शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 06:25 IST

India vs Pakistan War: अमृतसरमध्येही रात्री १०.३० ते ११ वाजेपर्यंत अर्धा तास वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. परंतू, पुन्हा लाईट सुरु करण्यात आल्या. यानंतर काही वेळाने मोठे आवाज ऐकू आल्याने प्रशासनाने पुन्हा ब्लॅकआऊट केले. यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली.

भारताने बुधवारी पहाटे ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केल्यानंतर पाकिस्तान भारतावर प्रतिहल्ला करेल असे वाटले होते. तसेच भारत पुन्हा पाकिस्तानवर आज रात्री हल्ला करेल असेही वाटले होते. यावरून सोशल मीडियावर मात्र अफवांचा बाजार उठला होता. साडे अकरा, बारा वाजण्याच्या सुमारास भारताने सियालकोटवर हल्ला चढविल्याचे व्हिडीओ व्हायरल केले जाऊ लागले होते. याला प्रत्यूत्तर म्हणून पाकिस्तानींकडून काही वेळाने म्हणजेच दोन वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानने अमृतसरसह पंजाबच्या भागात हल्ले चढविल्याचे व्हिडीओ व्हायरल केले जाऊ लागले. 

दोन्ही बाजुंनी एकमेकांवरील हल्ल्याचे दावे केले जाणारे व्हिडीओ प्रचंड वेगाने व्हायरल केले जाऊ लागले होते. भारत पाकिस्तान युद्ध प्रत्यक्षात नाही तर सोशल मीडियावर चांगलेच रंगले आहे. पाकिस्तानने भारतावर हल्ला केल्याचे व्हिडीओ, फोटो आता सकाळपर्यंत देखील व्हायरल केले जात आहेत. 

अमृतसरमध्ये रात्री दोनच्या सुमारास दुसऱ्यांदा ब्लॅक आऊट करण्यात आला होता. हीच वेळ पाकिस्तानी आणि भारतीय ट्रोलर्सनी साधली आणि पाकिस्तानने भारतावर हल्ला केल्याचे व्हिडीओ व्हायरल करू लागले. भारतीयांनी पंजाबी नागरिक घराबाहेर आल्याचे आणि तीन ते चार स्फोटांचे आवाज ऐकल्याचे तसेच अमृतसर विमानतळावरून एसएएम म्हणजेच क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा फायर करण्यात आल्याचे दावे केले जात होते. काहींनी तर पाकिस्तानी विमानांना, ड्रोनना या एअर डिफेन्स सिस्टिमने पाडल्याचे देखील दावे केले होते. 

तर पाकिस्तानी अकाऊंटवरून अमृतसर आणि आजुबाजुच्या शहरांत पाकिस्तानने जोरदार मिसाईल हल्ले केल्याचे दावे केले जात होते. यामुळे देशभरात खळबळ उडाली होती. जो तो अमृतसरवासियांसाठी प्रार्थना करत होता. परंतू, अमृतसर प्रशासनाने सर्व काही सुरक्षित असल्याचे जाहीर केले. 

नेमके काय झालेले...

अमृतसरमध्येही रात्री १०.३० ते ११ वाजेपर्यंत अर्धा तास वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. परंतू, पुन्हा लाईट सुरु करण्यात आल्या. यानंतर काही वेळाने मोठे आवाज ऐकू आल्याने प्रशासनाने पुन्हा ब्लॅकआऊट केले. यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली. अमृतसरचे पोलिस आयुक्त गुरप्रीत भुल्लर यांनी स्पष्ट केले की, "मलाही स्फोटांचा आवाज ऐकू आला, पण आम्ही घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता काहीही आढळले नाही. खबरदारी म्हणून आम्ही ब्लॅकआउट लागू केले."

 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवानIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक