शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
2
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
3
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
4
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
5
Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...
6
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
7
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
8
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
9
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
10
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
11
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
12
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...
13
इंजिनियरचं धक्कादायक कृत्य, आधी पत्नीची हत्या केली, त्यानंतर मित्राला केला व्हिडीओ कॉल आणि ...
14
IndiGo Bomb Threat: इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, दिल्ली विमानतळावर 'इमर्जन्सी'!
15
जेव्हा पाकिस्तान सरकारनं आपल्याच क्रिकेटर्सना चुना लावला; दिलेले चेकच बाऊन्स झाले; किती होती रक्कम? 
16
१ ऑक्टोबरपासून बदलणार इंट्राडे ट्रेडिंगचे नियम, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
17
जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना...
18
प्रेम विवाह: लग्नानंतर तुमची जोडी यशस्वी ठरेल की नाही? कुंडलीतील 'या' योगावरून मिळते उत्तर!
19
"आम्ही १५ वर्षांपासून वेगळे राहतोय...", गोविंदाच्या पत्नीचा मोठा खुलासा, सुनिता अहुजा म्हणाली...
20
संरक्षण, इन्फ्रा ते फायनान्स! 'हे' ५ शेअर्स करणार श्रीमंत! तुमच्या पोर्टफोलिओसाठी उत्तम पर्याय, टार्गेट प्राईस जाहीर

'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 08:37 IST

इराण आणि इस्त्रायलमध्ये तणाव सुरू आहे. दरम्यान, भारत 'ऑपरेशन सिंधू' अंतर्गत आपल्या नागरिकांना परत आणत आहे. सोमवारी महान एअरच्या विशेष विमानाने २९० प्रवासी दिल्लीत पोहोचले.

इराण आणि इस्त्रायलमध्ये तणाव सुरू आहे. युद्धग्रस्त इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी चालवले जाणारे ऑपरेशन सिंधू सुरूच आहे. सोमवारी रात्री महान एअरचे एक विशेष विमान २९० प्रवाशांसह इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले.

भारताने आतापर्यंत २००३ भारतीयांना इराणमधून परत आणले आहे. दिल्लीला पोहोचलेल्या प्रवाशांमध्ये श्रीलंकेची एक महिला फातिमा इमान देखील आहे. भारत सरकारचे आभार मानताना फातिमा म्हणाली की ती ज्या विद्यापीठात शिक्षण घेत आहे तिथे अनेक भारतीय विद्यार्थी आहेत.

Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?

सर्व भारतीय घरी परतत असल्याची माहिती मिळताच तिने श्रीलंकेच्या दूतावासाशी संपर्क साधला आणि घरी परतण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर, श्रीलंका आणि भारताच्या दूतावासांशी समन्वय साधून तिचा प्रवासाचे नियोजन केले.

फातिमा म्हणाली की, इराणमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे आणि तिथे राहणे सुरक्षित नाही. लवकरच परिस्थिती सुधारेल आणि विद्यार्थी पुन्हा इराणला जाऊन त्यांचे शिक्षण पूर्ण करू शकतील अशी आशा आहे. बिहारमधील सिवान येथील सय्यद वाजी हैदर, जे प्रवाशांमध्ये होते, त्यांनी सांगितले की, भारतात परतल्यानंतर समाधान वाटत आहे.

श्रीलंकेच्या महिलेने भारत सरकारचे कौतुक केले

भारतीय दूतावास आणि भारत सरकारने केलेल्या व्यवस्थेचे तिने कौतुक केले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, सोमवारी संध्याकाळी ६.१५ वाजता नवी दिल्ली येथे पोहोचलेल्या विशेष विमानाने २९० भारतीय नागरिक आणि एका श्रीलंकेच्या नागरिकाला बाहेर काढण्यात आले.

आतापर्यंत किती नागरिकांना परत आणले?

पहिले विमान शुक्रवारी रात्री उशिरा २९० भारतीयांसह नवी दिल्लीत उतरले आणि दुसरे विमान शनिवारी दुपारी ३१० भारतीयांसह उतरले. गुरुवारी येरेवनहून आणखी एक विमान आले. शनिवारी सकाळी अश्गाबातहून एक विशेष विमान नवी दिल्लीत पोहोचले. आतापर्यंत २००३ जणांना परत आणले आहे.

टॅग्स :IndiaभारतIranइराणIsraelइस्रायल