शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

"....तेव्हाच काँग्रेस आरक्षण रद्द करण्याबाबत विचार करेल", विद्यार्थ्याच्या प्रश्नावर राहुल गांधींचं मोठं विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 12:08 IST

Rahul Gandhi News: सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी भारतातील आरक्षण कधीपर्यंत सुरू राहणार, या एका विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मोठं विधान केलं आहे.

जातिनिहाय जनगणना आणि आरक्षण या दोन मुद्द्यांवरून काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे मागच्या काही दिवसांपासून कमालीचे आक्रमक आहेत. दरम्यान, सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी भारतातीलआरक्षण कधीपर्यंत सुरू राहणार, या एका विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मोठं विधान केलं आहे. जेव्हा भारतात आरक्षणाच्या दृष्टीने समानता असेल, तेव्हाच काँग्रेस पक्ष देशामधील आरक्षण संपुष्टात आणण्याबाबत विचार करेल. सध्यातरी अशी स्थिती नाही, असे राहुल गांधी यांनी सांगितले. 

राहुल गांधी यांनी वॉशिंग्टनमधील प्रतिष्ठित अशा जॉर्जटाऊन विद्यापीठामधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तेव्हा एका विद्यार्थ्याने राहुल गांधी यांना भारतातील आरक्षणाबाबत प्रश्न विचारला होता. तसेच ते कधीपर्यंत सुरू राहील, अशी विचारणा केली होती. त्याला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, जेव्हा भारतात आरक्षणाच्या दृष्टीने निष्पक्षता असेल, तेव्हा आम्ही आरक्षण रद्द करण्याबाबत विचार करू. सध्यातरी भारत हा याबाबतीत निष्पक्ष ठिकाण नाही आहे. तुम्ही वित्तीय आकडे पाहिल्यास आदिवासींना १०० रुपयांमधील १० पैसे मिळतात. दलितांना १०० रुपयांमधील ५ रुपये मिळतात. तर ओबीसींनाही एवढेच पैसे मिळतात. त्यांना योग्य भागीदारी मिळत नाही आहे, हे वास्तव आहे. 

राहुल गांधी पुढे म्हणाले की, समस्या ही आहे की, भारतातील ९० टक्के लोक भागीदारी करण्यास सक्षम नाही आहेत. भारतातील प्रत्येक व्यवसायातील व्यावसायिकांची यादी पाहा. मी पाहिली आहे. त्यात मला एका आदिवासीचं नाव दाखवा. दलिताचं नाव दाखवा. पहिल्या २०० जणांमधील एक ओबीसी आहे. त्यांची भारतातील संख्या ही ५० टक्के आहे. मात्र आम्ही या आजारावर उपचार करत नाही आहोत. ही समस्या दूर करण्यासाठी केवळ आरक्षण हेच साधन नाही आहे, इतर मार्गही आहेत, असेही राहुल गांधी यांनी सांगितले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसreservationआरक्षणIndiaभारत