शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 06:25 IST

India vs Pakistan War: अमृतसरमध्येही रात्री १०.३० ते ११ वाजेपर्यंत अर्धा तास वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. परंतू, पुन्हा लाईट सुरु करण्यात आल्या. यानंतर काही वेळाने मोठे आवाज ऐकू आल्याने प्रशासनाने पुन्हा ब्लॅकआऊट केले. यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली.

भारताने बुधवारी पहाटे ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केल्यानंतर पाकिस्तान भारतावर प्रतिहल्ला करेल असे वाटले होते. तसेच भारत पुन्हा पाकिस्तानवर आज रात्री हल्ला करेल असेही वाटले होते. यावरून सोशल मीडियावर मात्र अफवांचा बाजार उठला होता. साडे अकरा, बारा वाजण्याच्या सुमारास भारताने सियालकोटवर हल्ला चढविल्याचे व्हिडीओ व्हायरल केले जाऊ लागले होते. याला प्रत्यूत्तर म्हणून पाकिस्तानींकडून काही वेळाने म्हणजेच दोन वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानने अमृतसरसह पंजाबच्या भागात हल्ले चढविल्याचे व्हिडीओ व्हायरल केले जाऊ लागले. 

दोन्ही बाजुंनी एकमेकांवरील हल्ल्याचे दावे केले जाणारे व्हिडीओ प्रचंड वेगाने व्हायरल केले जाऊ लागले होते. भारत पाकिस्तान युद्ध प्रत्यक्षात नाही तर सोशल मीडियावर चांगलेच रंगले आहे. पाकिस्तानने भारतावर हल्ला केल्याचे व्हिडीओ, फोटो आता सकाळपर्यंत देखील व्हायरल केले जात आहेत. 

अमृतसरमध्ये रात्री दोनच्या सुमारास दुसऱ्यांदा ब्लॅक आऊट करण्यात आला होता. हीच वेळ पाकिस्तानी आणि भारतीय ट्रोलर्सनी साधली आणि पाकिस्तानने भारतावर हल्ला केल्याचे व्हिडीओ व्हायरल करू लागले. भारतीयांनी पंजाबी नागरिक घराबाहेर आल्याचे आणि तीन ते चार स्फोटांचे आवाज ऐकल्याचे तसेच अमृतसर विमानतळावरून एसएएम म्हणजेच क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा फायर करण्यात आल्याचे दावे केले जात होते. काहींनी तर पाकिस्तानी विमानांना, ड्रोनना या एअर डिफेन्स सिस्टिमने पाडल्याचे देखील दावे केले होते. 

तर पाकिस्तानी अकाऊंटवरून अमृतसर आणि आजुबाजुच्या शहरांत पाकिस्तानने जोरदार मिसाईल हल्ले केल्याचे दावे केले जात होते. यामुळे देशभरात खळबळ उडाली होती. जो तो अमृतसरवासियांसाठी प्रार्थना करत होता. परंतू, अमृतसर प्रशासनाने सर्व काही सुरक्षित असल्याचे जाहीर केले. 

नेमके काय झालेले...

अमृतसरमध्येही रात्री १०.३० ते ११ वाजेपर्यंत अर्धा तास वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. परंतू, पुन्हा लाईट सुरु करण्यात आल्या. यानंतर काही वेळाने मोठे आवाज ऐकू आल्याने प्रशासनाने पुन्हा ब्लॅकआऊट केले. यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली. अमृतसरचे पोलिस आयुक्त गुरप्रीत भुल्लर यांनी स्पष्ट केले की, "मलाही स्फोटांचा आवाज ऐकू आला, पण आम्ही घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता काहीही आढळले नाही. खबरदारी म्हणून आम्ही ब्लॅकआउट लागू केले."

 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवानIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक