पण ते विसरले की, त्यांनी ज्याला आव्हान दिलं होतं ते भारतीय सैन्य होतं. समोरून हल्ला करून तुम्ही त्यांना मारलं आहे. दहशतवादाचे सर्व प्रमुख अड्डे उद्ध्वस्त केले. ९ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले, १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. दहशतवादाच्या सूत्रधारांना आता हे समजलं आहे की भारताकडे नजर वर करून पाहिल्यास एकच परिणाम होईल तो म्हणजे विनाश" असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. 
 

13 May, 25 05:35 PM

"आपल्या ड्रोन, क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानची उडवली झोप"

आपले ड्रोन, आपली क्षेपणास्त्र ... त्यांच्याबद्दल फक्त विचार केल्याने पाकिस्तानची अनेक दिवसांची झोप उडून जाईल. भारत ही बुद्धांची भूमी आहे आणि गुरू गोविंद सिंहजी यांचीही भूमी आहे. गुरू गोविंद सिंहजी यांनी म्हटलं होतं की, 'सवा लाख से एक लड़ाऊं, चिड़ियन ते मैं बाज तुड़ाऊं, तबै गुरु गोबिंद सिंह नाम कहाऊं' वाईटाचा नाश करण्यासाठी आणि आपल्या धर्माच्या रक्षणासाठी शस्त्र उचलणं ही आपली परंपरा आहे. म्हणूनच जेव्हा आमच्या बहिणी आणि मुलींचं सिंदूर हिसकावून घेतलं गेलं, तेव्हा आम्ही दहशतवाद्यांच्या घरात घुसून त्यांना चोख उत्तर दिलं - नरेंद्र मोदी 
 

13 May, 25 05:28 PM

मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम

ज्या पाकिस्तानी सैन्यावर हे दहशतवादी अवलंबून होते त्यांना भारतीय लष्कर, भारतीय हवाई दल आणि भारतीयांनी पराभूत केलं आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याला हे देखील दाखवून दिलं की पाकिस्तानमध्ये अशी कोणतीही जागा शिल्लक नाही जिथे दहशतवादी आरामात श्वास घेऊ शकतील. आम्ही घरात घुसून मारू आणि तुम्हाला पळून जाण्याची एकही संधी देणार नाही - पंतप्रधान 

13 May, 25 05:26 PM

पंतप्रधान मोदींकडून पाकिस्तानच्या दाव्याची पोलखोल

13 May, 25 05:25 PM

एस-400 हवाई संरक्षण प्रणाली सुरक्षित

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने भारतातील अनेक शहरांवर ड्रोन हल्ले केले, त्याला भारतीय सैन्याने परतून लावले. पण, यानंतर पाकिस्तान सरकारने सतत याबाबत खोटा प्रचार करत होता. आदमपूर एअरबेस उडवल्याचे पाकिस्तान सरकार आणि माध्यमांमधून सांगितले जाऊ लागले. पाकिस्तानने आदमपूरमधील एस-400 हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केल्याचा दावाही केला होता. पण, आता आज पंतप्रधान मोदींनी या एअरबेसवर जाऊन S-400 हवाई संरक्षण प्रणालीसोबत फोटो शेअर केला. 

13 May, 25 12:56 PM

चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे तीन दहशतवादी ठार

दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील केलर येथील शुक्रू वनक्षेत्रात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे तीन दहशतवादी ठार झाले आहेत.

13 May, 25 12:39 PM

पहलगाम दहशतवाद्यांवर २० लाखांचा इनाम; काश्मीर खोऱ्यात पोस्टर लागले

पहलगाम दहशतवाद्यांवर २० लाखांचा इनाम; काश्मीर खोऱ्यात पोस्टर लागले

13 May, 25 10:58 AM

जम्मू काश्मीरमध्ये लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना सैन्याने घेरले, चकमक सुरू

जम्मू काश्मीरमध्ये लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना सैन्याने घेरले, चकमक सुरू

13 May, 25 09:33 AM

पंतप्रधान मोदी काहीही दावा करूदेत, युद्धबंदी अमेरिकेच्याच दबावाखाली : सपा

पंतप्रधान मोदी काहीही दावा करू शकतात पण युद्धबंदी अमेरिकेच्या दबावाखाली झाली: सपा खासदार रामजी लाल सुमन

13 May, 25 09:32 AM

सीमावर्ती भाग वगळता इतर शाळा पुन्हा सुरू

भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीनंतर सीमावर्ती भाग वगळता इतर शाळा पुन्हा सुरू झाल्या.

13 May, 25 03:24 AM

एअर इंडियाच्या जम्मू, लेह, जोधपूर, अमृतसर, भुज, जामनगर, चंदीगड आणि राजकोटच्या विमान सेवा रद्द

13 May, 25 01:10 AM

इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द

13 May, 25 12:19 AM

सीमेवर शांतता, परिस्थिती नियंत्रणात; भारतीय सैन्य सतर्क

12 May, 25 11:43 PM

पाकिस्तानने शरणागती पत्करल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशाला संबोधित केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. 'पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत की दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाहीत. जर चर्चा होणार असेल तर, ती फक्त पीओकेवरच होईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. भारताच्या हल्ल्याने पाकिस्तानला कसे उद्ध्वस्त केले आणि आपल्या संरक्षण यंत्रणेने पाकिस्तानचे हल्ले पूर्णपणे हाणून पाडले, ज्यामुळे पाकिस्तानने शरणागती पत्करली. त्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली', असे फडणवीस यांनी म्हटले.
 

12 May, 25 10:47 PM

भारताचा कोणताही शत्रू वाचू शकत नाही, अमित शाहांची पोस्ट

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केल्यानंत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट केले. भारताचा कोणताही शत्रू वाचू शकत नाही, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले.

12 May, 25 10:08 PM

आम्हाला दहशतवाद संपवायचाय, तुम्ही धाडस करा- कपिल सिब्बल

ऑपरेशन सिंदूरवरील पंतप्रधान मोदींच्या राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणावर राज्यसभा खासदार कपिल सिब्बल म्हणाले की. 'जागतिक नेतृत्वाने असा विचार करावा की, पाकिस्तान हा दहशतवादाचा स्रोत आहे. विरोधी पक्ष तुमच्यासोबत आहे. मी विरोधी पक्षाच्या वतीने बोलू शकत नाही. पण मला माहित आहे की, या लढाईत विरोधी पक्ष तुमच्यासोबत आहे. मी तुमच्यासोबत आहे, भारतातील लोक तुमच्यासोबत आहेत. आम्हाला दहशतवाद संपवायचा आहे पण तुम्ही धाडस करा, पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करा आणि नंतर अमेरिकेला सांगा की ते पाकिस्तानसोबत व्यवसाय करू शकत नाही. मग आम्ही स्वीकारू की एक नवीन आयाम स्थापित झाला. आपली तुलना पाकिस्तानशी केली जाऊ नये आणि अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आपली तुलना पाकिस्तानशी करू शकत नाहीत.'

12 May, 25 09:18 PM

मोदी यांनी दहशतवादाविरूद्धचे धोरण जगासमोर ठेवले- राजनाथ सिंह

'आज राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी दहशतवादाविरुद्धचे भारताचे धोरण अतिशय स्पष्ट आणि ठामपणे संपूर्ण जगासमोर ठेवले. त्यांचे भाषण केवळ भारताच्या भावना व्यक्त करणारे नाही तर ते आपल्या देशाच्या लष्करी, राजनैतिक आणि नैतिक सामर्थ्याचे सादरीकरण आहे. भविष्यात पाकिस्तानशी कोणतीही चर्चा होणार असेल तर ती फक्त दहशतवाद आणि पीओकेवरच असेल, असेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान त्यांनी भारतीय सैन्याच्या शौर्याचे आणि पराक्रमाचे उघडपणे कौतुक केले. संपूर्ण देशाला भारतीय सैन्याचा अभिमान आहे. मी पंतप्रधानांचे त्यांच्या कणखर नेतृत्वाबद्दल आभार मानतो', असे ट्विट संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले.

12 May, 25 08:34 PM

ऑपरेशन सिंदूर स्थगित केलंय, थांबवलेलं नाही; मोदींचा पाकिस्तानला इशारा

भारताने पाकिस्तानमधील तळ उद्ध्वस्त केली. भारताने ऑपरेशन सिंदूर स्थगित केलंय, थांबवलेलं नाही, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला इशारा दिला.

12 May, 25 08:23 PM

आमच्या बहिणी आणि मुलींचं कुंकू पुसण्याची किंमत मोजावी लागली- मोदी

पाकिस्तानच्या भूमिकेवर टीका करताना मोदी म्हणाले की, 'आम्ही दहशतवाद्यांना मातीत गाडण्यासाठी भारतीय सैन्याला संपूर्ण सूट दिली. आणि आज प्रत्येक दहशतवादी, प्रत्येक संघटना समजले की, आमच्या बहिणी आणि मुलींचे कुंकू पुसण्याची किती मोठी किंमत मोजावी लागली.'

12 May, 25 08:10 PM

सैन्याचा पराक्रम देशाच्या माता, बघिणी आणि मुलींना समर्पित- मोदी

सैन्याचा पराक्रम देशाच्या माता, बघिणी आणि मुलींना समर्पित- मोदी
आपण सर्वांनी गेल्या काही दिवसांत देशाचे सामर्थ्य आणि संयम पाहिले आहे. मी सर्वात आधी भारताच्या पराक्रमी सेना, सशस्त्र बल आमच्या गुप्तचर यंत्रणा, वैज्ञानिक यांना प्रत्येक देशवासियांकडून सलाम करतो. आमच्या वीर सैनिकांनी ऑपरेशन सिंदूरच्या लक्ष्याच्या प्राप्तीसाठी असीम शौर्याचं प्रदर्शन केले. मी त्यांच्या वीरतेला नमन करतो, त्यांचे धाडस, पराक्रम देशाच्या प्रत्येक माता, बहिणी आणि मुलीला समर्पित करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

12 May, 25 07:41 PM

भारताचा पाकिस्तानातील ११ एअरबेसवर हल्ला

पाकिस्तानकडून हवाई हल्ले करण्यात आल्यानंतर भारतानेही तसेच उत्तर दिले. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या ११ हवाई तळांवर हल्ला चढवला. भारतीय लष्कराने डागलेल्या मिसाईल्समुळे या हवाई तळांचं मोठं नुकसान झालं आहे. यात सरगोधा पासून नूर खान एअर बेसचाही समावेश आहे. 

12 May, 25 07:19 PM

किराना हिल्सवर भारताने हल्ला केला का?

भारताचे एअर मार्शल ए.के. भारती यांना प्रश्न विचारण्यात आला की, भारताने किराना हिल्सवर हल्ला केलाय का?  या प्रश्नाला उत्तर देताना एअर मार्शल भारती म्हणाले, "किराना हिल्समध्ये अण्वस्त्र स्टोरेज आहे, हे आम्हाला सांगण्यासाठी आभार. आम्हाला याबद्दल माहिती नव्हते. आम्ही किराना हिल्सवर हल्ला केला नाही. मग तिथेही काहीही असो अथवा नसो. काल झालेल्या पत्रकार परिषदेत आमच्याकडून सगळी माहिती दिली गेली आहे."

12 May, 25 07:04 PM

एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले

डीजी एअर ऑपरेशन्स एअर मार्शल ए.के. भारती यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आम्ही Loiter munitions आणि Unmanned aerial system बद्दल चर्चा केली आहे. आम्ही हे munitions पाडले आहेत. तुम्ही त्याचे फोटो पाहू शकता. एका फोटोचा संदर्भ देत त्यांनी सांगितलं की ही YIHA सिस्टिम आहे आणि ती तुर्कीमध्ये बनवली आहे. पण आम्ही ते पाडले आहे. "

12 May, 25 07:02 PM

"चीनचं मिसाईल फ्लॉप, तुर्कस्तानचं ड्रोन पाडलं"

भारतीय हवाई दलाने 'ऑपरेशन सिंदूर' बाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेचे अनेक स्तर खंबीरपणे एखाद्या भिंतीसारखे उभे होते. त्याला भेदणं पाकिस्तानला अशक्य होतं. डीजी एअर ऑपरेशन्स एअर मार्शल एके भारती यांनी "पाकिस्तानने चीनचं एअर टू एअर मिसाईल PL-15 चा वापर केला होता. पण या मिसाईलने आपलं टार्गेट मिस केलं. फोटोमध्ये तुम्ही या मिसाईलचे तुकडे पाहू शकता. ते आता आमच्याकडे आहेत" असं म्हटलं आहे. 

12 May, 25 07:01 PM

जब हौंसले बुलंद हो, तो मंजिले भी कदम चुमती है

आम्ही सज्ज होतो. हवाई संरक्षण प्रणालीही तयार होती. आपली हवाई संरक्षण प्रणाली भिंतीसारखी तयार होती. पाकिस्तानचे हल्ले हाणून पाडण्याची आम्ही आधीच तयारी केली होती. जब हौंसले बुलंद हो, तो मंजिले भी कदम चुमती है - राजीव घई 

12 May, 25 07:00 PM

निष्पाप पर्यटकांवर हल्ला

२०२४ मध्ये जम्मूमधील शिवखोरी मंदिराकडे जाताना भाविकांवर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर आता यावर्षी एप्रिलमध्ये पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांवर हल्ला करण्यात आला. हा दहशतवादी हल्ल्यांचा ट्रेंड बदलला असल्याची उदाहरणे आहेत. शिवखोरीनंतर पहलगामममध्ये त्यांच्या पापाचा घडा भरला होता. त्यानंतर जे घडलं आहे, त्याबद्दल आम्ही सविस्तर बोललो आहे - राजीव घई 

12 May, 25 06:59 PM

पहलगाममध्ये त्यांच्या पापाचा घडा भरला - राजीव घई

डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले, "दहशतवाद्यांच्या हल्ल्यांमध्ये बदल होत चालले आहेत. लष्करासोबतच आता निष्पाप नागरिकांवर, जे स्वतःचे संरक्षण करण्यात अपयशी ठरतात. त्यांच्यावरही हल्ले केले जात आहेत."

12 May, 25 06:57 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार

पहलगाम दहशतवादी हल्ला, त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने राबवलेलं 'ऑपरेशन सिंदूर', त्यानंतर पाकिस्तानने केलेली आगळीक, त्यांना भारतीय लष्कराने दिलेला दणका आणि अखेर दोघांनी सहमतीने घेतलेला युद्धविरामाचा निर्णय, या पार्श्वभूमीवर पंतप्रधाननरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार आहेत.

12 May, 25 12:34 PM

भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओंची हॉटलाइनवर चर्चा अद्याप झाली नाही

युद्धविरामानंतर पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओंची हॉटलाइनवर चर्चा होऊ शकली नाही

12 May, 25 12:50 PM

३२ विमानतळांसाठी जारी केलेले NOTAMs रद्द करण्यात आले, आजपासून संचालन सुरु होणार

३२ विमानतळांसाठी जारी केलेले NOTAMs रद्द करण्यात आले

12 May, 25 12:36 PM

पंतप्रधानांच्या निवासस्थानी ऑपरेशन सिंदूरबाबत तासाभरापासून उच्चस्तरीय बैठक सुरू.

पंतप्रधानांच्या निवासस्थानी ऑपरेशन सिंदूरबाबत तासाभरापासून उच्चस्तरीय बैठक सुरू.

12 May, 25 12:16 AM

पंजाबमधील होशियारपूर येथे ब्लॅक आऊट, अचानक सायरनचा आवाज

पंजाबमधील होशियारपूर येथे अचानक सायरन ऐकू आल्याने आणि त्यानंतर संपूर्ण परिसरात अंधार पसरल्याने नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

12 May, 25 12:14 AM

दिल्ली विमानतळावरील सेवा सामान्यपणे कार्यरत; प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी

12 May, 25 12:07 AM

दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो- अरुण साव

पहलगाम घटनेनंतर भारत सरकारने ज्या पद्धतीने अनेक ऐतिहासिक आणि कडक निर्णय घेतले, मग ते सिंधू पाणी करार रद्द करणे असो, पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करणे असो, सीमा बंद करणे असो. ऑपरेशन सिंदूर भारत आणि भारतीय सैन्यासाठी एक मोठा विजय होता. भारताने पाकिस्तानात १०० किमी आत जाऊन ९ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले, त्यांचे प्रशिक्षण केंद्र उद्ध्वस्त केले आणि अहवालानुसार सुमारे १०० दहशतवादी मारले, तेव्हा ऑपरेशन सिंदूरने संपूर्ण जगाला संदेश दिला की भारतात 'सिंदूर'चे महत्त्व काय आहे, 'सिंदूर'ची किंमत काय आहे आणि भारत दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो, असे छत्तीसगडचे मुख्यमंत्री अरूण साव म्हणाले.

11 May, 25 10:00 PM

पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ला करण्यासाठी नौदल होतं तयार


 

11 May, 25 09:56 PM

"जर पाकिस्तानने आज रात्री शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर आम्ही त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ"


 

11 May, 25 09:38 PM

IC-814 प्लेन हाईजॅकचा मास्टरमाइंड

युसूफ अझहर हा IC-814 प्लेन हाईजॅकचा मास्टरमाइंड होता, जो जैश-ए-मोहम्मदशी संबंधित होता. तसेच अब्दुल मलिक रऊफ IC-814 हायजॅकिंगसह पुलवामा हल्ल्याच्या कटात सहभागी होता. हवाई हल्ल्याचा उद्देश दहशतवादी हल्ल्यांच्या कट रचणाऱ्यांना शिक्षा करणं आणि त्यांच्या दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट करणं हा होता, जो आम्ही यशस्वीरित्या साध्य केला - राजीव घई 

11 May, 25 09:10 PM

भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर दिले आणि पाकिस्तानचे सर्व हल्ले हाणून पाडले. यानंतर आम्ही पाकिस्तानच्या डीजीएमओला एक हॉटलाइन संदेश पाठवला, इशारा दिला की, जर पाकिस्तानने पुन्हा युद्धविरामचे उल्लंघन केले, तर त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल - राजीव घई 

11 May, 25 08:44 PM

४० पाकिस्तानी सैनिक ठार - राजीव घई

पाकिस्तानने लहान ड्रोन आणि यूएव्हीद्वारे भारताच्या लष्करी तळांना आणि हवाई पट्ट्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, परंतु आपल्या हवाई संरक्षण यंत्रणेने प्रत्येक हल्ला हाणून पाडला. सीमेपलीकडून होणाऱ्या पाकिस्तानी गोळीबाराला भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले. या कारवाईतील भारतीय सैन्याने केवळ नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याचे ३०-४० सैनिक आणि अधिकारी मारले. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचे पाच जवानही शहीद झाले -  राजीव घई 

11 May, 25 08:32 PM

आपले सर्व पायलट सुखरूप परतले आहेत, ऑपरेशन सिंदूरमध्ये ५ सैनिक शहीद झाले - राजीव घई


 

11 May, 25 08:14 PM

"जर पाकिस्तानने आज रात्री शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर आम्ही त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ"


 

11 May, 25 07:59 PM

"भारताचं कोणतेही नुकसान झालं नाही"

एके भारती म्हणाले की,पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारताचे कोणतेही नुकसान झाले नाही, कारण भारतीय हवाई संरक्षण प्रणाली पूर्णपणे सक्रिय आणि सतर्क होती. आमच्या हवाई संरक्षण तयारीमुळे, पाकिस्तानी हल्ल्यात कोणतेही नुकसान झाले नाही. 
 

11 May, 25 07:53 PM

हल्ल्याचे ड्रोन आणि सॅटेलाइट फुटेज

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बहावलपूर येथील दहशतवादी तळावर अचूक क्षेपणास्त्र हल्ला केला आणि तो पूर्णपणे उद्ध्वस्त केला. हा परिसर जैश-ए-मोहम्मदचं मुख्य ठिकाण मानलं जातं, जिथून भारताविरुद्ध बऱ्याच काळापासून दहशतवादी कारवाया केल्या जात होत्या.  एके भारती यांनी हल्ल्याचे ड्रोन आणि सॅटेलाइट फुटेज सादर केले, ज्यामध्ये बहावलपूरमध्ये झालेला प्रचंड विनाश स्पष्टपणे दिसत आहे.
 

11 May, 25 07:46 PM

"फक्त दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवरच लक्ष केंद्रित केले"

हवाई दलाचे महासंचालक एअर ऑपरेशन्स एअर मार्शल अवधेश कुमार भारती यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय हवाई दलाने अतिशय काळजीपूर्वक फक्त दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवरच लक्ष केंद्रित केले आणि कोणत्याही नागरिकाची जीवितहानी होऊ दिली नाही. आम्ही संपूर्ण योजना अशा प्रकारे बनवली होती की फक्त दहशतवादी अड्ड्यांवरच अचूक हल्ला होईल आणि कोणत्याही नागरिकाचे नुकसान होणार नाही.

11 May, 25 07:36 PM

मुरीदके आणि बहावलपूर सारख्या दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला झाला - एके भारती

11 May, 25 07:33 PM

१०० हून अधिक दहशतवादी मारले

काही ठिकाणं पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये होती आणि काही पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात होती - जे मुरीदके, कसाब आणि डेव्हिड हेडली सारख्या दहशतवाद्यांशी संबंधित आहेत. हल्ल्यांमध्ये १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले, ज्यात युसूफ अझहर, अब्दुल मलिक रौफ आणि मुदस्सीर अहमद सारखे टार्गेट होते. हे दहशतवादी  IC 814 हाइजॅक  आणि पुलवामा हल्ल्यात सहभागी होते - राजीव घई

11 May, 25 07:32 PM

पहलगाममध्ये भारतीय नागरिकांवर झालेल्या हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूरची योजना आखण्यात आली होती. या कारवाईचे लष्करी उद्दिष्ट  हे दहशतवादी आणि त्यांचे अड्डे नष्ट करणं होतं. आम्ही सीमेपलीकडील दहशतवादी तळांची सखोल ओळख पटवली. परंतु तेथील अनेक ठिकाणं आधीच रिकामी करण्यात आली होती, परंतु आम्हाला अशी ९  ठिकाणं आढळली जी आमच्या एजन्सींनी एक्टिव्ह असल्याचं सांगितलं -  राजीव घई 

11 May, 25 07:31 PM

तीन मोठे दहशतवादी मारले

भारतीय लष्कराचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी  'ऑपरेशन सिंदूर' बद्दल महत्त्वाची माहिती दिली. "ऑपरेशन सिंदूरचं उद्दिष्ट फक्त दहशतवाद्यांचा खात्मा करणं आहे. आपण १०० दहशतवाद्यांचा खात्मा केला" असल्याचं घई यांनी म्हटलं आहे. तसेच दहशतवाद्यांचे अड्डे उडवून दिल्याचे पुरावे दाखवले. दहशतवादी हल्ल्याला लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलं. यामध्ये मुदस्सर खार, हाफिज जमील आणि युसूफ अझहर असे तीन मोठे दहशतवादी मारले गेले आहेत.

11 May, 25 07:30 PM

"दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"

11 May, 25 07:03 PM

काश्मीर प्रश्नी अमेरिकेचा मध्यस्थीचा प्रस्ताव भारताने फेटाळला

पाकिस्तान आणि भारतामध्ये असलेल्या काश्मीर प्रश्नी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिला. अमेरिकेच्या या प्रस्तावाचे पाकिस्तानने स्वागत केले. पण, भारताने मध्यस्थीचा हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, भारताची यासंदर्भात भूमिका स्पष्ट आहे. काश्मीर प्रश्नी आमची भूमिका स्पष्ट आहे आणि कोणत्याही तिसऱ्या पक्षाची मध्यस्थी मान्य नाही. पाकिस्तानला दहशतवादी भारताच्या ताब्यात द्यायचे असतील, चर्चेचे दरवाजे खुले आहेत. 

आता फक्त पाकव्याप्त काश्मीर भारताला परत करण्याच्या मुद्द्यावर चर्चा केली जाऊ शकते. त्याशिवाय इतर कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्याची गरज नाही, असेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. 

11 May, 25 05:37 PM

'पाकिस्तानला मेसेज मिळालाय, आता थेट तुमच्या मुख्यालयावरच हल्ला करू'

पाकिस्तानच्या आयएसआयशी सलग्नित असलेल्या मुरिदके, बहावलपूर या दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ले करून भारताने स्पष्ट मेसेज दिला आहे की, आमचे लक्ष्य भटकलेले नाही. आम्ही आता लहान अड्ड्यांवर हल्ला करणार नाही, तर आता तुमच्या मुख्यालयावरच हल्ला करू, असे पंतप्रधान मोदी बैठकीत म्हणाल्याचे सूत्रांनी सांगितले. 

11 May, 25 04:35 PM

भारतीय लष्कराने पाकिस्तानवर केले हे मोठे घाव

भारतीय लष्कराच्या दहशतवादी तळावरील हल्ल्यांनंतर पाकिस्तानी लष्कराने हवाई हल्ले केले. त्याला भारतानेही तसेच उत्तर दिले. भारतीय लष्कराने पाकिस्तानातील ११ हवाई तळांनाच लक्ष्य केले. यात हवाई तळांचं प्रचंड नुकसान झाले. 

दुसरं म्हणजे भारताने पाकिस्तानची AWACS एअर डिफेन्स सिस्टिमही उद्ध्वस्त केली. भारताने पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले, ज्यात १०० पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले. आंतरराष्ट्रीय सीमेलगत असलेले दहशतवाद्यांचे अनेक लॉन्चिंग पॅड्सही भारतीय लष्कराने उद्ध्वस्त केले.

11 May, 25 03:55 PM

ब्रह्मोस मिसाईलची ताकद पाकिस्तानला विचारा -योगी आदित्यनाथ

ऑपरेशन सिंदूरमध्ये ब्रह्मोस मिसाईलची एक झलक बघायला मिळाली. जर बघितली नसेल, तर पाकिस्तानातील लोकांना जाऊन विचारा की, ब्रह्मोस मिसाईलची ताकद काय आहे, असे विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. 

उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये ब्रह्मोस सुपरनसॉनिक क्रूज मिसाईल उत्पादन युनिटचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात योगी आदित्यनाथ बोलत होते. 

11 May, 25 03:36 PM

ब्रह्मोस सुपरसॉनिक मिसाईल निर्मिती कारखान्याचे उद्घाटन

पाकिस्तानच्या सीमेपलिकडून सुरू असलेल्या कुरघोड्यांमुळे लष्करी संघर्ष वाढला आहे. पाकिस्तानी लष्कराकडून हवाई हल्ले केले जात असून, भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या हवाई तळांना लक्ष्य केले. अशातच देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लखनौमधील ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ मिसाईल निर्मिती कारखान्याचे उद्घाटन केले. 

11 May, 25 02:35 PM

जैसलमेरमध्ये आढळलेली मिसाईल निष्क्रिय

राजस्थानातील जैसलमेरमध्ये पाकिस्तानी मिसाईल कोसळली होती. ती भारतीय लष्कराकडून निष्क्रिय करण्यात आली.

 

11 May, 25 02:03 PM

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ऑपरेशन सिंदूरवर मोठे विधान

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, रावळपिंडीपर्यंत भारतीय सैन्याची उपस्थिती दिसून येत होती. लष्कराने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना ठार मारले. ऑपरेशन सिंदूरमध्ये आम्ही दाखवून दिले की भारत दहशतवादाविरुद्ध कारवाई करत आहे. भारतीय लष्कराने फक्त पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना लक्ष्य केले, परंतु पाकिस्तानी लष्कराने सामान्य नागरिकांना लक्ष्य केले. याशिवाय पाकिस्तानी सैन्याने मंदिर, मशीद, गुरुद्वारा आणि चर्चला लक्ष्य केले.

11 May, 25 01:19 PM

ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे..., हवाई दलाने म्हटले- 'आमचे लक्ष्य साध्य झाले'

भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीनंतर भारतीय हवाई दलाकडून एक मोठे विधान समोर आले आहे. हवाई दलाने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरू आहे. हवाई दलाने सांगितले की, "ऑपरेशन सिंदूर अंतर्गत आम्हाला दिलेले लक्ष्य साध्य झाले आहे. ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे. लवकरच याबद्दल माहिती दिली जाईल."

11 May, 25 12:20 PM

अमृतसरमध्ये परिस्थिती सामान्य

अमृतसरमधील परिस्थिती सामान्य असल्याचे अमृतसर जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. लोक त्यांचे दैनंदिन काम करत आहेत. रविवारी कार्यालये उघडत नाहीत, परंतु बाजारपेठा उघड्या राहतात आणि जीवन सामान्य राहते. त्यांनी लोकांच्या सहकार्याबद्दल आभार मानले आहेत.

11 May, 25 12:18 PM

युद्धबंदीनंतर पंतप्रधान मोदींनी तिन्ही सैन्याच्या प्रमुखांसोबत बैठक घेतली

युद्धबंदीनंतर पंतप्रधान मोदींनी तिन्ही सैन्याच्या प्रमुखांसोबत बैठक घेतली, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि सीडीएस देखील उपस्थित होते.

11 May, 25 06:07 AM

कृपया रस्त्यावर, बाल्कनीत किंवा टेरेसवर फिरू नका, अमृतसरमध्ये मार्गदर्शक सूचना

11 May, 25 06:05 AM

अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम

11 May, 25 04:24 AM

दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी

11 May, 25 01:32 AM

जम्मूमधील नागरोटा आर्मी स्टेशनवर गोळीबारात एक जवान जखमी

11 May, 25 01:13 AM

लातूर रेल्वे स्थानकावर मॉक ड्रिल! प्रशासनाच्या सतर्कतेचे घेतले प्रात्यक्षिक

भारत व पाकिस्तानदरम्यानच्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने शनिवारी दुपारी रेल्वे स्थानकावर मॉक ड्रिल घेण्यात आले. प्रशासनाच्या सतर्कतेच्या प्रात्यक्षिकाबरोबर नागरिकांना कोणत्याही दहशतवादी हल्ल्यावेळी प्रसंगावधान राखून घ्यावयाच्या काळजीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. दरम्यान, या रंगीत तालमीच्या थराराचा नागरिकांनी प्रत्यक्ष अनुभवही घेतला. नागरिकांनी जागरूक राहून शहराच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काहीही माहिती असल्यास नियंत्रण कक्ष, लातूर फोन क्र. ०२३८२-२४२२९६, डायल ११२ वर संपर्क करून कळवावे, असे आवाहन जिल्हा पोलिस दलाच्या वतीने करण्यात येत आहे. 

11 May, 25 12:07 AM

नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी

नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी 

10 May, 25 11:46 PM

चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांची भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी फोनवरून चर्चा

चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांची भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी फोनवरून चर्चा

10 May, 25 10:38 PM

पाकिस्तानकडून काही तासांतच युद्धविरामाचं उल्लंघन, जम्मू, श्रीनगरमध्ये ड्रोनहल्ले

पाकिस्तानकडून काही तासांतच युद्धविरामाचं उल्लंघन, जम्मू, श्रीनगरमध्ये ड्रोनहल्ले

10 May, 25 08:00 PM

शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक

शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक 

10 May, 25 07:44 PM

भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामानंतर आयपीएल पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा, बीसीसीआय करणार घोषणा

भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामानंतर आयपीएल पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा, बीसीसीआय करणार नव्या वेळापत्रकाची घोषणा 

10 May, 25 07:13 PM

ही कारवाई देशाच्या सुरक्षेसाठी अनिवार्य होती -शरद पवार

भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाल्यानंतर शरद पवार यांनी एक पोस्ट करत भूमिका मांडली आहे. 

शरद पवार यांनी भारत-पाकिस्तान संघर्षावर केलेली पोस्ट

भारताने कधीच दहशतवादाचा पुरस्कार केलेला नाही. ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताने केवळ दहशतवादी तळांवर प्रखर आणि अचूक कारवाई केली — कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळांवर वा सामान्य नागरिकांवर हल्ला करण्याचा हेतू नव्हता. ही कारवाई देशाच्या सुरक्षेसाठी अनिवार्य होती.

पाकिस्तानकडून सातत्याने होणाऱ्या कुरघोड्यांना संयमाने आणि निर्णायक उत्तर देणं ही भारताची जबाबदारी आहे आणि भारताने ती जागतिक शांततेच्या भानासह पार पाडली आहे.

भारत हा नेहमीच शांततेचा आणि संवादाचा समर्थक राहिला आहे. आणि त्यादिशेने काही घडामोडी घडत असतील तर ते स्वागतार्ह आहे. मात्र दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलणं हेदेखील आंतरराष्ट्रीय समुदायाचं सामूहिक कर्तव्य आहे. शांतीच्या दिशेने टाकलेलं प्रत्येक पाऊल — हे दहशतवादाविरोधात सामूहिक लढ्याचं बळ वाढवतं.

10 May, 25 06:47 PM

युद्धविराम कधीपासून? भारत-पाकिस्तान यांच्यात काय झाली चर्चा?

भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी याबद्दल अधिक माहिती दिली. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, "पाकिस्तानचे लष्करी मोहीम महासंचालक (डीजीएमओ) आणि भारताचे लष्करी मोहीम संचालक (डीजीएमओ) यांच्यात आज (१० मे) दुपारी ३.३५ मिनिटांनी चर्चा झाली."

"दोन्ही देशांकडून जमिनीवरून, हवेतून आणि समुद्रातून होणार हल्ले भारतीय प्रमाणवेळेनुसार ५ वाजेपासून (१० मे रोजीपासून) तात्काळ थांबवण्यावर एकमत झाले. याची अमलबजावणी करण्याचे दोन्ही बाजूंना सांगण्यात आले आहे. दोन्ही देशांचे डीजीएमओ यांच्या १२ मे रोजी पुन्हा दुपारी १२ वाजता चर्चा होणार आहे", असे मिस्त्री यांनी सांगितले.

10 May, 25 06:21 PM

भारत पाकिस्तान लष्करी संघर्षाला पूर्णविराम! डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा

मागील तीन-चार दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला आहे. दोन्ही देशातील लष्करी थांबावा आणि तणाव निवळावा यासाठी प्रयत्न सुरू होते.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, अमेरिकेच्या मध्यस्थीने रात्री उशिरापर्यंत चाललेल्या चर्चेनंतर अखेर मला ही घोषणा करताना आनंद होत आहे की, भारत आणि पाकिस्तान हे दोघेही पूर्णपणे आणि तात्काळ शस्त्रसंधी करण्यास तयार झाले आहेत. सारासार विचार आणि विद्वत्तेचा वापर केल्याबद्दल दोन्ही देशांचे अभिनंदन.   

10 May, 25 04:54 PM

...तर ते देशाविरोधात युद्ध समजलं जाईल -केंद्र सरकारचा मोठा निर्णय

पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला आहे. दोन्ही देशातील लष्करी संघर्ष शिगेला पोहोचलेला असतानाच केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. भविष्यात कोणत्याही प्रकारचा दहशतवादी हल्ला झाला, तर तो देशाविरोधात युद्ध समजले जाईल आणि त्यानुषंगाने पुढील कारवाई केली जाईल, असा निर्णय भारताने घेतला आहे. 

10 May, 25 04:14 PM

India Pakistan News: पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे आठ जवान जखमी

मागील तीन-चार दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लष्कर संघर्ष वाढला आहे. ८ मेपासून पाकिस्तानकडून रात्रीच्या वेळी हवाई हल्ले केले जात आहे. त्याचबरोबर सीमेपलिकडून अंदाधूंद गोळीबारही सुरू आहे. भारताकडून पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. दरम्यान, लष्कराने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तान सोबत सुरू असलेल्या या लष्करी संघर्षात बीएसएफचे आठ जवान जखमी झाले आहेत. जम्मूमधील आरएस पुरा पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात ते जखमी झाले. 

10 May, 25 01:52 PM

जम्मूमध्येही मिळाले क्षेपणास्त्राचे काही भाग आणि तुकडे

10 May, 25 01:06 PM

पाकिस्तान हा दहशतवादी देश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले

"पाकिस्तान हा एक दहशतवादी देश, त्याने नेहमीच दहशतवादाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भारत आता थांबणार नाही. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली आमचे सैन्य योग्य प्रत्युत्तर देत आहे. आम्हाला आमच्या सैन्याचा अभिमान आहे. कालच आम्ही एक बैठक घेतली, ज्यामध्ये आपण कोणती खबरदारी घ्यावी हे ठरवले. आम्ही आवश्यक उपाययोजना करत आहोत. सर्व जिल्हा युनिट्सना आवश्यक माहिती आणि संसाधने पुरवण्यात आली आहेत अशी माहिती भारत-पाकिस्तान तणावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

10 May, 25 12:21 PM

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पाकच्या उपपंतप्रधानांसोबत केली चर्चा

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक डार यांच्याशी चर्चा केली. दोन्ही पक्षांनी सध्याची परिस्थिती कमी करण्याचे मार्ग काढला पाहिजे. गैरसमज टाळून पुन्हा चर्चा केली पाहिजे असा पुनरुच्चार रुबियो यांनी केला. भविष्यातील संघर्ष टाळण्यासाठी अमेरिकेने मदत करण्याची ऑफरही दिली.

10 May, 25 12:19 PM

राजस्थानात पोलिसांनी क्षेपणास्त्राचे अवशेष जप्त केले

राजस्थानच्या बारमेरमधील पोलिसांनी क्षेपणास्त्राचे अवशेष जप्त केले. जे नंतर पोलिसांच्या वाहनातून नेले जातात. जैसलमेर आणि पोखरणमधूनही असेच तुकडे आणि अवशेष सापडले आहेत.

10 May, 25 12:15 PM

फतेह २ मिसाईलचा दावा खोटा, दिल्ली एअरपोर्ट प्राधिकरणाचं स्पष्टीकरण

पाकिस्ताननं दिल्ली एअरपोर्टवर फतेह २ मिसाईलनं हल्ला केल्याची माहिती सोशल मीडियात पसरवली जात आहे परंतु हे साफ खोटे आहे. अशा बनावट आणि चुकीच्या दाव्यापासून लोकांनी सतर्क राहावे, प्रवाशांनी आणि जनतेने योग्य माहितीसाठी अधिकृत संस्थांवर अवलंबून राहावे असं दिल्ली एअरपोर्टचे प्रवक्ते म्हणाले आहेत. 

10 May, 25 11:54 AM

जैसलमेर, पोखरण भागात पाकच्या मिसाईलचे तुकडे

शुक्रवारी रात्री पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यानंतर राजस्थानमधील बारमेर येथे एका मोठ्या क्षेपणास्त्राचे तुकडे आढळले आहेत. जैसलमेर आणि पोखरण येथूनही असेच तुकडे सापडले आहेत.

10 May, 25 11:09 AM

भारतीय सैन्याने फाडला पाकिस्तान फेक नरेटिव्हचा बुरखा

पाकिस्तानी प्रचाराच्या दाव्यांचे खंडन करत भारताने भारतीय हवाई तळांचे नुकसान न झालेले फोटो दाखवले

10 May, 25 11:03 AM

पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला भारतीय सैन्याचं चोख उत्तर

पाकिस्तानी सैन्याकडून सातत्याने पश्चिमी सीमेवर ड्रोनने हल्ले सुरू आहेत. २६ हून अधिक ठिकाणांवर पाकिस्तानी सैन्याने हवाई हल्ल्याचा प्रयत्न केला त्याला भारतीय सैन्याने प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानने रात्री १ च्या सुमारास पंजाबच्या एअरबेसवर हल्ल्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानकडून नागरी वस्त्यांवर जाणूनबुजून हल्ले करण्यात येत आहेत. पाकिस्तानने लाहोर येथून नागरी विमानांना उड्डाणाची परवानगी देत नागरिकांना ढाल बनवण्याचा प्रयत्न केला. भारत पाकिस्तानी सैन्याच्या हल्ल्याला सडेतोड उत्तर देत आहे. वैद्यकीय सेवा, शाळांनाही पाकिस्तानी सैन्य लक्ष्य करत आहेत. भारतीय सैन्याने सडेतोड उत्तर देत पाक सैन्याला मोठे नुकसान पोहचवले आहे. पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला भारतीय सैन्य जशास तसे उत्तर दिले आहे अशी माहिती कर्नल सोफिया कुरेशी यांनी माध्यमांना दिली. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तानIndiaभारतPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाterroristदहशतवादीsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकindian air forceभारतीय हवाई दलNarendra Modiनरेंद्र मोदीAjit Dovalअजित डोवालIndian Armyभारतीय जवान