शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
6
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
7
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
8
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
9
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
10
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
11
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
12
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
13
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
14
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
15
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
16
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
17
"ज्यांना नरकात जायचंय, त्यांनी 'गजवा-ए-हिंद'च्या नावावर..."; योगी आदित्यनाथांचा दंगेखोरांना इशारा
18
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
19
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
20
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."

वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 02:21 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सशस्त्र दलांना स्पष्ट आदेश, दहशतवादाविरोधातील भूमिका कठोरच राहणार; पाकिस्तानला इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाल्यानंतर आता जर पाकिस्तानकडून काही आगळीक करण्यात आली तर अशा प्रत्येक आगळीकीला कठोर प्रत्युत्तर द्या. ‘वहां (पाकिस्तान) से गोली चलेगी, तो यहां (भारत) से गोला चलेगा’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सशस्त्र दलांना स्पष्ट आदेश दिले आहेत.

ऑपरेशन सिंदूर’ अजून संपलेले नाही. भारताची दहशतवादाविरोधातील भूमिका यापुढेही कठोरच राहील. पाकिस्तानला आता दहशतवादाची खूप मोठी किंमत मोजावी लागेल. पाकिस्तान दहशतवादाला समर्थन देत राहिला, तर त्याने सहकार्याची अपेक्षा अजिबात ठेवू नये, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

काश्मीरसंदर्भात भारत कधीही कोणाचीही मध्यस्थी स्वीकारणार नाही. पाकिस्तानने त्याच्या बेकायदेशीर ताब्यातील भाग भारताला परत करावा, हाच चर्चेचा एकमेव मुद्दा असेल, असेही सांगण्यात आले. शस्त्रसंधीची घोषणा सर्वप्रथम अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्सवर पोस्ट करून केली होती. ट्रम्प यांनी काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी करण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली होती. 

उच्चस्तरीय बैठकीत मोदींनी घेतला शस्त्रसंधीचा आढावा

भारत-पाकिस्तानदरम्यान निर्माण झालेल्या संघर्षात दोन्ही देशांनी शनिवारी सायंकाळी शस्त्रसंधी स्वीकारल्यानंतर रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत सीमेवर पाक शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत असल्याबद्दल आक्षेप नोंदवण्यात आला. 

पाकिस्तानने याबाबत योग्य ती पावले उचलावीत आणि या स्थितीत गांभीर्याने व जबाबदारीने निर्णय घ्यावेत, असे आवाहनही बैठकीत करण्यात आले. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथसिंह, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, संरक्षण दलाचे प्रमुख जनरल अनिल चौहान यांच्यासह लष्कराच्या तिन्ही विभागांचे प्रमुख आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शस्त्रसंधी लागू झाल्यानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेण्याच्या दृष्टीने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. भारत-पाकिस्तान या दोघांनीही ही शस्त्रसंधी स्वीकारल्यानंतर ती लागू करण्यात आली असली तरी या पार्श्वभूमीवर आगामी रणनीती काय असेल, यावर बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

डीजीएमओ पातळीवरच चर्चा : पाककडून भारताविरुद्ध दहशतवादी कारवाया अशाच सुरू राहिल्या, तर सिंधू जल करार स्थगितच राहील. पाकिस्तानशी संवाद केवळ लष्करी अभियान महासंचालक (डीजीएमओ) पातळीवरच होईल. 

 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानCeasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघनPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला